शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बारशाला जाताना पित्याचा मृत्यू

By admin | Updated: May 14, 2016 00:27 IST

दोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडक

बारशाला जाताना पित्याचा मृत्यूदोन्ही चालक गंभीर : धामणी येथे कारची रिक्षाला धडकआरवली : मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे कार आणि रिक्षा यांच्या अपघातात विनोद मारुती गमरे (वय ३५,मूळ गाव, धामापूर-बौद्धवाडी) या तरुणाचा मृत्यू झाला. विनोद आपल्या मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी आला होता. रेल्वे स्थानकाकडून घराकडे जाताना हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गंभीर चालकांना डेरवणमधील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईमध्ये राहणारे विनोद गमरे हे आपल्या मुलीच्या बारशासाठी शुक्रवारी पहाटे रेल्वेने संगमेश्वर रोड, रेल्वे स्थानकावर उतरले. तेथून ते रिक्षाने आपल्या गावी धामापूर-बौद्धवाडी येथे जाण्यासाठी निघाले. ती रिक्षा त्यांच्या गावापर्यंत जाणार नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत दुसऱ्या एका रिक्षाचे (एमएच 0८ के १४३९) चालक लीलाधर पंडित (चिखली, ता. संगमेश्वर) यांना थांबविले.पंडित धामणीकडेच जात असल्याने गमरे त्यांच्या रिक्षामध्ये बसले आणि पुढे एक होंडा कार (एचआर २0 क्यू 00९0) त्यांच्या रिक्षाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात रिक्षा पूर्णपणे चेपली गेली. त्यामुळे रिक्षातील गमरे जागीच ठार झाले. रिक्षाचालक पंडित आणि कारचालक चमनलाल राजकुमार मित्तल (दिल्ली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लगेचच डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कारमध्ये अन्य दोघेजण होते. ते मुंबईहून गोव्याकडे जात होते. मात्र, त्यांच्याबाबत काहीच माहिती मिळू शकली नाही. (प्रतिनिधी)काळ आणि वेळ आलीच होती...गमरे यांच्या मुलीचे १९ मे रोजी बारसे होते. त्यासाठी ते आणि त्यांचे काही नातेवाईक मुंबईहून निघाले. इतर नातेवाईक दुसऱ्या रेल्वेने आले. गमरे त्यांच्या आधी निघाले असल्याने ते लवकरच्या रेल्वेमध्ये बसले. रेल्वेतून उतरल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी ते रिक्षामध्ये बसले. मात्र, ती रिक्षा त्यांच्या गावाकडे जाणारी नव्हती. त्यामुळे त्या रिक्षाचालकाने वाटेत धामणीकडे जाणाऱ्या रिक्षावाल्याला थांबविले आणि गमरे त्या रिक्षात जाऊन बसले. पुढे केवळ २00 मीटर अंतर गेल्यावरच हा अपघात झाला. गमरे यांचा काळ आणि वेळ एकत्र आल्याची प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटत होती.