शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हातातोंडाशी आलेले पन्नास टक्के पीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:17 IST

अनिल कासारे। लोकमत न्यूज नेटवर्क लांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे ...

अनिल कासारे।लोकमत न्यूज नेटवर्कलांजा : क्यार वादळामुळे ऐन भातकापणीच्या हंगामात पडलेल्या पावसाने तालुक्यातील जवळजवळ पन्नास टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. जनावरांना लागणारी वैरणही वाया गेल्याने जनावरांना वर्षभर खायला घालायचे काय? यांची चिंता आता शेतकऱ्यांना पडली आहे.यावर्षी पावसाळी हंगाम सुरू झाल्यापासूनच शेतकऱ्यांची परीक्षा होती. मुळात पाऊस उशिरा आल्याने शेतीचे वेळापत्रक उशिरानेच सुरू झाले. हळवी भातशेती गणपती उत्सव कालावधीत कापणीला येते, हे सर्वसाधारण गणित. पण गणपती उत्सवादरम्यानही पाऊस कमी होण्याचे नाव घेत नसल्याने कापणी झाली नाही.आॅक्टोबर उजाडला तरी पाऊस थांबला नाही. त्यातच आलेल्या क्यार वादळाने शेतकºयांची झोप उडवली. या वादळामुळे जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस व वाºयामुळे भातशेती आडवी झाली. शेतामध्ये साचलेल्या पाण्यात भातशेती पडल्याने पिकाला पुन्हा कोंब आले. पाण्यात राहिल्याने भातशेती कुजून गेली. त्यामुळे जनावरांना लागणारी वैरणही वाया गेली. आता दिवाळी संपत आली तरी भातशेतीची कापणी झाली नसल्याने नाचणी व इतर शेतीची कापणी करायची तरी कधी, हा प्रश्न शेतकºयांसमोर आहे.सद्यस्थितीत हळवी भातशेती करपली आहे. कापणी करताना भाताची लोंब अर्धवट तुटून शेतात पडत असल्याने शेतकºयांना पडलेल्या लोंब्या जमा कराव्या लागत आहेत. पिकलेल्या भातशेतीतील निम्मे भात शेतात पडल्याने ते गोळळा करण्यातच शेतकºयांचा वेळ वाया जात आहे. हळव्या शेतीबरोबरच गरवी शेतीही कापणीला आली आहे. मात्र, हळवी शेतीच अजून बाकी असल्याने पुढील कामही ठप्प आहे.भाताबरोबरच नाचणी शेतीही जमिनीवर पडली आहे. आता उघडीप मिळाल्याने शेतकरी कापणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. शेतांमध्ये अजून पाणी असल्याने कापणी करताना अडचण येत आहेत. भाताप्रमाणेच पेंढाही चांगला सुकला नाही तर तो दमट होऊन जनावरांसाठी निरूपयोगी होतो. आता भातशेती कापणीतून गेल्याने भाताचे दाणे हे अखंड येणार नाहीत. त्याचे तुकडे होणार असल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. शेतकºयांच्या डोक्यावर ‘माहा’ वादळाचे संकट घोंघावत आहे. सध्या उन्हामुळे जी शेती करपली आहे, त्या भाताचा तांदूळ हा काळपट रंगाचा होईल, अशी भीती आहे.पंचनामे करण्यासाठीपथक शेतावरलांजा तालुक्यात १२३ गावे आहेत. या गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी यांच्याकडे ३६ गावे, ग्रामसेवकांकडे ५४ गावे आणि कृषी सहाय्यक यांच्याकडे ३३ गावे अशी विभागणी करुन नुकसानाचे पंचनामे करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.