शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेतीमालाला चांगला भाव गरजेचा

By admin | Updated: March 30, 2015 00:25 IST

सुधीर चव्हाण : खेर्डी येथे खरेदीदार, विक्रेता चर्चासत्रात मार्गदर्शन

अडरे : आपल्या शेतमालाला चांगला भाव मिळण्याकरिता उत्पादन तंत्राबरोबरच काढणीपश्चात तंत्रज्ञान, शेतमालाची योग्य काढणी, हाताळणी, प्रतवारी, पॅकिंग व प्रक्रिया याकडे शेतकऱ्यांनी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रकल्प संचालक सुधीर चव्हाण यांनी केले आहे. चिपळूण तालुक्यातील खेर्डी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबवण्यात येत असून, आंबा व काजू पिकाचे उत्पादक शेतकरी तसेच प्रक्रिया व निर्यातदार उद्योजकांचे खरेदीदार विक्रेता संमेलन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे, डॉ. वैभव शिंदे, जयवंत विचारे, कोकण फळ प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष धनंजय यादव, मंडणगडचे शेतकरी दिनेश पेडणेकर, धनंजय शिगवण, सुभाष पवार आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या एम. आय. डी. एच. यांत्रिकीकरण, आय. डब्ल्यू. एम. पी., मँगोनेटसारख्या योजनांचा शेतकऱ्यांनी फायदा घेऊन पॅकहाऊस प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून आपल्या शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याचे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी रघुनाथ सरतापे यांनी केले आहे. मृदसंधारण संशोधन केंद्र, आवाशीचे डॉ. वैभव शिंदे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सध्याच्या हवामान परिस्थितीमध्ये आंबा व काजूचे उत्पादन घेण्याकरिता समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. एकाच पिकावर अवलंबून न राहता पिकांमध्ये बदल करण्याची गरज आहे. पर्यायी पिकाची जसे काळीमिरी, कोकम, फणस व इतर भाजीपाला मसाला पिकांची लागवड करुन त्याच्यावर योग्य प्रक्रिया करुन चांगल्या प्रकारचे उत्पादन घेणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, गुहागर येथील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास जाधव यांनी केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)