शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

चिपळूण विभागातील पन्नास टक्के वीज पुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, ...

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर महावितरणच्या पथकाने प्रयत्न करून आतापर्यंत २५ हजार ९३७ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला असला, तरी अद्याप २५ हजार ४० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे.

पुराचा वेढा शहर व परिसराला बसल्याने पाण्यामध्ये वीज पुरवठा सुरू ठेवणे धोकादायक होते. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने पाच हजारपेक्षा अधिक वीज मीटर नादुरूस्त झाले आहेत. इमारतींच्या दोन मजल्यांपर्यंत पाण्याची उंची राहिल्याने घरातील, दुकाने, कार्यालयातील विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत शिवाय विजेचे वायरिंग, मीटरही खराब झाले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा विजेच्या खांबापर्यंत पूर्ववत करण्यास यश प्राप्त झाले असले, तरी घरातील वायरिंग, वीज मीटर, बोर्ड, स्वीच, विजेचे दिवे यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच आवश्यकता असेल तर ते बदलावेत अन्यथा त्याच परिस्थितीत वीज पुरवठा सुरू करणे धोकादायक आहे.

खेड येथील १,४८,०८७, रत्नागिरी विभागातील १,१५,२७३ आणि चिपळूण विभागात ५०,९७७ मिळून एकूण ३,१४,३३७ वीज जोडण्या जिल्ह्यात बंद पडल्या होत्या. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासांत २,८७,७३७ वीज जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने वीज यंत्रणा पाण्यात बुडाल्याने आपत्कालिन परिस्थितीत वीज पुरवठा बंद करणे भाग पडले होते. चिपळुणातील महावितरणच्या चार उपकेंद्रांत पाणी भरले होते. खेर्डी उपकेंद्रात सात फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल, गाळाने भरली आहे. पूर ओसरताच चारपैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले. प्रथम सर्व कोरोना रूग्णालयांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष ज्या वीजवाहिन्या पाण्याला स्पर्श करत नाहीत व धोकादायक ठरू शकत नाहीत, अशा ठिकाणीच वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, विशाल शिवतारे व कैलास लवेकर हे प्रत्यक्ष भागात कार्यरत असल्याने अनेक निर्णय तातडीने घेत अंमलबजावणी करणे शक्य झाले.