शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

शेतीमालाला चांगला भाव गरजेचा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

सुधीर चव्हाण : खेर्डी येथे खरेदीदार, विक्रेता चर्चासत्रात मार्गदर्शन

अडरे : आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याकरिता उत्पादन तंत्राबरोबरच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाची योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक सुधीर चव्हाण यांनी केले आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, आंबा व काजू पिकाचे उत्पादक शेतकरी तसेच प्रक्रिया व निर्यातदार उद्योजकांचे खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कोकण फळ प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष धनंजय यादव, मंडणगडचे शेतकरी दिनेश पेडणेकर, धनंजय शिगवण, सुभाष पवार आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या एम. आय. डी. एच. यांत्रिकीकरण, आय. डब्ल्यू. एम. पी., मँगोनेटसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन पॅकहाऊस प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशीचे डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये आंबा व काजूचे उत्पादन घेण्याकरिता समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पर्यायी पिकाची जसे काळीमिरी, कोकम, फणस व इतर भाजीपाला मसाला पिकांची लागवड करुन त्याच्यावर योग्य प्रक्रिया करुन चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर येथील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास जाधव यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)