शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

जास्तीचे पाणीदेखील ठरू शकते आराेग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी डिहायड्रेशन, मूत्रखडा, किडनीचे अन्य आजार उद्भवू शकतात. तसेच पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढले तरीही शरीराला त्रासदायक होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढेच पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असते, असे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

निरोगी आयुष्यासाठी पुरेसे आणि नियमित पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, काही व्यक्तींना अतिशय कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे अशा व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक त्रास होतात. तर काहींना प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यासही ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशांना वारंवार लघवीला जाणे, त्यामुळे झोपेत खंड पडणे आदी त्रास होतात. त्यामुळे पाण्याची गरज ही व्यक्तीचे वय, वजन आणि आजार असेल तर त्या आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, हे पाणी आवश्यकतेपेक्षा कमी झाले तर मात्र, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चा त्रास होतो. यामुळे घशाला कोरड पडणे, सतत घाम येणे, डोके - अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात व पिवळसर रंगाची होणे, जळजळ होणे, डोळ्यांमध्ये रखरखीतपणा जाणवणे, त्वचा काेरडी पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा यासारखे त्रास बळावतात. त्याचबरोबर मूत्रखडा आदींसारखे मूत्राशयाचे विकारही वाढण्याचा धोका संभवतो.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यावे. साधारणत: दोन ते अडीच लीटर पाणी नियमित पिणे गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण हे वातावरणावरही अवलंबून असते. आपल्या वजनामध्येही ६० टक्के पाणी असते. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी घेतल्यास आणि ते शरीरात साठून राहिल्यास रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते. पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया योग्यरित्या न झाल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो.

काेणी किती प्यावे पाणी

पाण्याचे प्रमाण व्यक्तीच्या वयावर तसेच बदलत्या वातावरणावर अवलंबून असते.

- पाण्याच्या प्रमाणाबरोबरच आपण द्रवस्वरूपात घेतले जाणारे पदार्थही लक्षात घ्यायला हवेत.

- द्रवस्वरूपातील घटक घेतल्यास पाण्याचे प्रमाण गरजेनुसार ठेवले जावे.

- १५ वर्षांपर्यतच्या मुलांनी साधारणत: एक लीटर पाणी प्यायला हवे.

- निरोगी असलेल्या व्यक्तींनी दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे.

- हृदयरोगी, मधुमेही यांनी दीड ते दोन लीटर पाणी प्यावे.

- व्यक्तीचे वय, उंची, वजन, व्यायामाची पद्धत, कामाचे स्वरूप आणि आजाराचे स्वरूप या गोष्टींवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.