शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

गुहागर तालुका : आधुनिक युगातही काजुर्ली - खडपेवासियांच्या पदरी निराशा

अमोल पवार -- आबलोली --देशात ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जात आहे. ‘डिजिटल इंडिया’ घडविण्याचे स्वप्न राज्यकर्ते पाहात आहेत. मात्र, याचवेळी ग्रामीण भागातील स्थिती अनेक ठिकाणी विदारक असल्याचे दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील काजुर्ली (खडपेवाडी) येथील ग्रामस्थ आजही रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी ‘डोली’ उचलावी लागत आहे.गुहागर तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकाकडचे दुर्गम गाव म्हणून काजुर्लीची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याचे ठिकाण व गुहागर तालुका यांना जोडणारा भातगाव - राई हा पूल झाल्यानंतर काजुर्ली हे गाव रत्नागिरी ते गुहागर या प्रमुख मार्गावरील महत्त्वपूर्ण गाव बनले आहे. या गावातील अनेक वाड्या या दुर्गम भागात वसलेल्या असून, येथे लोकसंख्याही विरळ आहे. यातील खडपेवाडीमध्ये सुमारे १५ घरे असून, येथे कायम वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची संख्या अंदाजे ३० एवढी आहे. सण - उत्सवानिमित्तच गावाबाहेर असलेली मंडळी वाडीत येतात. मात्र, सण संपताच पुन्हा नेमकीच माणसे वाडीत शिल्लक राहतात. आज शासन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत असताना या वाडीत अजूनही रस्त्याचा पत्ता नसल्याने जर कुणी आजारी पडले, तर त्याला डोलीतून उचलून दोन किलोमीटर चालत गुहागर - काजुर्ली - रत्नागिरी या मुख्य रस्त्यावर आणावे लागते आणि तेथून पुढील उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यातच प्रमुख रस्त्याकडे जाणारी पाऊलवाटही निमुळतीच आहे. लहान मुलांचा पाळणा या डोलीसाठी वापरला जातो. यामध्ये पाळण्याच्या दोन्ही बाजूला घट्ट असे बांबू बांधले जातात व त्या पाळण्यात रुग्णाला बसविले जाते आणि मग ही डोली उचलून खांद्यावरुन वाहून नेली जाते. ही डोली उचलणारी माणसेसुद्धा बहुतेकवेळा वयस्करच असतात. कारण वाडीतील बहुतांशी तरुण हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय वर्चस्वासाठी येथील ग्रामस्थांचा केवळ वापर करण्यात आल्याचेच आजपर्यंत दिसून आले आहे.निवडणुकीत केवळ आश्वासनांचा महापूरविविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या वाडीसाठी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या सर्व वल्गनाच ठरल्या. ग्रामपंचायतीने काही निधी खर्च टाकून रस्त्याचे कच्चे प्रारुप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशा निधीअभावी हा रस्ता अपूर्णच राहीला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कुणीतरी येऊन आश्वासने देतील व वाडीतील सुमारे ३० मते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर पुन्हा विसरतील. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या खांद्यावरील डोलीचे ओझे उतरेल की नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.