शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न, खर्चातील तफावतीने शेतकरी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : शासनाने एकीकडे रासायनिक खतांच्या दरवाढ केली असून, दुसरीकडे अनुदान देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना एक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : शासनाने एकीकडे रासायनिक खतांच्या दरवाढ केली असून, दुसरीकडे अनुदान देण्याचे जाहीर करून शेतकऱ्यांना एक प्रकारचे गाजरच दाखविले आहे. रासायनिक खतांची दरवाढ व डिझेलच्या वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे. शेतीला लागणारा खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.

गेल्या महिनाभरात शासनाने पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत वाढ केली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्व बाबींना बसत असून, याची झळ सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. पूर्वी सर्वसामान्य ते मोठा शेतकरी असो ते बैलजोडीच्या सहाय्याने शेती करीत होते. मात्र, आधुनिक यंत्रणेला आता डिझेल पेट्रोलची गरज भासत असल्याने खर्च जास्त व वेळ कमी लागत आहे. त्यामुळे आताचा शेतकरी आधुनिकीकरणाकडे वळला आहे.

इंधन वाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच रासायनिक खत उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या खतांच्या दरात वाढ केली आहे. शेतातील जमिनीचा कस दिवसेंदिवस कमी होत चालल्याने उत्पन्न कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा आधार घेतला. मात्र यावर्षी रासायनिक खते व डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाच मजुरीत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या सर्वांचा ताळमेळ बसवताना नाकीनऊ आले आहेत . शेतीत मिळणारे उत्पन्न कमी व खर्च जास्त यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक समस्यांचे डोंगर उभे राहिले आहेत.