शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:02 IST

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.

ठळक मुद्देसवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरारतेराजणांना वाचवणाऱ्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची उत्तुंग कामगिरी

रत्नागिरी : वेळ दुपारी साडेबाराची, पण मुसळधार पावसामुळे मावळतीनंतर असतं तसं वातावरण, सोसाट्याचा वारा जणू वादळच, एरवी मनोहरी वाटावा अशा धबधब्याने घेतलेलं अक्राळविक्राळ रूप आणि तशातच मदतीसाठी झालेला पुकारा. जवळजवळ दोन हजार पर्यटक आणि प्रत्यक्ष मदतकार्य करणारे सहाजण.

चौघेजण पाण्याच्या वेगवान प्रवाहात मधोमध झाडांच्या तुकड्याचा आधाराने उभे राहिलेले आणि नऊजण प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला. साऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं. तिथून पुढे तब्बल तीन तास याच वातावरणात सुरू असलेला बचावाचा थरार.. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.१३ पर्यटकांचा जीव वाचवणाºया या ह्यरत्नदुर्गह्णच्या रत्नांचा ह्यलोकमतह्णच्या रत्नागिरी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी हा थरार मांडला. रत्नदुर्गचे जितेंद्र शिंदे म्हणाले की, सवतकडा १८० फुटांचा असून, अत्यंत सुरक्षित असा हा धबधबा आहे. रविवारी संस्थेने या वॉटरफॉलवर रॅपलिंग अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित केली होती.

रविवारी सकाळी पाऊस कमी होता. दुपारपर्यंत रॅपलिंग सुरू होते. दुपारनंतर अचानक सारा नूरच पालटला. पाणी वाढल्याने संस्थेचे सदस्य रॅपलिंगची आधीची जागा सोडून सुरक्षित जागी गेले. परंतु अवघ्या १५ मिनिटात तेथील १ फूट उंचीचे पाणी तीन फूट झाले. त्यामुळे आम्ही परतीची तयारी करत होतो आणि कोणीतरी मदतीसाठी आवाज दिला.कड्याच्या खाली पाण्यात मध्यभागी दोघे फसले होते. त्याखालील कड्यावर आणखी दोघे फसलेले होते. त्यांना प्रथम वाचविणे आवश्यक होते. रत्नदुर्गच्या सदस्यांनी रॅपलिंगचा रोप झाडाला बांधला. मधोमध फसलेल्या दोघांना रोप टाकून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. त्यानंतर कड्याच्या खालच्या बाजूला झाडांमध्ये फसलेल्या इतर दोघांना वाचविण्यासाठी अक्षय व सूरज हे दोघेही सरसावले. त्यांना वाचविण्यात आले. त्यानंतर एका झाडाला रोप बांधून पलिकडच्या बाजूला अडकलेल्या आणखी ९ जणांना वाचवण्यात आले.बचाव कार्याच्या वेळी सर्वांचीच धावाधावधबधब्याने उग्र रुप धारण केल्यानंतर सर्वांचीच पळापळ झाली. बचाव कार्यासाठी आम्हाला यंत्रणा लावताना, रोप फिक्स करण्यासाठी या गर्दीतून वाट काढताना अमेय पावसकरसारख्या पर्यटकाने खूप मदत केली. रोप फिक्स करून नंतर रोप त्या अडकलेल्या पर्यटकांकडे टाकला. त्यांनीही योग्य साथ दिल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले. या प्रकारे सर्व १३ जणांना वाचविण्यात आले, असे रत्नदुर्गचे फिल्ड इन्चार्ज गणेश चौगुले यांनी सांगितले. यावेळी फिल्ड इन्चार्ज जितेंद्र शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु, खजिनदार शैलेश नार्वेकर, सदस्य पराग सुर्वे, विक्रम चौगुले, प्रांजल चोप्रा, सूरज बावने, हर्ष जैन उपस्थित होते. ह्यलोकमतह्णतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.रत्नदुर्ग ऐन तारुण्यात!रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेने आता पंचवीशीत म्हणजेच ऐन तारुण्यात पदार्पण केले आहे. या पंचवीशीपर्यंतच्या वाटचालीत गिर्यारोहणअंतर्गत येणारे रॅपलिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहणाचे निवासी शिबिर, व्हॅली क्रॉसिंग, हिमालयीन ट्रेक यांसारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले व राबविले जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून आपत्कालिन स्थितीत बचावकार्यातही संस्थेचा सहभाग आहे.पर्यटक सुरक्षा महत्त्वाचीचसवतकड्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक आहे. जिल्हाधिकारीपदी विकास रस्तोगी असताना त्यांनी या ठिकाणापर्यंत रस्त्याची कामगिरी सुरू केली होती. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हवेच, असे रत्नदुर्गचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु म्हणाले. शासन सांगत असेल तर स्थानिक तरुणांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्याची रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची तयारी आहे, असे जितेंद्र शिंदे म्हणाले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी