शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

चिपळूण विभागातील पन्नास टक्के वीज पुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, ...

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर महावितरणच्या पथकाने प्रयत्न करून आतापर्यंत २५ हजार ९३७ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला असला, तरी अद्याप २५ हजार ४० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे.

पुराचा वेढा शहर व परिसराला बसल्याने पाण्यामध्ये वीज पुरवठा सुरू ठेवणे धोकादायक होते. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने पाच हजारपेक्षा अधिक वीज मीटर नादुरूस्त झाले आहेत. इमारतींच्या दोन मजल्यांपर्यंत पाण्याची उंची राहिल्याने घरातील, दुकाने, कार्यालयातील विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत शिवाय विजेचे वायरिंग, मीटरही खराब झाले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा विजेच्या खांबापर्यंत पूर्ववत करण्यास यश प्राप्त झाले असले, तरी घरातील वायरिंग, वीज मीटर, बोर्ड, स्वीच, विजेचे दिवे यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच आवश्यकता असेल तर ते बदलावेत अन्यथा त्याच परिस्थितीत वीज पुरवठा सुरू करणे धोकादायक आहे.

खेड येथील १,४८,०८७, रत्नागिरी विभागातील १,१५,२७३ आणि चिपळूण विभागात ५०,९७७ मिळून एकूण ३,१४,३३७ वीज जोडण्या जिल्ह्यात बंद पडल्या होत्या. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासांत २,८७,७३७ वीज जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने वीज यंत्रणा पाण्यात बुडाल्याने आपत्कालिन परिस्थितीत वीज पुरवठा बंद करणे भाग पडले होते. चिपळुणातील महावितरणच्या चार उपकेंद्रांत पाणी भरले होते. खेर्डी उपकेंद्रात सात फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल, गाळाने भरली आहे. पूर ओसरताच चारपैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले. प्रथम सर्व कोरोना रूग्णालयांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष ज्या वीजवाहिन्या पाण्याला स्पर्श करत नाहीत व धोकादायक ठरू शकत नाहीत, अशा ठिकाणीच वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, विशाल शिवतारे व कैलास लवेकर हे प्रत्यक्ष भागात कार्यरत असल्याने अनेक निर्णय तातडीने घेत अंमलबजावणी करणे शक्य झाले.