शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साेशल मीडियावर बनावट अकाउंट! ५६ तक्रारी, सात दिवसांत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : सध्या कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जनजागृती करूनही लोक थापांना बळी पडत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : सध्या कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. जनजागृती करूनही लोक थापांना बळी पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून अनेकांना गंडा घालण्याबरोबर संबंधित व्यक्तीची बदनामी करण्याचे प्रकार वाढत आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात साेशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून फसवणूक झाल्याच्या ५६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारी दाखल झाल्यानंतर सात दिवसांत कारवाई करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात २०१६ पासून स्वतंत्र सायबर सेल सुरू करण्यात आले आहे. सायबर सेलकडे येणाऱ्या तक्रारींची निपटारा करण्यासाठी १ पोलीस अधिकारी व ५ अंमलदारांची टीम आहे. गेल्या तीन वर्षांत ५६ तर सहा महिन्यात सोशल मीडियावरील बनावट अकाउंटच्या २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. आत्तापर्यंत १८ बनावट अकाउंट सायबर पोलिसांना बंद करण्यात यश आले आहे. उरलेल्या ५ तक्रारींवर कारवाई सुरू आहे.

वाढती सायबर गुन्हेगारी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यात सायबर साक्षरता निर्माण व्हावी, याकरिता ‘सायबर एहसास’उपक्रम जिल्हाभर सुरू केला आहे. फसव्या योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे.

--------------------------

बनावट अकाउंट

२०१९ १४

२०२० १९

२०२१(जून) २३

------------------------------

सात दिवसांनंतर होते खाते बंद

१) तक्रार केल्यानंतर सात दिवसांत खाते बंद होते.

२) सायबर सेलकडे तक्रार आल्यावर पोलीस नोटीस पाठवितात नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करतात.

३) युजरने स्वत: आपल्या अकाउंटवरून तक्रार केली, तर चोवीस तासांच्या आत बनावट खाते बंद होते.

-------------------------------

तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...

१) आपल्या नावाने बनावट अकाउंट दिसले, तर सर्वप्रथम अकाउंट फेक आहे की हॅक झाले आहे, याची खात्री करावी. घाबरून न जाता सायबर सेलशी संपर्क साधावा.

२) फेक अकाउंट युजर स्वत: बंद करू शकतात. युजरने स्वत: रिपोर्ट केला, तर चोवीस तासांच्या आत अकाउंट बंद होते. रिपोर्ट करण्याची प्रोसेस समजून घ्यावी.

३) फेक अकाउंटची प्रोफाइल युआरएल लिंक कॉपी करून आपल्या अकाउंटवरून तक्रार दाखल करावी. त्वरित अकाउंट बंद केले जाते.

--------------------------------

कोरोनात वाढल्या तक्रारी

१) कोरोना काळात सायबर गुन्हे वाढले आहेत.

२) २०१९ व २०२० या दोन वर्षांच्या तुलनेत २०२१ मध्ये बनावट अकाउंटच्या तक्रारी वाढल्या आहेत.

३) सहा महिन्यांत तब्बल २३ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

----------------------------------

पोलिसांसाठी वेगळे पोर्टल

१) सायबर क्राइम पोर्टल नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल या साइटवर जाऊन तक्रारदार ऑनलाइन तक्रार देऊ शकतात व ती तक्रार ऑनलाइन पोर्टलवर गेली की, ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीतील तक्रार आहे, त्या पोलीस स्थानकात ती तक्रार दिली जाते व सायबर पोलीस तपास करतात.

२) सध्या फेसबुकवरून होणारे फसवणुकीचे प्रकारात वाढ झाली आहे. फसवणूक टाळण्याकरिता अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये व अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करू नये.

३) कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व कोणतीही मागणी स्वीकारू नये.