शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्याची सायंकाळ थोडी सुसह्य..

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

दुसरे बालपण : अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रमाचा सामाजिक वसा

शोभना कांबळे - रत्नागिरी वृद्धत्व म्हणजे अडगळ, आपण इतरांवर भार बनून राहतो, ही अपराधीपणाची बोच बाळगत आज कितीतरी वृद्ध आयुष्य कंठीत आहेत. दुसरी पिढीही आता वृद्ध माता -पित्यांची जबाबदारी घेण्यास फारशी इच्छुक दिसत नाही. त्यातच आयुष्याचा जोडीदार आधीच कायमच्या प्रवासाला निघून गेला असेल तर मग उरलेल्याचा पुढचा प्रवास अधिकच क्लेषदायी होतो. मात्र, पावस येथील मंगला सोमणी यांनी उभारलेल्या ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’मध्ये आज अनेक वृद्धा आयुष्याची सायंकाळ आनंदात व्यतीत करीत आहेत. आजचा माणूस सुखलोलूप झाला सुखसुविधा मिळविण्यासाठी पैशांच्या मागे पळत आहे. पती - पत्नी दोघेही अर्थार्जन करणारी, त्यामुळे वेळ कमी, त्यातच जागेचीही समस्या. त्यामुळे कुटुंब संस्था मर्यादित झाली. घरातील वडीलधारी माणसं अडचणीची वाटू लागली आहेत. त्यामुळे तर ज्येष्ठांच्या समस्या अधिकच वाढल्या असून, आज वृद्धाश्रमांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. अधिक पैसे द्यायला लागले तरी हरकत नाही, पण, ज्येष्ठांचे सर्व काही केले जाते ना, अशी मानसिकता दुसऱ्या पिढीची होऊ लागली आहे. अशाच निराधार, घरात सांभाळायला नसणाऱ्या वृद्ध महिलांसाठी पावस येथील मंगला सोमणी यांनी १९९५ साली ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’ सुरू केला. आपल्या सासुबाई आणि आई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हा महिलाश्रम सुरू केला असला तरी आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचे ते स्वप्न होते. मात्र, तिचे अकाली निधन झाले. जिचे महिला वृद्धाश्रम सुरू करण्याचे स्वप्न होते, ती कायमच्या प्रवासाला निघून गेली होती. त्यामुळे ते आता अधुरेच राहणार होते.तिला दिलेल्या वास्तूतच हा वृद्धाश्रम सुरू केला. आज येथे दहा वृध्द महिला आनंदाने वास्तव्य करीत आहेत. जावयांकडे राहाणे कसेतरी वाटते, म्हणून त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करला . मंगला सोमणी यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र, आता गायत्री फडके यांनी कुठलीही कुरकूर न करता ही जबाबदारी आनंदाने सांभाळली आहे. अधूनमधून मुले, नातेवाईक चौकशीसाठी येतात. पण, या वृद्धांना फडके आणि कर्मचारी नातेवाईक समजून आस्थेने काळजी घेतात, वृद्धाश्रमातील काही आजी विकलांग स्थितीत आहेत. तरीही येथील मंडळी कुठलाही दुस्वास न करता त्यांची देखभाल करतात. त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेऊन त्यांच्या औषधोपचाराकडे वेळेवर लक्ष देतात. म्हणूनच आपल्या घरापासून दूर असलेल्या या वृद्धांना आपल्या घराची ओढ सतावत नाही. वृद्धाश्रम हेच आता त्यांचे मायेचे घरटे झाले आहे.