शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

अखेर रमेश कदम काँग्रेसमध्ये-प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:14 IST

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

चिपळूण : आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी सहकाºयांसह बुधवारी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने कोणतीही जबाबदारी न दिल्याने कदम यांनी पक्षास सोडचिठ्ठी देणार असल्याची नाराजी महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.मुंबई येथील टिळक भवन या काँग्रेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार हुसेन दलवाई, आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा प्रभारी विश्वनाथ पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रमेश कदम यांनी आपण वयाच्या १८ व्या वर्षांपासून काँग्रेसमध्ये तळागाळात काम केले आहे. पुन्हा एकदा आपण काँग्रेसमध्ये काम करीत असताना कोकणात काँग्रेसला चांगले दिवस आणू. आपल्यावर पक्षाने जो विश्वास दाखविला आहे तो सार्थ करण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी रमेश कदम यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते.यांनी केला पक्ष प्रवेशसिंधुदुर्गचे वसंत केसरकर यांनीही काँगे्रसमध्ये प्रवेश केला. रमेश कदम यांच्याबरोबर माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक रमेश खळे, पांडुरंग भैरवकर, हारुणभाई कच्छी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर, हिंदुराव पवार, दीपक कदम, आदी निवडक सहकाºयांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.आता स्वबळावर जिंकू : दलवाईरमेश कदम यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत होईल. वसंत केसरकर, पुष्पसेन सावंत यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काँग्रेस मजबूत होईल व पुढच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर जिंकू शकेल, असा विश्वास खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.जातीवादी संघटनांना आळा बसेलकोकणात जातीयवादी संघटनांना माजी आमदार रमेश कदम यांच्या प्रवेशामुळे आळा बसेल. आता सर्व बांधवांनी एकत्र येऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हनिफ कुरेशी यांनी सांगितले.कोकणात काँग्रेस मजबूत होईलमाजी आमदार रमेश कदम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे चांगला निर्णय होतोय. एक लढवय्या, अभ्यासू नेता काँग्रेसमध्ये येत असल्याने कोकणात काँग्रेस अधिक मजबूत होईल. आपण विधिमंडळात त्यांच्याबरोबर काम केले असल्याने त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे, असे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार माणिक जगताप यांनी सांगितले.कार्यकर्ते, पदाधिकारी समाधानीजिल्हा परिषदेचे माजी सदस्य नंदकिशोर थरवळ, काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहिम दलवाई, माजी सरपंच वासुदेव मेस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते अशोक कदम, महिला प्रदेश सदस्या सावंत, राष्ट्रवादीचे माजी खजिनदार रोशन दलवाई यांनीही रमेश कदम यांच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले असून, रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

रमेश कदम यांच्या रूपाने काँग्रेसला चांगले नेतृत्व मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आम्हाला नेतृत्वाचा अभाव जाणवत होता. ती कसर आता कदम यांच्यामुळे भरून निघाली आहे. कोकणात पूर्वी काँग्रेस प्रबळ होती. कदम यांच्या प्रवेशामुळे पुन्हा एकदा कोकणात काँग्रेसला वैभवाचे दिवस येतील.- अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस