शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

नातूवाडीचे पाणी बंद केल्याने शेतकरी संकटात

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाकडे केवळ ३ टँकर्स आहेत. त्यातच खेड शहराला नातूवाडी धरणातून करण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने आणखी एक समस्या उभी राहिली आहे. या गावांना पाणीपुवठा करणार्‍या नातूवाडी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने धरणातील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर खेड शहरासाठी याच धरणातून दररोज उपसा होणारे ३० लाख लीटर पाणी आता बंद करण्यात आले आहे. या धरणातून केवळ दुबार शेती करणार्‍यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त गावांसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करता यावा, याकरिता धरण प्रशासनाने १५ टक्के पाणी आरक्षित ठेवल्याची माहिती नातूवाडी प्रकल्पाचे उपअभियंता पी़ चिदंबरम यांनी दिली. नातूवाडी प्रकल्पाअंतर्गत १७ गावांतील शेतजमीन ओलिताखाली आहे. याकरिता धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणी क्षमता १२८ दशलक्ष घनमीटर आहे, तर सध्या पाणीसाठी केवळ ५५ दशलक्ष घनमीटर आहे. दुबार शेती करणार्‍यांना यातील पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी कमी झाले आहे. यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याकरिता १५ टक्के पाणीसाठा आरक्षित केल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. ५५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी हे पाणी आरक्षित करण्यात आल्याने खेड शहरासाठी दररोज पुरवण्यात येणारे ३० लाख लीटर पाणी बंद करण्यात आले आहे. धरण प्रशासनाने याविषयी नगरपालिका प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, नातूवाडी धरण प्रशासनाने पाणी सोडणे बंद केल्याने नगरपालिकेने खोपी धरण प्रशासनाला पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे खेड नगरपालिकेला खोपी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. नातूवाडी धरणातील हे पाणी सध्या ज्या कालव्यातून दुबार शेतीसाठी पुरविले जात आहे. त्याच कालव्यातील पाणी सध्या सुकिवली येथील चोरद नदीत जमा होत असल्याने या नदीतील पाणी सध्या तालुक्यातील टंचाईगस्त गावांना व वाड्यांना टँकरद्वारे पुरविले जात आहे़ यापूर्वी शिरवली धरणातील पाणी काहीअंशी या नदीला पुरविले जात असे. आता शिरवली हे धरण नादुरूस्त आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्रासपणे नातूवाडी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शिवाय यापुढे तालुक्यात भीषण टंचाई जाणवल्यास याच धरणातील पाणी पुरवण्यात येणार असल्याची माहीती चिदंबरम यांनी दिली आहे़