शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

नातूवाडीचे पाणी बंद केल्याने शेतकरी संकटात

By admin | Updated: May 14, 2014 00:27 IST

श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

श्रीकांत चाळके ल्ल खेड खेड तालुक्यात पाणीटंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे.़ तालुक्यातील २२ गावे आणि ३० वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाकडे केवळ ३ टँकर्स आहेत. त्यातच खेड शहराला नातूवाडी धरणातून करण्यात येत असलेला पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने आणखी एक समस्या उभी राहिली आहे. या गावांना पाणीपुवठा करणार्‍या नातूवाडी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्याने धरणातील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर खेड शहरासाठी याच धरणातून दररोज उपसा होणारे ३० लाख लीटर पाणी आता बंद करण्यात आले आहे. या धरणातून केवळ दुबार शेती करणार्‍यांना पाणीपुरवठा करण्यात येत असून, टंचाईग्रस्त गावांसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करता यावा, याकरिता धरण प्रशासनाने १५ टक्के पाणी आरक्षित ठेवल्याची माहिती नातूवाडी प्रकल्पाचे उपअभियंता पी़ चिदंबरम यांनी दिली. नातूवाडी प्रकल्पाअंतर्गत १७ गावांतील शेतजमीन ओलिताखाली आहे. याकरिता धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणी क्षमता १२८ दशलक्ष घनमीटर आहे, तर सध्या पाणीसाठी केवळ ५५ दशलक्ष घनमीटर आहे. दुबार शेती करणार्‍यांना यातील पाणीपुरवठा केला जात असल्याने हे पाणी कमी झाले आहे. यामुळे धरण प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे. तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याकरिता १५ टक्के पाणीसाठा आरक्षित केल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. ५५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्यापैकी हे पाणी आरक्षित करण्यात आल्याने खेड शहरासाठी दररोज पुरवण्यात येणारे ३० लाख लीटर पाणी बंद करण्यात आले आहे. धरण प्रशासनाने याविषयी नगरपालिका प्रशासनाला कळविले आहे. दरम्यान, नातूवाडी धरण प्रशासनाने पाणी सोडणे बंद केल्याने नगरपालिकेने खोपी धरण प्रशासनाला पाणी सोडण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे खेड नगरपालिकेला खोपी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. नातूवाडी धरणातील हे पाणी सध्या ज्या कालव्यातून दुबार शेतीसाठी पुरविले जात आहे. त्याच कालव्यातील पाणी सध्या सुकिवली येथील चोरद नदीत जमा होत असल्याने या नदीतील पाणी सध्या तालुक्यातील टंचाईगस्त गावांना व वाड्यांना टँकरद्वारे पुरविले जात आहे़ यापूर्वी शिरवली धरणातील पाणी काहीअंशी या नदीला पुरविले जात असे. आता शिरवली हे धरण नादुरूस्त आहे. त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने या धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सर्रासपणे नातूवाडी धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. शिवाय यापुढे तालुक्यात भीषण टंचाई जाणवल्यास याच धरणातील पाणी पुरवण्यात येणार असल्याची माहीती चिदंबरम यांनी दिली आहे़