शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:14 IST

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने कोणतीही जबाबदारी न दिल्याने कदम यांनी पक्षास सोडचिठ्ठी देणार असल्याची नाराजी महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.मुंबई येथील टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश कदम यांनी आपण वयाच्या १८ व्या वर्षांपासून काँग्रेसमध्ये तळागाळात काम केले आहे. पुन्हा एकदा आपण काँग्रेसमध्ये काम करीत असताना कोकणात काँग्रेसला चांगले दिवस आणू. आपल्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी रमेश कदम यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते.यांनी केला पक्ष प्रवेशसिंधुदुर्गचे वसंत केसरकर यांनीही काँगे्रसमध्ये प्रवेश केला. रमेश कदम यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक रमेश खळे, पांडुरंग भैरवकर, हारुणभाई कच्छी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, हिंदुराव पवार, दीपक कदम, आदी निवडक सहकाºयांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आता स्वबळावर जिंकू : दलवाईरमेश कदम यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल. वसंत केसरकर, पुष्पसेन सावंत यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काँग्रेस मजबूत होईल व पुढच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर जिंकू शकेल, असा विश्वास खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.जातीवादी संघटनांना आळा बसेलकोकणात जातीयवादी संघटनांना माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे आळा बसेल. आता सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हनिफ कुरेशी यांनी सांगितले.कोकणात काँग्रेस मजबूत होईलमाजी आमदार रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चांगला निर्णय होतोय. एक लढवय्या, अभ्यासू नेता काँग्रेसमध्ये येत असल्याने कोकणात काँग्रेस अधिक मजबूत होईल. आपण विधिमंडळात त्यांच्याबरोबर काम केले असल्याने त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे, असे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी सांगितले.कार्यकर्ते, पदाधिकारी समाधानीजिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकिशोर थरवळ, काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहिम दलवाई, माजी सरपंच वासुदेव मेस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक कदम, महिला प्रदेश सदस्या सावंत, राष्ट्रवादीचे माजी खजिनदार रोशन दलवाई यांनीही रमेश कदम यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रमेश कदम यांच्या रूपाने काँग्रेसला चांगले नेतृत्व मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला नेतृत्वाचा अभाव जाणवत होता. ती कसर आता कदम यांच्यामुळे भरून निघाली आहे. कोकणात पूर्वी काँग्रेस प्रबळ होती. कदम यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा कोकणात काँग्रेसला वैभवाचे दिवस येतील.- अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस