शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

शाळा भरवताय, दुरुस्तीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या दाेन वर्षांत काेराेनामुळे शिक्षणाचा पुरता खेळखंडाेबाच सुरू आहे. शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरविताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शालेय नुकसान टाळण्यासाठी काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा भरविण्याबाबत हालचाली सुरू आहेत. मात्र, शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा धाेका कायम आहे. जिल्ह्यातील २६१५ शाळांपैकी ८८९ शाळा नादुरुस्त असून, शाळा सुरू केल्यानंतर नादुरुस्त शाळांची टांगती तलवार विद्यार्थ्यांसह शिक्षकांवरही राहणार आहे.

जिल्ह्यातील नादुरुस्त शाळांची समस्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची डाेकेदुखी ठरलेली आहे. शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात येत असला तरी तुटपुंजी मदत मिळत असल्याने त्यात किती शाळांची दुरुस्ती करायची, हा प्रश्नच आहे. गतवर्षी शाळा दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेला ६ काेटी २४ लाखांची गरज असताना जिल्हा वार्षिक नियाेजनमधून केवळ ४ काेटी १६ लाख ८४ हजार एवढीच रक्कम प्राप्त झाली हाेती. निधीची ही समस्या अजूनही कायम आहे.

जिल्ह्यात काेसळणाऱ्या पावसाचा सर्वाधिक फटका शाळांना बसत असून, त्यामुळे शाळा नादुरुस्त हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातच ‘ताैक्ते’ चक्रीवादळामुळे नादुरुस्त शाळांमध्ये भर पडली आहे. नादुरुस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणार कसे, असा प्रश्न आता उपस्थित हाेत आहे. गतवर्षीपासून काेराेनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला काेणताच धाेका पाेहाेचला नाही. या काळात मंडणगडसारख्या भागातील एक शाळा जमीनदाेस्त झाली, सुदैवाने शाळा बंद असल्याने अनर्थ टळला.

आता काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेऊ लागल्याने पुन्हा शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, या शाळा सुरू करताना नादुरुस्त शाळांचा प्रश्न तसाच आहे. जिल्ह्यात सध्या ८८९ शाळा नादुरुस्त असून, त्यातील सर्वाधिक शाळा रत्नागिरी तालुक्यात आहेत. या शाळांची दुरुस्ती झाल्याशिवाय शाळा सुरू करणे धाेक्याचे ठरणार आहे.

--------------------------काेराेनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला पाहिजे. गावाने ठरविले तर शाळा सुरू हाेऊ शकते. ‘ताैक्ते’ वादळामुळे शाळांचे माेठे नुकसान झाले आहे. समग्र शिक्षा अभियानातून शाळांची दुरुस्ती तातडीने करण्याचा प्रयत्न आहे. ‘ताैक्ते’ वादळातील शाळांच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र ८ काेटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. केवळ दीड काेटीच मिळाले आहेत.

- चंद्रकांत मणचेकर, सभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद

------------------------सध्या माध्यमिकच्या ५ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राजापूर ४ व संगमेश्वरातील १ शाळा आहे. अजूनही प्राथमिक विभागाच्या शाळा सुरू करण्याबाबत काेणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

- निशादेवी वाघमाेडे, शिक्षणाधिकारी