शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील ठरू शकते आराेग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी डिहायड्रेशन, मूत्रखडा, किडनीचे अन्य आजार उद्भवू शकतात. तसेच पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढले तरीही शरीराला त्रासदायक होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढेच पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असते, असे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

निरोगी आयुष्यासाठी पुरेसे आणि नियमित पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, काही व्यक्तींना अतिशय कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे अशा व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक त्रास होतात. तर काहींना प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यासही ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशांना वारंवार लघवीला जाणे, त्यामुळे झोपेत खंड पडणे आदी त्रास होतात. त्यामुळे पाण्याची गरज ही व्यक्तीचे वय, वजन आणि आजार असेल तर त्या आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, हे पाणी आवश्यकतेपेक्षा कमी झाले तर मात्र, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चा त्रास होतो. यामुळे घशाला कोरड पडणे, सतत घाम येणे, डोके - अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात व पिवळसर रंगाची होणे, जळजळ होणे, डोळ्यांमध्ये रखरखीतपणा जाणवणे, त्वचा काेरडी पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा यासारखे त्रास बळावतात. त्याचबरोबर मूत्रखडा आदींसारखे मूत्राशयाचे विकारही वाढण्याचा धोका संभवतो.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यावे. साधारणत: दोन ते अडीच लीटर पाणी नियमित पिणे गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण हे वातावरणावरही अवलंबून असते. आपल्या वजनामध्येही ६० टक्के पाणी असते. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी घेतल्यास आणि ते शरीरात साठून राहिल्यास रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते. पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया योग्यरित्या न झाल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो.

काेणी किती प्यावे पाणी

पाण्याचे प्रमाण व्यक्तीच्या वयावर तसेच बदलत्या वातावरणावर अवलंबून असते.

- पाण्याच्या प्रमाणाबरोबरच आपण द्रवस्वरूपात घेतले जाणारे पदार्थही लक्षात घ्यायला हवेत.

- द्रवस्वरूपातील घटक घेतल्यास पाण्याचे प्रमाण गरजेनुसार ठेवले जावे.

- १५ वर्षांपर्यतच्या मुलांनी साधारणत: एक लीटर पाणी प्यायला हवे.

- निरोगी असलेल्या व्यक्तींनी दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे.

- हृदयरोगी, मधुमेही यांनी दीड ते दोन लीटर पाणी प्यावे.

- व्यक्तीचे वय, उंची, वजन, व्यायामाची पद्धत, कामाचे स्वरूप आणि आजाराचे स्वरूप या गोष्टींवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.