शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

आठवीचे सहाशे वर्ग अपेक्षित

By admin | Updated: June 27, 2014 01:11 IST

अनिल कुलकर्णी : ‘माध्यमिक’मधील वर्ग सुरू राहणार

रत्नागिरी : आठवीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याच्या योजनेंतर्गत जिल्ह्यात आठवीचे सहाशे वर्ग सुरु होणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या माध्यमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग आहेत, ते बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच शाळेत ठेवावे, की जवळच्या प्राथमिक शाळेत सुरु होणाऱ्या नवीन वर्गात दाखल करावे, हा त्यांच्या पालकांचा निर्णय असेल, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी अनिल कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या ९६३ शाळा आहेत, तर पहिली ते पाचवीपर्यंतच्या २७४६ शाळा आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या परिसरात शाळा उपलब्ध व्हावी, हा आठवीचा वर्ग प्राथमिक शाळेला जोडण्यामागील उद्देश आहे. सातवीपर्यंत गावात शाळा आहे आणि आठवीसाठी परगावी जावे लागते, अशी अवस्था असेल तर अनेकदा मुले पुढील शिक्षणासाठी पाठवली जात नाहीत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या ठिकाणी शालेय शिक्षण घेता यावे असा या योजनेचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेमार्फत एक किलोमीटरच्या आत विद्यार्थ्यांना पाचवीचे वर्ग व तीन किलोमीटर परिसरात आठवीचे वर्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अंतराच्या आत अन्य शाळा नसतील तर तेथे हे वर्ग उपलब्ध करुन देणे ही जिल्हा परिषदेची जबाबदारी राहील, असेही कुलकर्णी म्हणाले. जिल्ह्यातील अनेक माध्यमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग चालविण्यासाठी प्राथमिक शाळांचे विद्यार्थी आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न काही ठिकाणी सुरू आहेत. तर काही ठिकाणी प्राथमिक शाळांमध्ये प्राथमिक शिक्षणाच्या गटात आठवीचा वर्ग घेतल्याने हा वर्ग सुरू करण्याची धडपड सुरू आहे, याबाबत विचारता ते म्हणाले, अशी स्थिती काही ठिकाणी असू शकते. परंतु मार्ग निघेल. (प्रतिनिधी)