शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

हातिवलेत दोन एसटींचा भीषण अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 00:35 IST

एक ठार, ७१ जखमी : ९ गंभीर, दोन्ही चालकांसह तिघांची प्रकृती अत्यवस्थ

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे दोन एस. टी. बसेसची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये धोपेश्वर खांबलवाडी (राजापूर) येथील यशोदा यशवंत खांबल ही ६५ वर्षीय महिला जागीच ठार झाली. या अपघातात ७१ प्रवासी जखमी झाले असून, ९ जणांना पुढील उपचारार्थ रत्नागिरीला हलवण्यात आले आहे. दोन्ही बसचालकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तसेच अन्य एका प्रवाशाला अधिक उपचारासाठी रत्नागिरीतून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे. जखमी प्रवाशांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.शुक्रवारी सकाळी राजापूर आगारातून हातिवले येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाकडे जाणारी कॉलेज बस (एमएच- १४/ बीटी 0१८८) विद्यार्थ्यांसह प्रवासी घेऊन जात होती. एम. डी. मोरे बसचालक होते. महामार्गावरील हातिवले येथे हॉटेल अंकिता पॅलेसजवळील एका वळणावर एक टेम्पो महामार्गाच्या कडेला उभा होता. महाविद्यालयाकडे जाणारी बस टेम्पोला ओव्हरटेक करून पुढे जात असतानाच समोरून जुवाठी-राजापूर (एमएच- १४/ बीटी २०४३) ही बस आली. ही बस प्रमोद भगवान वाकोडे चालवत होते. या दोन्ही गाड्या एकमेकांवर जबरदस्त आपटल्या. इतका मोठा आवाज झाला की हातिवले येथील ग्रामस्थ गाड्यांच्या दिशेने धावत आले. अचानक घडलेल्या या प्रकाराने दोन्ही गाड्यांमध्ये मोठी आरडाओरड झाली. अनेक प्रवाशांची तोंडे समोरच्या सीटवर आपटली. काहींच्या तोंडाला तर काहींच्या नाकाला मार लागून रक्त वाहू लागले.या अपघाताची माहिती मिळताच राजापूर आगारासह राजापूर पोलिस स्थानकाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तोवर मदतकार्य सुरू झाले होते. या घटनेमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ही धडक एवढी भयानक होती की, दोन्ही बसेसच्या चालकांना ओढून बाहेर काढावे लागले. तोवर राजापुरातून रुग्णवाहिका दाखल झाल्या. महाविद्यालयासाठीच्या बसमधून हातिवले येथील आपल्या मुलीकडे चाललेल्या धोपेश्वर खांबलवाडीतील श्रीमती यशोदा खांबल यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील सर्व जखमींना तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.या अपघातामध्ये एस. टी. चालक मानसिंग मोरे, प्रमोद वाकोडे यांच्यासह संदीप वेलणकर, भिकाजी आपटे, श्रध्दा नंदकिशोर मयेकर, नयन आरेकर, योगिता प्रकाश तरळ, गणेश मांडवकर व सदाफ मुनीर बंदरकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. यातील मोरे आणि वाकोडे या दोन्ही चालकांसह संदीप वेलणकर यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून कोल्हापूरला हलवण्यात आले आहे.या अपघातानंतर एसटीचे रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी तत्काळ राजापूर ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. (प्रतिनिधी)चौकटवैद्यकीय अधीक्षक गैरहजरया अपघातानंतर राजापूर ग्रामीण रुग्णालयात असणारे डॉ. मेस्त्री वगळता अन्य कोणतेही डॉक्टर उपस्थित नव्हते. राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश चव्हाण हे सकाळपासून रुग्णालयात हजर नव्हते. अनेकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते फोन उचलत नव्हते. त्यामुळे उपस्थितांमध्ये संतप्त चर्चा सुरू होती.चार रुग्णवाहिकाअपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारार्थ रत्नागिरीला हलवण्यासाठी रायपाटण, हातखंबा, पावस येथील १०८ क्रमांकाशी संलग्न अ‍ॅम्बुलन्सना तत्काळ बोलावण्यात आले. नेहमीप्रमाणे नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाली होती.देव तारी त्याला...जुवाठी बसमधून प्रवास करणाऱ्या तृप्ती हरिष जोशी यांचा एक वर्षाचा मुलगा नयन हा सीट खाली पडला होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.खासगी डॉक्टर्स मदतीला धावलेजखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयाकडे हलवण्यात आले. पण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे कळताच राजापूर शहरात खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या अनेक डॉक्टर्सनी रुग्णालयाकडे धाव घेतली आणि जखमींवर उपचार सुरू केले. यामध्ये डॉ. सागर पाटील, डॉ. पी. एस. बावकर, डॉ. मांडवकर, डॉ. पावसकर, डॉ. बाईत, डॉ. बी. डी. पाध्ये, डॉ. सुयोग परांजपे, आदींचा समावेश होता. जवळच्याच ओणी, धारतळे, सोलगाव, इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही येथे पाचारण करण्यात आले होते.