शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:17 IST

अनिल कासारे। लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे ...

अनिल कासारे।लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जनावरांना लागणारी वैरणही वाया गेल्याने जनावरांना वर्षभर खायला घालायचे काय? यांची चिंता आता शेतकऱ्यांना पडली आहे.यावर्षी पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांची परीक्षा होती. मुळात पाऊस उशिरा आल्याने शेतीचे वेळापत्रक उशिरानेच सुरू झाले. हळवी भातशेती गणपती उत्सव कालावधीत कापणीला येते, हे सर्वसाधारण गणित. पण गणपती उत्सवादरम्यानही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्याने कापणी झाली नाही.आॅक्टोबर उजाडला तरी पाऊस थांबला नाही. त्यातच आलेल्या क्यार वादळाने शेतकºयांची झोप उडवली. या वादळामुळे जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस व वाºयामुळे भातशेती आडवी झाली. शेतामध्ये साचलेल्या पाण्यात भातशेती पडल्याने पिकाला पुन्हा कोंब आले. पाण्यात राहिल्याने भातशेती कुजून गेली. त्यामुळे जनावरांना लागणारी वैरणही वाया गेली. आता दिवाळी संपत आली तरी भातशेतीची कापणी झाली नसल्याने नाचणी व इतर शेतीची कापणी करायची तरी कधी, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.सद्यस्थितीत हळवी भातशेती करपली आहे. कापणी करताना भाताची लोंब अर्धवट तुटून शेतात पडत असल्याने शेतकºयांना पडलेल्या लोंब्या जमा कराव्या लागत आहेत. पिकलेल्या भातशेतीतील निम्मे भात शेतात पडल्याने ते गोळळा करण्यातच शेतकºयांचा वेळ वाया जात आहे. हळव्या शेतीबरोबरच गरवी शेतीही कापणीला आली आहे. मात्र, हळवी शेतीच अजून बाकी असल्याने पुढील कामही ठप्प आहे.भाताबरोबरच नाचणी शेतीही जमिनीवर पडली आहे. आता उघडीप मिळाल्याने शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतांमध्ये अजून पाणी असल्याने कापणी करताना अडचण येत आहेत. भाताप्रमाणेच पेंढाही चांगला सुकला नाही तर तो दमट होऊन जनावरांसाठी निरूपयोगी होतो. आता भातशेती कापणीतून गेल्याने भाताचे दाणे हे अखंड येणार नाहीत. त्याचे तुकडे होणार असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. शेतकºयांच्या डोक्यावर ‘माहा’ वादळाचे संकट घोंघावत आहे. सध्या उन्हामुळे जी शेती करपली आहे, त्या भाताचा तांदूळ हा काळपट रंगाचा होईल, अशी भीती आहे.पंचनामे करण्यासाठीपथक शेतावरलांजा तालुक्यात १२३ गावे आहेत. या गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांच्याकडे ३६ गावे, ग्रामसेवकांकडे ५४ गावे आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे ३३ गावे अशी विभागणी करुन नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.