शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
3
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
4
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
5
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
6
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
7
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
8
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
9
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
11
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
12
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
13
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
14
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
15
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
16
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
17
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
18
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
19
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
20
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?

यंदा उत्पादन घटण्याची भीती

By admin | Updated: July 3, 2014 00:35 IST

शास्त्रज्ञांचा अंदाज : उगवलेली रोपे करपण्याची शक्यता

दापोली : राज्यभरात मान्सूनने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. कोकणात दुबार पेरणीचे संकट नसले तरी जून महिन्यात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने पेरणी व भातलावणी उशिरा झाल्याने कोकणातील भातपिकाच्या उत्पादनात घट होऊ शकते, अशी भीती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे उत्पादन घेतले जाते. कोकणात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. त्यापैकी जवळजवळ १ हजार मिलिमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. परंतु यावर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.भातपेरणी झाल्यानंतर सुमारे ३ ते ४ आठवड्यात भात रोपांची लागवड करावी लागते. परंतु कमी पावसामुळे रोपांची वाढ झालेली नाही. त्याचबरोबर रोपांची योग्य पद्धतीने वाढ न झाल्याने पेरणी होऊनही रोपे लागवडीसाठी तयार नाहीत. त्याचबरोबर पाऊस नसल्याने भात लागवड वेळेत न झाल्याने भात पिकांचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.भात लागवड उशिरा झाल्यास दुबार पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना उशीर होऊन त्याचा परिणाम दुबार पिकावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला प्रत्यक्ष फटका बसणार नसला तरीही भातपिकाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांना यंदा आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.कोकणातील भातशेती अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडली. पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे रखडली आहेत.त्याचबरोबर भातपिकावर लष्करी आळीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. रोपावरील रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी बुरशीनाशके फवारण्याचा सल्ला विद्यापीठाकडून देण्यात आला असून, गेल्या कित्येक वर्षापासून पहिल्यांदाच जून महिन्यात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. (प्रतिनिधी)