शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
3
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
4
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
5
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
6
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
7
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
8
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
9
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
10
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
11
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
12
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
13
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
14
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
15
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
16
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
17
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
18
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
19
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
20
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक

शाळा भरवताय, दुरुस्तीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय नुकसान टाळण्यासाठी काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा भरविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा धाेका कायम आहे. जिल्ह्यातील २६१५ शाळांपैकी ८८९ शाळा नादुरुस्त असून, शाळा सुरू केल्यानंतर नादुरुस्त शाळांची टांगती तलवार विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही राहणार आहे.

जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांची समस्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची डाेकेदुखी ठरलेली आहे. शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येत असला तरी तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यात किती शाळांची दुरुस्ती करायची, हा प्रश्नच आहे. गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला ६ काेटी २४ लाखांची गरज असताना जिल्हा वार्षिक नियाेजनमधून केवळ ४ काेटी १६ लाख ८४ हजार एवढीच रक्कम प्राप्त झाली हाेती. निधीची ही समस्या अजूनही कायम आहे.

जिल्ह्यात काेसळणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका शाळांना बसत असून, त्यामुळे शाळा नादुरुस्त हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच ‘ताैक्ते’ चक्रीवादळामुळे नादुरुस्त शाळांमध्ये भर पडली आहे. नादुरुस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणार कसे, असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे. गतवर्षीपासून काेराेनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला काेणताच धाेका पाेहाेचला नाही. या काळात मंडणगडसारख्या भागातील एक शाळा जमीनदाेस्त झाली, सुदैवाने शाळा बंद असल्याने अनर्थ टळला.

आता काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेऊ लागल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा प्रश्न तसाच आहे. जिल्ह्यात सध्या ८८९ शाळा नादुरुस्त असून, त्यातील सर्वाधिक शाळा रत्नागिरी तालुक्यात आहेत. या शाळांची दुरुस्ती झाल्याशिवाय शाळा सुरू करणे धाेक्याचे ठरणार आहे.

--------------------------काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला पाहिजे. गावाने ठरविले तर शाळा सुरू हाेऊ शकते. ‘ताैक्ते’ वादळामुळे शाळांचे माेठे नुकसान झाले आहे. समग्र शिक्षा अभियानातून शाळांची दुरुस्ती तातडीने करण्याचा प्रयत्न आहे. ‘ताैक्ते’ वादळातील शाळांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र ८ काेटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. केवळ दीड काेटीच मिळाले आहेत.

- चंद्रकांत मणचेकर, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद

------------------------सध्या माध्यमिकच्या ५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राजापूर ४ व संगमेश्वरातील १ शाळा आहे. अजूनही प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- निशादेवी वाघमाेडे, शिक्षणाधिकारी