शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

परीक्षेचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलांना सुट्टी असली, तरी आम्हाला सुट्टी नाही. शाळा बंद झाली आणि लगेच आमची ‘कोविडयोद्धा’ ड्युटी सुरू ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुलांना सुट्टी असली, तरी आम्हाला सुट्टी नाही. शाळा बंद झाली आणि लगेच आमची ‘कोविडयोद्धा’ ड्युटी सुरू झाली. आमच्यातले कोणी पोलीसमित्र बनले, कोणी आरोग्यमित्र तर कोणी डाटा एण्ट्री ऑपरेटर. गेल्या काही दिवसांपासून मी पोलीसमित्र म्हणून काम करत आहे. धोकादायक ठिकाणी दिवसभर उन्हात माझ्यासारखेच इतर शिक्षक हे कर्तव्य निभावत आहेत. या कामाचे ना कसले प्रशिक्षण, ना कसली पूर्वतयारी, ना कसले संरक्षककवच... थेट ड्युटीवर हजर! आता घरातले खूप काळजी करतात. संध्याकाळी घरात पाय ठेवताना बायको, मुलं भीतियुक्त साशंक डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहतात. कोरोनाच्या निर्बंधांमुळे आई गावाकडे अडकलेली. इकडच्यातिकडच्या दुःखद वार्ता कानांवर पडल्या की, पार खचून जाते. ना आम्ही तिच्याकडे जाऊ शकत, ना ती आमच्याकडे येऊ शकत... खरेच, सध्याचा काळ खूप गंभीर आहे. याच काळात दररोज सकाळीच न चुकता ‘उठा माऊली, सुप्रभात...!’ म्हणून व्हाॅट्सॲपवर मेसेज

पाठविणारे अगदी जीवाभावाचे व खूप प्रेमळ असलेले मित्रवर्य काळाच्या पडद्याआड गेले. कोणतेही नातेसंबंध नसताना परस्परांना जीव लावणारी अशी तरुण, धडधाकट माणसे अचानक निघून गेल्यावर कसे वाटते? केवळ ‘भावपूर्ण श्रद्धांजली’चे दोन शब्द टाकून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करता येत नाही.

एखाद्या कुटुंबाचा आधारवड असा अनपेक्षितपणे उन्मळून पडला की, किती मोठा खड्डा पडतो, तो ज्याचा त्यालाच माहीत. याच काळात माझे एक सहकारी कोरोनाबाधित झाले. पोटापाण्यासाठी कुठूनकुठून एकत्र आलेले. आम्ही एखाद्या वेळेस भांडतो, रुसतो पण दुस-याच क्षणी झाले गेले विसरून परस्परांना ‘हाय... हॅलो...’ करतो. चार-पाच दिवसांपूर्वी एकाच गाडीवरून फिरलेलो आम्ही... पण, त्यांची तेव्हाची अवस्था बघून मी पार खचून गेलो. खूप धावपळ केली तेव्हा कुठे त्यांच्यावर त्वरित उपचार झाले. देवदयेने माझे सहकारी आता पूर्ण बरे होऊन घरी आलेत. पण, त्या आठवडाभरात आमचा संपूर्ण स्टाफ ना पोटभर जेवला, ना मनसोक्त झोपला. काय होईल, कसे होईल, याचीच काळजी. खरेच कठीण परीक्षेचे दिवस सुरू झालेत. माझ्या फेसबुक वाॅलवर माझ्या साहित्यविषयक पोस्टवर आवर्जून अभिप्राय देणारा कधी पाठीवर कौतुकाची थाप, तर कधी एखादा सल्ला देणारा माझा एक आदर्श मित्र असाच अकाली हे जग सोडून गेला. कालपरवा माझ्या पोस्टवर टाइप केलेली त्याची ती बोटे अजूनही तशीच हलत असतील. पण, काळाच्या मनात काय दडलेले असते, ते फक्त काळालाच माहीत. याच कालौघात आपलेही असेच जाणे झाले तर...

मागच्यांचे काय होईल, या भीतीने रात्री झोप लागत नाही. खरेच, अतिशय खडतर व कठीण परीक्षेचे दिवस आहेत.

- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली