शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अखेर रॉकेलच्या कोट्यात १० टक्के वाढ

By admin | Updated: February 7, 2015 00:16 IST

रत्नागिरी जिल्हा : ग्राहकांच्या तक्रारींपुढे शासन नमले--लोकमतचा प्रभाव

रत्नागिरी : पूर्वी माणशी दोन लीटर मिळणारे रॉकेल केवळ २०० मिलिलीटरवर आल्याने शासनाच्या या धोरणाबाबत ग्राहकांनी ‘एवढ्याशा रॉकेलवर भागवायचे कसे?’ असा संतप्त सवाल करत शासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतने २१ रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. अखेर ग्राहकांच्या नाराजीपुढे नमते घेत शासनाने फेब्रुवारीमधील रॉकेलच्या साठ्यात १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आता महिन्याला किमान ४०० मिलिलीटर रॉकेल पदरात पडणार आहे. जिल्ह्यात श्वेत शिधापत्रिकाधारक वगळून ३ लाख ७५ हजार ८५४ नागरिकांना रॉकेल वितरीत केले जाते. डिसेंबर २०१४ पर्यंत शहरी भागात महिन्याला प्रति माणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत २० लीटर रॉकेल, तर ग्रामीण भागात महिन्याला प्रति माणसी २ लीटर आणि प्रतिशिधापत्रिका जास्तीत १५ लीटर रॉकेल वितरीत करण्याच्या शासनाच्या सुचना होत्या. प्रत्यक्षात जिल्ह्याची रॉकेलची एकूण मागणी २८३० किलोलीटर इतकी होती. मात्र, या मागणीच्या ३७ टक्केच म्हणजे १०६८ किलोलीटर इतकेच रॉकेल जिल्ह्यासाठी पाठविले जात होते.त्यातच आता जानेवारी ते मार्च २०१५ या तीन महिन्यासाठी केवळ ६४८ किलोलीटर (२३ टक्के) इतकाच रॉकेल कोटा मंजूर झाला. त्यातच जानेवारीचा रॉकेलचा कोटा उशिरा आल्याने पुरवठा विभागाने डिसेंबरच्या कोट्यातील ६० टक्के रॉकेलचे वितरण आधीच केले. त्यामुळे आता जानेवारी महिन्यातील रॉकेलच्या वितरणात रास्त दर धान्य दुकानदारांना अडचणी आल्या. प्रति माणसी २०० मिलिलीटरप्रमाणे रॉकेलचे वितरण करावे लागले. त्यामुळे महिन्याला केवळ २०० मिलिलीटरवरच गुजराण कशी करणार, एवढेसे रॉकेल दिव्याला तरी पुरेल का, असा सवाल करत शासनाला केला. जनतेची नाराजी काही अंशी दूर करण्यासाठी फेब्रुवारीसाठी रॉकेलचा १० टक्के कोटा वाढवून आला आहे. त्यामुळे ६४८ किलोलीटर ऐवजी आता मागणीच्या ३३ टक्के म्हणजे ९३६ किलोलीटर इतका साठा जिल्हा पुरवठा शाखेला प्राप्त झाला आहे. २०० मिलीलीटरऐवजी आता किमान ४०० मिलीलीटर रॉकेल पदरात पडणार असल्याने काही अंशी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.(प्रतिनिधी)