शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, गुजरातचा सहकार क्षेत्रात नावलौकिक: शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 14:26 IST

यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गुजरातचा सहकार क्षेत्रात नावलौकिक: शरद पवारचिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारोपीय सोहळा

चिपळूण : महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्य संपूर्ण देशात सहकार क्षेत्रात लौकिक मिळविलेली राज्य आहे. या राज्यात ५० टक्के संस्था असून देशाच्या अन्य राज्यातही ५० टक्के संस्था उभ्या आहेत. सहकार चळवळ ही १८९० सालापासून सुरु झाली. यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील या महत्त्वाच्या व्यक्तींनी सहकार चळवळ सुरु करुन मोठे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.शहरातील पवन तलाव मैदानावर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारोपीय सोहळा, ध्यासपर्व पुस्तकाचे प्रकाशन आणि सहकार भवन वास्तु उद्घाटन सोहळा  आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार नारायण राणे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, संस्थेचे अध्यक्षव संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, स्मिता चव्हाण, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत खेतले, अशोक कदम व संचालक मंडळ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहकार भवनाचे उद्घाटन माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले की, कोकणातील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने लोकांच्या विश्वासर्हतेवर वाटचाल केली असून या संस्थेचे माजी केंद्रीय कृषीमंत्री पवार यांनी कौतुक केले.या कार्यक्रमात सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, कोकणाला निसर्गाने भरभरुन दिले आहे. कोकणात सहकारी पर्यटन संस्था उभ्या केल्यास कोकण समृध्द होवू शकतो. सर्वांच्या योगदानाने व संचालक मंडळाने केलेल्या पारदर्शक कारभारामुळे ही पतसंस्था नावारुपाला आलेली आहे, असे सांगितले.माजी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शेती व शेतीला पूरक व्यवसाय याशिवाय राज्याचा विकास होवू शकत नाही. या संस्थेने कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात जावून धाडस करुन संस्थेने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. गेल्या २५ वर्षात या संस्थेने पारदर्शक व्यवहार व विश्वासार्हता निर्माण केली आहे. उद्याचा कोकण सहकाराच्या माध्यमातून घडवायचा आहे.

चिपळुणात अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. त्यावेळी चिपळूणच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या कार्यक्रमालादेखील चिपळूणच्या नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला असून चिपळुणातील नागरिक साहित्य, कला, क्रीडा व सहकार यावर प्रेम करणारे आहेत. असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRatnagiriरत्नागिरी