शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आयुष्याची सायंकाळ थोडी सुसह्य..

By admin | Updated: July 18, 2014 23:13 IST

दुसरे बालपण : अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रमाचा सामाजिक वसा

शोभना कांबळे - रत्नागिरी वृद्धत्व म्हणजे अडगळ, आपण इतरांवर भार बनून राहतो, ही अपराधीपणाची बोच बाळगत आज कितीतरी वृद्ध आयुष्य कंठीत आहेत. दुसरी पिढीही आता वृद्ध माता -पित्यांची जबाबदारी घेण्यास फारशी इच्छुक दिसत नाही. त्यातच आयुष्याचा जोडीदार आधीच कायमच्या प्रवासाला निघून गेला असेल तर मग उरलेल्याचा पुढचा प्रवास अधिकच क्लेषदायी होतो. मात्र, पावस येथील मंगला सोमणी यांनी उभारलेल्या ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’मध्ये आज अनेक वृद्धा आयुष्याची सायंकाळ आनंदात व्यतीत करीत आहेत. आजचा माणूस सुखलोलूप झाला सुखसुविधा मिळविण्यासाठी पैशांच्या मागे पळत आहे. पती - पत्नी दोघेही अर्थार्जन करणारी, त्यामुळे वेळ कमी, त्यातच जागेचीही समस्या. त्यामुळे कुटुंब संस्था मर्यादित झाली. घरातील वडीलधारी माणसं अडचणीची वाटू लागली आहेत. त्यामुळे तर ज्येष्ठांच्या समस्या अधिकच वाढल्या असून, आज वृद्धाश्रमांची गरज मोठ्या प्रमाणावर भासू लागली आहे. अधिक पैसे द्यायला लागले तरी हरकत नाही, पण, ज्येष्ठांचे सर्व काही केले जाते ना, अशी मानसिकता दुसऱ्या पिढीची होऊ लागली आहे. अशाच निराधार, घरात सांभाळायला नसणाऱ्या वृद्ध महिलांसाठी पावस येथील मंगला सोमणी यांनी १९९५ साली ‘कै. ती. सौ. अनसुुया आनंदी महिला वृद्धाश्रम’ सुरू केला. आपल्या सासुबाई आणि आई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी हा महिलाश्रम सुरू केला असला तरी आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचे ते स्वप्न होते. मात्र, तिचे अकाली निधन झाले. जिचे महिला वृद्धाश्रम सुरू करण्याचे स्वप्न होते, ती कायमच्या प्रवासाला निघून गेली होती. त्यामुळे ते आता अधुरेच राहणार होते.तिला दिलेल्या वास्तूतच हा वृद्धाश्रम सुरू केला. आज येथे दहा वृध्द महिला आनंदाने वास्तव्य करीत आहेत. जावयांकडे राहाणे कसेतरी वाटते, म्हणून त्यांनी वृद्धाश्रमाचा मार्ग पत्करला . मंगला सोमणी यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. मात्र, आता गायत्री फडके यांनी कुठलीही कुरकूर न करता ही जबाबदारी आनंदाने सांभाळली आहे. अधूनमधून मुले, नातेवाईक चौकशीसाठी येतात. पण, या वृद्धांना फडके आणि कर्मचारी नातेवाईक समजून आस्थेने काळजी घेतात, वृद्धाश्रमातील काही आजी विकलांग स्थितीत आहेत. तरीही येथील मंडळी कुठलाही दुस्वास न करता त्यांची देखभाल करतात. त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेऊन त्यांच्या औषधोपचाराकडे वेळेवर लक्ष देतात. म्हणूनच आपल्या घरापासून दूर असलेल्या या वृद्धांना आपल्या घराची ओढ सतावत नाही. वृद्धाश्रम हेच आता त्यांचे मायेचे घरटे झाले आहे.