शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
4
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
5
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
6
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
7
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
8
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
9
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
10
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
11
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
12
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
Indian Railways Crisis: '...तर रेल्वेमध्येही इंडिगोसारखी परिस्थिती उद्भवू शकते, थकव्यामुळे धोका वाढवतोय;' आता लोको पायलट्सनं दिला इशारा
14
IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्ट्री
15
Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत
16
आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर
17
शिक्षण घेण्यासाठी आलेल्या हिमांशीला बनवलं २४ तास राबणारी नॅनी; राजकीय नेत्याला ४८ लाखांचा दंड!
18
वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिका सोडून भारतात यावं लागलं; आज बनले YouTube चे सर्वात मोठे बॉस
19
बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार
20
लग्नाच्या ७ वर्षांनी मराठी अभिनेत्रीने बदललं स्वत:चं नाव, म्हणाली- "मी हा निर्णय घेतला कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:47 IST

शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

ठळक मुद्देअनुदानाचा लाभ घेणारे शेतकरी घटले, रोजगार हमी योजना रेंगाळली ग्रामसेवकांच्या असहकार्य आंदोलनाचा परिणाम

रत्नागिरी : शेतकरी यावर्षी कमी संख्येने फळबाग लागवडीकडे वळल्याने लागवडीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दोन वर्षांपेक्षा यावर्षी रोजगार हमी योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.फळबाग लागवड रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबविणारा रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या प्रयत्नामुळे प्रारंभीच्या दोन वर्षात केवळ रत्नागिरीतच १० हजार हेक्टर पडीक क्षेत्रावर लागवड झाली होती.

२०१७ -१८ साली जिल्ह्यात नऊ पंचायत समित्यांच्या माध्यमातून १९३२.३० हेक्टर क्षेत्रावर, तर कृषी विभागाने ३०५१.३० अशी पाच हेक्टर हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड केली होती. सन २०१८ - १९ या वर्षातही पंचायत समिती आणि कृषी विभाग यांनी एकत्रित मिळून ५८९४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती.मात्र, २०१९-२० या वर्षात या योजनेच्या सुरूवातीपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी या योजनेला असहकार्य करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींतील फळबाग मोहिमेला खीळ बसली आहे. पंचायत समित्यांना दिलेले यावर्षीचे एकूण ८२६.४० हेक्टर आणि १३४३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट अपूर्ण राहिले असून केवळ ३०१.२५ हेक्टर क्षेत्रावरच यावर्षी लागवड झाली असून, १३४३ लाभार्थ्यांपैकी केवळ ४०७ लाभार्थ्यांचेच उद्दिष्ट पुर्ण झाले आहे.यावर्षी ग्रामसेवकांनीच या राष्ट्रीय कामाला असहकार दर्शविल्याने जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या माध्यमातून केवळ ३० टक्केच काम झाले आहे. यावर्षी ३०० हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून, शेतकऱ्यांच्या संख्येत घट झाली. केवळ ४०७ शेतकऱ्यांना या योजनेच्या अनुदानाचा लाभ मिळाला आहे. या योजनेच्या तिसऱ्या वर्षी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत या सर्व शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख ३८ हजार रूपयांचेच वाटप झाले.कृषी सहाय्यकयावर्षी कृषी सहाय्यकांनीच हातभार लावत ही योजना पुढे नेली आहे. यावर्षी कृषी विभागाला ५४६९ हेक्टर क्षेत्र आणि ८११८ लाभार्थी एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३७८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि ५९६६ लाभार्थ्यांना या योजनेच्या निधीचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षीचे कृषी विभागाने लाभार्थ्यांचे ७३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.धावून आले मदतीलादोन वर्षे अतिशय गती घेतलेल्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला यावर्षी खीळ बसल्याने सलग दोन वर्षे ९ हजारपेक्षा अधिक असलेल्या लाभार्थ्यांना २१ कोटीपेक्षा अधिक निधीचे वाटप झाले होते, यावर्षी केवळ ४०७ शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाख एवढ्या निधीचा लाभ घेता आला. ग्रामसेवकांच्या असहकार्यामुळे फळबाग लागवडीला फटका बसला.

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी