शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 17:02 IST

रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.

ठळक मुद्देसवतकड्यावरील जीवघेणा प्रसंग, धो-धो पाऊस, वादळ अन् बचावाचा थरारतेराजणांना वाचवणाऱ्या रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची उत्तुंग कामगिरी

रत्नागिरी : वेळ दुपारी साडेबाराची, पण मुसळधार पावसामुळे मावळतीनंतर असतं तसं वातावरण, सोसाट्याचा वारा जणू वादळच, एरवी मनोहरी वाटावा अशा धबधब्याने घेतलेलं अक्राळविक्राळ रूप आणि तशातच मदतीसाठी झालेला पुकारा. जवळजवळ दोन हजार पर्यटक आणि प्रत्यक्ष मदतकार्य करणारे सहाजण.

चौघेजण पाण्याच्या वेगवान प्रवाहात मधोमध झाडांच्या तुकड्याचा आधाराने उभे राहिलेले आणि नऊजण प्रवाहाच्या विरूद्ध दिशेला. साऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचं. तिथून पुढे तब्बल तीन तास याच वातावरणात सुरू असलेला बचावाचा थरार.. रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सच्या सदस्यांनी जीवाचे रान केले आणि राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधब्यामध्ये अडकलेल्या १३ पर्यटकांना जीवदान दिले. दोन वाजता सुरू झालेली ही मोहीम तब्बल तीन तासांनी फत्ते झाली.१३ पर्यटकांचा जीव वाचवणाºया या ह्यरत्नदुर्गह्णच्या रत्नांचा ह्यलोकमतह्णच्या रत्नागिरी कार्यालयात सोमवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. तेव्हा त्यांनी हा थरार मांडला. रत्नदुर्गचे जितेंद्र शिंदे म्हणाले की, सवतकडा १८० फुटांचा असून, अत्यंत सुरक्षित असा हा धबधबा आहे. रविवारी संस्थेने या वॉटरफॉलवर रॅपलिंग अ‍ॅक्टिव्हिटी आयोजित केली होती.

रविवारी सकाळी पाऊस कमी होता. दुपारपर्यंत रॅपलिंग सुरू होते. दुपारनंतर अचानक सारा नूरच पालटला. पाणी वाढल्याने संस्थेचे सदस्य रॅपलिंगची आधीची जागा सोडून सुरक्षित जागी गेले. परंतु अवघ्या १५ मिनिटात तेथील १ फूट उंचीचे पाणी तीन फूट झाले. त्यामुळे आम्ही परतीची तयारी करत होतो आणि कोणीतरी मदतीसाठी आवाज दिला.कड्याच्या खाली पाण्यात मध्यभागी दोघे फसले होते. त्याखालील कड्यावर आणखी दोघे फसलेले होते. त्यांना प्रथम वाचविणे आवश्यक होते. रत्नदुर्गच्या सदस्यांनी रॅपलिंगचा रोप झाडाला बांधला. मधोमध फसलेल्या दोघांना रोप टाकून सुरक्षितरित्या बाहेर काढले गेले. त्यानंतर कड्याच्या खालच्या बाजूला झाडांमध्ये फसलेल्या इतर दोघांना वाचविण्यासाठी अक्षय व सूरज हे दोघेही सरसावले. त्यांना वाचविण्यात आले. त्यानंतर एका झाडाला रोप बांधून पलिकडच्या बाजूला अडकलेल्या आणखी ९ जणांना वाचवण्यात आले.बचाव कार्याच्या वेळी सर्वांचीच धावाधावधबधब्याने उग्र रुप धारण केल्यानंतर सर्वांचीच पळापळ झाली. बचाव कार्यासाठी आम्हाला यंत्रणा लावताना, रोप फिक्स करण्यासाठी या गर्दीतून वाट काढताना अमेय पावसकरसारख्या पर्यटकाने खूप मदत केली. रोप फिक्स करून नंतर रोप त्या अडकलेल्या पर्यटकांकडे टाकला. त्यांनीही योग्य साथ दिल्याने त्यांना वाचविणे शक्य झाले. या प्रकारे सर्व १३ जणांना वाचविण्यात आले, असे रत्नदुर्गचे फिल्ड इन्चार्ज गणेश चौगुले यांनी सांगितले. यावेळी फिल्ड इन्चार्ज जितेंद्र शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु, खजिनदार शैलेश नार्वेकर, सदस्य पराग सुर्वे, विक्रम चौगुले, प्रांजल चोप्रा, सूरज बावने, हर्ष जैन उपस्थित होते. ह्यलोकमतह्णतर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.रत्नदुर्ग ऐन तारुण्यात!रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेने आता पंचवीशीत म्हणजेच ऐन तारुण्यात पदार्पण केले आहे. या पंचवीशीपर्यंतच्या वाटचालीत गिर्यारोहणअंतर्गत येणारे रॅपलिंग, ट्रेकिंग, गिर्यारोहणाचे निवासी शिबिर, व्हॅली क्रॉसिंग, हिमालयीन ट्रेक यांसारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात आले व राबविले जात आहेत. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीतून आपत्कालिन स्थितीत बचावकार्यातही संस्थेचा सहभाग आहे.पर्यटक सुरक्षा महत्त्वाचीचसवतकड्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आवश्यक आहे. जिल्हाधिकारीपदी विकास रस्तोगी असताना त्यांनी या ठिकाणापर्यंत रस्त्याची कामगिरी सुरू केली होती. या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य हवेच, असे रत्नदुर्गचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजु म्हणाले. शासन सांगत असेल तर स्थानिक तरुणांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण देण्याची रत्नदुर्ग माऊंटेनिअर्सची तयारी आहे, असे जितेंद्र शिंदे म्हणाले. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Ratnagiriरत्नागिरी