शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

आजही ग्रामस्थांना डोलीचाच आधार!

By admin | Updated: October 23, 2016 00:28 IST

गुहागर तालुका : आधुनिक युगातही काजुर्ली - खडपेवासियांच्या पदरी निराशा

अमोल पवार -- आबलोली --देशात ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला जात आहे. ‘डिजिटल इंडिया’ घडविण्याचे स्वप्न राज्यकर्ते पाहात आहेत. मात्र, याचवेळी ग्रामीण भागातील स्थिती अनेक ठिकाणी विदारक असल्याचे दिसून येत आहे. गुहागर तालुक्यातील काजुर्ली (खडपेवाडी) येथील ग्रामस्थ आजही रस्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे आजही येथील ग्रामस्थांना रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी ‘डोली’ उचलावी लागत आहे.गुहागर तालुक्याच्या दक्षिणेकडील टोकाकडचे दुर्गम गाव म्हणून काजुर्लीची ओळख आहे. मात्र, जिल्ह्याचे ठिकाण व गुहागर तालुका यांना जोडणारा भातगाव - राई हा पूल झाल्यानंतर काजुर्ली हे गाव रत्नागिरी ते गुहागर या प्रमुख मार्गावरील महत्त्वपूर्ण गाव बनले आहे. या गावातील अनेक वाड्या या दुर्गम भागात वसलेल्या असून, येथे लोकसंख्याही विरळ आहे. यातील खडपेवाडीमध्ये सुमारे १५ घरे असून, येथे कायम वास्तव्यास असणाऱ्या ग्रामस्थांची संख्या अंदाजे ३० एवढी आहे. सण - उत्सवानिमित्तच गावाबाहेर असलेली मंडळी वाडीत येतात. मात्र, सण संपताच पुन्हा नेमकीच माणसे वाडीत शिल्लक राहतात. आज शासन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत असताना या वाडीत अजूनही रस्त्याचा पत्ता नसल्याने जर कुणी आजारी पडले, तर त्याला डोलीतून उचलून दोन किलोमीटर चालत गुहागर - काजुर्ली - रत्नागिरी या मुख्य रस्त्यावर आणावे लागते आणि तेथून पुढील उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी न्यावे लागते. त्यातच प्रमुख रस्त्याकडे जाणारी पाऊलवाटही निमुळतीच आहे. लहान मुलांचा पाळणा या डोलीसाठी वापरला जातो. यामध्ये पाळण्याच्या दोन्ही बाजूला घट्ट असे बांबू बांधले जातात व त्या पाळण्यात रुग्णाला बसविले जाते आणि मग ही डोली उचलून खांद्यावरुन वाहून नेली जाते. ही डोली उचलणारी माणसेसुद्धा बहुतेकवेळा वयस्करच असतात. कारण वाडीतील बहुतांशी तरुण हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत. वाडीत येण्या-जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. राजकीय वर्चस्वासाठी येथील ग्रामस्थांचा केवळ वापर करण्यात आल्याचेच आजपर्यंत दिसून आले आहे.निवडणुकीत केवळ आश्वासनांचा महापूरविविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या वाडीसाठी रस्ता करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या सर्व वल्गनाच ठरल्या. ग्रामपंचायतीने काही निधी खर्च टाकून रस्त्याचे कच्चे प्रारुप तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुरेशा निधीअभावी हा रस्ता अपूर्णच राहीला. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा कुणीतरी येऊन आश्वासने देतील व वाडीतील सुमारे ३० मते पदरात पाडून घेतील आणि त्यानंतर पुन्हा विसरतील. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या खांद्यावरील डोलीचे ओझे उतरेल की नाही? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.