शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अखेर महावितरणने वीजखांब बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

खेड : शहरातील डाक बंगला येथील धोकादायक स्थितीतील वीजखांब बदलण्याबाबत महावितरणकडे सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात ...

खेड : शहरातील डाक बंगला येथील धोकादायक स्थितीतील वीजखांब बदलण्याबाबत महावितरणकडे सातत्याने तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. ही बाब नागरिकांनी भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भाजपच्या तक्रारीची तातडीने दखल घेत डाक बंगला येथील पाच वीजखांब बदलण्यात आले.

डाक बंगला परिसरात गंजलेल्या वीजखांबांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. रहिवाशांनी महावितरणकडे सातत्याने वीजखांब बदलण्यासाठी खेटे घालत निवेदनही दिले. मात्र, वीजखांब बदलण्यासाठी महावितरणला सवड मिळत नव्हती. अखेर परिसरातील रहिवाशांनी ही बाब भाजपचे शहराध्यक्ष कानडे यांना सांगितली. परिसरातील धोकादायक स्थितीतील खांबांमुळे धोका पोहोचण्याची दाट शक्यता होती. याविषयी तक्रारी करुनही महावितरणला जाग येत नव्हती. त्यामुळे कानडे व पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला तसेच अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास भाग पाडले. यानंतर महावितरणने तातडीने येथील वीजखांब बदलण्याचे काम हाती घेतले असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.