शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण विभागातील पन्नास टक्के वीज पुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:32 IST

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, ...

रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर महावितरणच्या पथकाने प्रयत्न करून आतापर्यंत २५ हजार ९३७ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला असला, तरी अद्याप २५ हजार ४० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे.

पुराचा वेढा शहर व परिसराला बसल्याने पाण्यामध्ये वीज पुरवठा सुरू ठेवणे धोकादायक होते. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने पाच हजारपेक्षा अधिक वीज मीटर नादुरूस्त झाले आहेत. इमारतींच्या दोन मजल्यांपर्यंत पाण्याची उंची राहिल्याने घरातील, दुकाने, कार्यालयातील विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत शिवाय विजेचे वायरिंग, मीटरही खराब झाले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा विजेच्या खांबापर्यंत पूर्ववत करण्यास यश प्राप्त झाले असले, तरी घरातील वायरिंग, वीज मीटर, बोर्ड, स्वीच, विजेचे दिवे यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच आवश्यकता असेल तर ते बदलावेत अन्यथा त्याच परिस्थितीत वीज पुरवठा सुरू करणे धोकादायक आहे.

खेड येथील १,४८,०८७, रत्नागिरी विभागातील १,१५,२७३ आणि चिपळूण विभागात ५०,९७७ मिळून एकूण ३,१४,३३७ वीज जोडण्या जिल्ह्यात बंद पडल्या होत्या. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासांत २,८७,७३७ वीज जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने वीज यंत्रणा पाण्यात बुडाल्याने आपत्कालिन परिस्थितीत वीज पुरवठा बंद करणे भाग पडले होते. चिपळुणातील महावितरणच्या चार उपकेंद्रांत पाणी भरले होते. खेर्डी उपकेंद्रात सात फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल, गाळाने भरली आहे. पूर ओसरताच चारपैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले. प्रथम सर्व कोरोना रूग्णालयांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष ज्या वीजवाहिन्या पाण्याला स्पर्श करत नाहीत व धोकादायक ठरू शकत नाहीत, अशा ठिकाणीच वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, विशाल शिवतारे व कैलास लवेकर हे प्रत्यक्ष भागात कार्यरत असल्याने अनेक निर्णय तातडीने घेत अंमलबजावणी करणे शक्य झाले.