शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

फेसबुकद्वारे तरुणीची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:39 IST

रत्नागिरी पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून तरुणीला ५४ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना शिवरेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साक्षी उमेश खेराडे (२०, शिवरेवाडी, रत्नागिरी) हिची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. १४ जुलै रोजी साक्षी हिला त्या व्यक्तीने माझ्या बहिणीचे लग्न असून, तिला साडी व दागिन्यांची गरज आहे. त्यावेळी साक्षी हिने क्षणाचाही विलंब न करता मैत्रीखातर त्याला तीन तोळ्याचे दागिने व एक साडी दिली. मात्र, हे दागिने परत न मिळाल्याने साक्षी हिने फसवणुकीची तक्रार दिली आहे.

हर्णैचे सरपंच, उपसरपंच जखमी

दापोली : हर्णे सरपंच मुनिरा शिरगावकर, उपसरपंच दीपक खेडेकर हे अपघातात जखमी झाले आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मंत्रालयात बोलावलेल्या बैठकीला जात असताना हा अपघात झाला असून, या अपघातात अन्य ५ जण किरकोळ जखमी आहेत. खेम धरण गळती प्रकरणाची बैठक गुरुवारी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुंबई येथे बोलावली होती. या बैठकीनिमित्त सरपंच, उपसरपंचांचे शिष्टमंडळ मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. मात्र, रस्त्यात गाडीला अपघात झाल्याने ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

रावळगाव येथे घरावर झाड पडल्याने नुकसान

चिपळूण : रावळगाव - तांबडवाडी येथील एका घरावर वादळी पावसामुळे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले. ही घटना बुधवारी रात्री घडली. तांबडवाडी येथील रविकांत महादेव जाधव, नवनाथ महादेव जाधव, अनंत जाधव यांच्या सामाईक घरावर हे झाड कोसळले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले. याबाबत माहिती मिळताच गटविकास अधिकारी अरुण जाधव, सरपंच सुरेश जाधव, पंचायत समिती सदस्य अनुजा चव्हाण यांनी पाहणी केली.

सेवा बजावतानाच शिक्षकाचा मृत्यू

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा केंद्राचे केंद्रप्रमुख सत्याप्पा सुबराव रुपनूर यांचे शैक्षणिक सेवा बजावताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.केंद्रप्रमुख सत्याप्पा रुपनूर हे कोंडगाव - वाणीवाडी येथील शाळा तपासून जिल्हा परिषद शाळा, तिवरे तर्फे देवळे येथे शाळा तपासणीसाठी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास पोहोचले. शाळेत येताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना बसण्यास खुर्ची दिली आणि काही कळायच्या आतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. शिक्षकांनी व सहकाऱ्यांनी त्वरित त्यांना साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.वैद्यकीय अधिकारी डॉ. आदाटे यांनी शवविच्छेदन करुन शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.