शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कोकण रेल्वेच्या प्रश्नांबाबत लढा सुरूच राहणार : नीलेश राणे

By admin | Updated: May 14, 2014 00:33 IST

चिपळूण : कोकणच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. येथील प्रत्येक प्रश्नासाठी आपला पाठपुरावा सुरुच राहील. कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी व्हावा,

चिपळूण : कोकणच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. येथील प्रत्येक प्रश्नासाठी आपला पाठपुरावा सुरुच राहील. कोकण रेल्वेचा मार्ग दुहेरी व्हावा, ही आपली आग्रही मागणी आहे. अजून नागोठणे येथील अपघाताचा अहवाल बाहेर यायचा आहे. परंतु रेल्वेच्या विविध समस्यांबाबत आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नीलेश राणे यांनी दिला. आपण सव्वा लाखाच्या मताधिक्याने विजय होऊ, असा विश्वासही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. असुर्डे येथील रेल्वे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खासदार राणे चिपळुणात आले होते. त्यावेळी माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम, तालुकाध्यक्ष संदीप सावंत, शहराध्यक्ष परिमल भोसले, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणीपुरवठा सभापती कबीर काद्री, बंटी वणजु, समीर झारी, इरशाद वांगडे, रामदास राणे, राजेश वाजे, संतोष खैर, सतीश घाग, कुंदन खातू, फैसल पिलपिले आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत राणे म्हणाले की, कोकणच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने लढा देणारच आहोत. कोकण रेल्वेचे अनेक प्रश्न आहेत. असुर्डे रेल्वे स्टेशन, रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अशा अनेक प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा ठेवणारच आहोत. दुहेरी मार्ग असता तर नागोठणेसारखा अपघात झाला नसता, असे मत खासदार राणे यांनी व्यक्त केले. आता मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत यंत्रणा कामाला लागली आहे. सर्वेक्षण किंवा भूसंपादन याबाबतची कामे सुरू झाली आहेत. या कामाला आपण अधिक गती देणार आहोत. अवकाळी पावसाबाबत बोलताना ते म्हणाले की, या परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांबरोबर स्वतंत्र बैठक घेऊ व शासकीय यंत्रणेला योग्य त्या सूचना देऊ, असे राणे यांनी सांगितले. नीलेश राणे यांनी या मतदारसंघात निवडणुकीनंतर मतदार संपर्क केला. त्यानंतर वादळसदृश परिस्थिती व महावितरण कंपनीला दिलेल्या सूचनांनंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आपण मोठ्या मतानी लोकसभेत जाऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला. दि. १६ रोजी निकाल लागल्यानंतर आपल्याला कळेल की, मतदार विकास संपर्कालाच प्राधान्य देत आहेत. राणे यांनी दिलेल्या भेटीमुळे कार्यकर्ते सुखावले आहेत. (प्रतिनिधी)