शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

रत्नागिरीतील हातिवले येथील टोलवसुली स्थगित करेपर्यंत जागेच हलणार नाही, नीलेश राणेंचा इशारा

By मनोज मुळ्ये | Updated: December 22, 2022 12:49 IST

टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही राजापूर तालुक्यातील हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आल्याने सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच नागरिक आक्रमक झाले असून, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी सकाळपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत टोलवसुली स्थगित केली जात नाही, तोपर्यंत येथून कोणीही हटणार नाही, अशी ठाम भूमिका राणे यांनी घेतल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे.याआधीही हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्यात आली होती. मात्र स्थानिकांनी विरोध करुन ती बंद पाडली. बुधवार २१ डिसेंबरला अचानक ती पुन्हा सुरू करण्यात आली. त्यामुळे लोक आक्रमक झाले. टाेलवसुलीचा विषय वाऱ्यासारखा पसरला आणि सर्वपक्षीय लोक तेथे दाखल झाले. तेथूनच माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आपण गुरुवारी सकाळी १० वाजता येत आहोत, त्यावेळी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असे राणे यांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी टोलवसुली थांबण्यात आली.गुरुवारी सकाळपासूनच सर्वपक्षीय कार्यकर्ते हातिवले येथे जमा झाले. नीलेश राणे यांच्यासह काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफेही तेथे हजर झाल्या. शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे अशा सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले. आमचा टोलवसुलीला विरोध नाही. मात्र जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही टोलवसुली करु देणार नाही, असे राणे यांनी ठणकावून सांगितले. जोपर्यंत टोलवसुली थांबवली जात नाही, तोपर्यंत येथून हटणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दुपारपर्यंत यातून कोणताच मार्ग न निघाल्याने सर्व लोक तेथेच थांबून होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtollplazaटोलनाकाNilesh Raneनिलेश राणे