शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

बारसू-सोलगावमधील शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

राजापूर : नाणारप्रमाणेच रिफायनरी प्रकल्प होण्याची चर्चा असलेल्या बारसू-सोलगाव भागात सध्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, ...

राजापूर : नाणारप्रमाणेच रिफायनरी प्रकल्प होण्याची चर्चा असलेल्या बारसू-सोलगाव भागात सध्या जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, शेतकऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पडून आपल्या जमिनी विकू नयेत, असे आवाहन स्थानिक पातळीवरील दोन्ही रिफायनरी प्रकल्प समर्थक समित्यांनी केले आहे.

नाणारमध्ये परप्रांतीय गुंतवणूकदारांनी स्थानिक पातळीवर केलेल्या जमिनींच्या व्यवहारांमुळे तेथील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. तेथील प्रकल्पाची अधिसूचनाच रद्द झाल्याने त्यानंतर या तक्रारींचे पुढे काय झाले याबाबत अनभिज्ञता आहे. मात्र, बारसू-सोलगाव भागात एमआयडीसी प्रस्तावित असल्याने त्या भागात पुन्हा जमिनी खरेदी-विक्रींना जोर आलेला आहे.

बारसूमध्ये जर रिफायनरी प्रकल्प आला तर जमीनमालकांना भूसंपादनानंतर मोठा मोबदला मिळण्याची शक्यता आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी अणुऊर्जा प्रकल्पाकरिता झालेल्या भूसंपादनात हेक्टरी साडेबावीस लाख रुपयांचा मोबदला शासनाने प्रकल्पबाधितांना दिला होता. म्हणजे एकरी नऊ लाख रुपये देण्यात आलेले होते. बारा वर्षांनंतर या शासकीय मोबदल्यात घसघशीत वाढ होण्याची शक्यता असून, या भागातील जमीनमालकांनी औद्योगिक प्रकल्प वा रिफायनरीसाठी शासनाकडून जाहीर होणाऱ्या जमिनीच्या दराची वाट पाहावी. मात्र, कोणत्याही परप्रांतीय गुंतवणूकदार अथवा एजंटांच्या जाळ्यात न फसता तत्पूर्वी आपल्या जमिनी अजिबात विकू नयेत तसे झाल्यास नंतर तक्रारींना वाव राहणार नाही, असेही येथील दोन्ही प्रकल्प समर्थक समित्यांनी सांगितले आहे.