शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

शेतीमालाला चांगला भाव गरजेचा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

सुधीर चव्हाण : खेर्डी येथे खरेदीदार, विक्रेता चर्चासत्रात मार्गदर्शन

अडरे : आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याकरिता उत्पादन तंत्राबरोबरच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाची योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक सुधीर चव्हाण यांनी केले आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, आंबा व काजू पिकाचे उत्पादक शेतकरी तसेच प्रक्रिया व निर्यातदार उद्योजकांचे खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कोकण फळ प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष धनंजय यादव, मंडणगडचे शेतकरी दिनेश पेडणेकर, धनंजय शिगवण, सुभाष पवार आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या एम. आय. डी. एच. यांत्रिकीकरण, आय. डब्ल्यू. एम. पी., मँगोनेटसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन पॅकहाऊस प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशीचे डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये आंबा व काजूचे उत्पादन घेण्याकरिता समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पर्यायी पिकाची जसे काळीमिरी, कोकम, फणस व इतर भाजीपाला मसाला पिकांची लागवड करुन त्याच्यावर योग्य प्रक्रिया करुन चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर येथील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास जाधव यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)