शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

उत्पन्न, खर्चातील तफावतीने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शासनाने एकीकडे रासायनिक खतांच्या दरवाढ केली असून, दुसरीकडे अनुदान देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना एक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शासनाने एकीकडे रासायनिक खतांच्या दरवाढ केली असून, दुसरीकडे अनुदान देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना एक प्रकारचे गाजरच दाखविले आहे. रासायनिक खतांची दरवाढ व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. शेतीला लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

गेल्या महिनाभरात शासनाने पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत वाढ केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्व बाबींना बसत असून, याची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी सर्वसामान्य ते मोठा शेतकरी असो ते बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. मात्र, आधुनिक यंत्रणेला आता डिझेल पेट्रोलची गरज भासत असल्याने खर्च जास्त व वेळ कमी लागत आहे. त्यामुळे आताचा शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे.

इंधन वाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच रासायनिक खत उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या खतांच्या दरात वाढ केली आहे. शेतातील जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत चालल्याने उत्पन्न कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा आधार घेतला. मात्र यावर्षी रासायनिक खते व डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाच मजुरीत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्वांचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ आले आहेत . शेतीत मिळणारे उत्पन्न कमी व खर्च जास्त यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत.