शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:17 IST

अनिल कासारे। लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे ...

अनिल कासारे।लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जनावरांना लागणारी वैरणही वाया गेल्याने जनावरांना वर्षभर खायला घालायचे काय? यांची चिंता आता शेतकऱ्यांना पडली आहे.यावर्षी पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांची परीक्षा होती. मुळात पाऊस उशिरा आल्याने शेतीचे वेळापत्रक उशिरानेच सुरू झाले. हळवी भातशेती गणपती उत्सव कालावधीत कापणीला येते, हे सर्वसाधारण गणित. पण गणपती उत्सवादरम्यानही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्याने कापणी झाली नाही.आॅक्टोबर उजाडला तरी पाऊस थांबला नाही. त्यातच आलेल्या क्यार वादळाने शेतकºयांची झोप उडवली. या वादळामुळे जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस व वाºयामुळे भातशेती आडवी झाली. शेतामध्ये साचलेल्या पाण्यात भातशेती पडल्याने पिकाला पुन्हा कोंब आले. पाण्यात राहिल्याने भातशेती कुजून गेली. त्यामुळे जनावरांना लागणारी वैरणही वाया गेली. आता दिवाळी संपत आली तरी भातशेतीची कापणी झाली नसल्याने नाचणी व इतर शेतीची कापणी करायची तरी कधी, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.सद्यस्थितीत हळवी भातशेती करपली आहे. कापणी करताना भाताची लोंब अर्धवट तुटून शेतात पडत असल्याने शेतकºयांना पडलेल्या लोंब्या जमा कराव्या लागत आहेत. पिकलेल्या भातशेतीतील निम्मे भात शेतात पडल्याने ते गोळळा करण्यातच शेतकºयांचा वेळ वाया जात आहे. हळव्या शेतीबरोबरच गरवी शेतीही कापणीला आली आहे. मात्र, हळवी शेतीच अजून बाकी असल्याने पुढील कामही ठप्प आहे.भाताबरोबरच नाचणी शेतीही जमिनीवर पडली आहे. आता उघडीप मिळाल्याने शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतांमध्ये अजून पाणी असल्याने कापणी करताना अडचण येत आहेत. भाताप्रमाणेच पेंढाही चांगला सुकला नाही तर तो दमट होऊन जनावरांसाठी निरूपयोगी होतो. आता भातशेती कापणीतून गेल्याने भाताचे दाणे हे अखंड येणार नाहीत. त्याचे तुकडे होणार असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. शेतकºयांच्या डोक्यावर ‘माहा’ वादळाचे संकट घोंघावत आहे. सध्या उन्हामुळे जी शेती करपली आहे, त्या भाताचा तांदूळ हा काळपट रंगाचा होईल, अशी भीती आहे.पंचनामे करण्यासाठीपथक शेतावरलांजा तालुक्यात १२३ गावे आहेत. या गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांच्याकडे ३६ गावे, ग्रामसेवकांकडे ५४ गावे आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे ३३ गावे अशी विभागणी करुन नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.