शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

शेतीमालाला चांगला भाव गरजेचा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

सुधीर चव्हाण : खेर्डी येथे खरेदीदार, विक्रेता चर्चासत्रात मार्गदर्शन

अडरे : आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याकरिता उत्पादन तंत्राबरोबरच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाची योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक सुधीर चव्हाण यांनी केले आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, आंबा व काजू पिकाचे उत्पादक शेतकरी तसेच प्रक्रिया व निर्यातदार उद्योजकांचे खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कोकण फळ प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष धनंजय यादव, मंडणगडचे शेतकरी दिनेश पेडणेकर, धनंजय शिगवण, सुभाष पवार आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या एम. आय. डी. एच. यांत्रिकीकरण, आय. डब्ल्यू. एम. पी., मँगोनेटसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन पॅकहाऊस प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशीचे डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये आंबा व काजूचे उत्पादन घेण्याकरिता समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पर्यायी पिकाची जसे काळीमिरी, कोकम, फणस व इतर भाजीपाला मसाला पिकांची लागवड करुन त्याच्यावर योग्य प्रक्रिया करुन चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर येथील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास जाधव यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)