शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

महाराष्ट्र, गुजरातचा सहकार क्षेत्रात नावलौकिक: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:26 IST

यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गुजरातचा सहकार क्षेत्रात नावलौकिक: शरद पवारचिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारोपीय सोहळा

चिपळूण : महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्य संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात लौकिक मिळविलेली राज्य आहे. या राज्यात ५० टक्के संस्था असून देशाच्या अन्य राज्यातही ५० टक्के संस्था उभ्या आहेत. सहकार चळवळ ही १८९० सालापासून सुरु झाली. यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.शहरातील पवन तलाव मैदानावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारोपीय सोहळा, ध्यासपर्व पुस्तकाचे प्रकाशन आणि सहकार भवन वास्तु उद्घाटन सोहळा  आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, संस्थेचे अध्यक्षव संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, स्मिता चव्हाण, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, अशोक कदम व संचालक मंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार भवनाचे उद्घाटन माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, कोकणातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने लोकांच्या विश्वासर्हतेवर वाटचाल केली असून या संस्थेचे माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी कौतुक केले.या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. कोकणात सहकारी पर्यटन संस्था उभ्या केल्यास कोकण समृध्द होवू शकतो. सर्वांच्या योगदानाने व संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे ही पतसंस्था नावारुपाला आलेली आहे, असे सांगितले.माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेती व शेतीला पूरक व्यवसाय याशिवाय राज्याचा विकास होवू शकत नाही. या संस्थेने कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात जावून धाडस करुन संस्थेने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गेल्या २५ वर्षात या संस्थेने पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हता निर्माण केली आहे. उद्याचा कोकण सहकाराच्या माध्यमातून घडवायचा आहे.

चिपळुणात अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्यावेळी चिपळूणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमालादेखील चिपळूणच्या नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून चिपळुणातील नागरिक साहित्य, कला, क्रीडा व सहकार यावर प्रेम करणारे आहेत. असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRatnagiriरत्नागिरी