शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:02 IST

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.

ठळक मुद्देसवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरारतेराजणांना वाचवणाऱ्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची उत्तुंग कामगिरी

रत्नागिरी : वेळ दुपारी साडेबाराची, पण मुसळधार पावसामुळे मावळतीनंतर असतं तसं वातावरण, सोसाट्याचा वारा जणू वादळच, एरवी मनोहरी वाटावा अशा धबधब्याने घेतलेलं अक्राळविक्राळ रूप आणि तशातच मदतीसाठी झालेला पुकारा. जवळजवळ दोन हजार पर्यटक आणि प्रत्यक्ष मदतकार्य करणारे सहाजण.

चौघेजण पाण्याच्या वेगवान प्रवाहात मधोमध झाडांच्या तुकड्याचा आधाराने उभे राहिलेले आणि नऊजण प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला. साऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं. तिथून पुढे तब्बल तीन तास याच वातावरणात सुरू असलेला बचावाचा थरार.. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.१३ पर्यटकांचा जीव वाचवणाºया या ह्यरत्नदुर्गह्णच्या रत्नांचा ह्यलोकमतह्णच्या रत्नागिरी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी हा थरार मांडला. रत्नदुर्गचे जितेंद्र शिंदे म्हणाले की, सवतकडा १८० फुटांचा असून, अत्यंत सुरक्षित असा हा धबधबा आहे. रविवारी संस्थेने या वॉटरफॉलवर रॅपलिंग अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित केली होती.

रविवारी सकाळी पाऊस कमी होता. दुपारपर्यंत रॅपलिंग सुरू होते. दुपारनंतर अचानक सारा नूरच पालटला. पाणी वाढल्याने संस्थेचे सदस्य रॅपलिंगची आधीची जागा सोडून सुरक्षित जागी गेले. परंतु अवघ्या १५ मिनिटात तेथील १ फूट उंचीचे पाणी तीन फूट झाले. त्यामुळे आम्ही परतीची तयारी करत होतो आणि कोणीतरी मदतीसाठी आवाज दिला.कड्याच्या खाली पाण्यात मध्यभागी दोघे फसले होते. त्याखालील कड्यावर आणखी दोघे फसलेले होते. त्यांना प्रथम वाचविणे आवश्यक होते. रत्नदुर्गच्या सदस्यांनी रॅपलिंगचा रोप झाडाला बांधला. मधोमध फसलेल्या दोघांना रोप टाकून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. त्यानंतर कड्याच्या खालच्या बाजूला झाडांमध्ये फसलेल्या इतर दोघांना वाचविण्यासाठी अक्षय व सूरज हे दोघेही सरसावले. त्यांना वाचविण्यात आले. त्यानंतर एका झाडाला रोप बांधून पलिकडच्या बाजूला अडकलेल्या आणखी ९ जणांना वाचवण्यात आले.बचाव कार्याच्या वेळी सर्वांचीच धावाधावधबधब्याने उग्र रुप धारण केल्यानंतर सर्वांचीच पळापळ झाली. बचाव कार्यासाठी आम्हाला यंत्रणा लावताना, रोप फिक्स करण्यासाठी या गर्दीतून वाट काढताना अमेय पावसकरसारख्या पर्यटकाने खूप मदत केली. रोप फिक्स करून नंतर रोप त्या अडकलेल्या पर्यटकांकडे टाकला. त्यांनीही योग्य साथ दिल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले. या प्रकारे सर्व १३ जणांना वाचविण्यात आले, असे रत्नदुर्गचे फिल्ड इन्चार्ज गणेश चौगुले यांनी सांगितले. यावेळी फिल्ड इन्चार्ज जितेंद्र शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु, खजिनदार शैलेश नार्वेकर, सदस्य पराग सुर्वे, विक्रम चौगुले, प्रांजल चोप्रा, सूरज बावने, हर्ष जैन उपस्थित होते. ह्यलोकमतह्णतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.रत्नदुर्ग ऐन तारुण्यात!रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेने आता पंचवीशीत म्हणजेच ऐन तारुण्यात पदार्पण केले आहे. या पंचवीशीपर्यंतच्या वाटचालीत गिर्यारोहणअंतर्गत येणारे रॅपलिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहणाचे निवासी शिबिर, व्हॅली क्रॉसिंग, हिमालयीन ट्रेक यांसारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले व राबविले जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून आपत्कालिन स्थितीत बचावकार्यातही संस्थेचा सहभाग आहे.पर्यटक सुरक्षा महत्त्वाचीचसवतकड्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक आहे. जिल्हाधिकारीपदी विकास रस्तोगी असताना त्यांनी या ठिकाणापर्यंत रस्त्याची कामगिरी सुरू केली होती. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हवेच, असे रत्नदुर्गचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु म्हणाले. शासन सांगत असेल तर स्थानिक तरुणांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्याची रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची तयारी आहे, असे जितेंद्र शिंदे म्हणाले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी