शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सणासुदीच्या काळातही रेल्वेच्या ‘स्पेशल’ महागड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी येता यावे, यासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने सुमारे २२० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या या विशेष गाड्या कोरोना निर्बंधामुळे पूर्णपणे आरक्षित असून, त्यांचे तिकीटही अधिक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना असेल, तरच या गाड्यांमधून दामदुप्पट दराने तिकिटे काढून येता येणार आहे.

खास गणेशोत्सवासाठी दिवा-मडगाव, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या पॅसेंजर गाड्याही आरक्षित असून, त्यांचे तिकीटही सुमारे ४०० रुपयांपर्यंत असणार आहे.

‘स्पेशल’ भाडे न परवडणारे?

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या, तरीही त्याचे भाडे दामदुप्पट असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. पॅसेजर गाडीने केवळ ७२ रुपयांमध्ये मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करता येत होता. मात्र, आता स्पेशल गाडीचे भाडे परवडणार कसे?

- कृष्णा सावंत, देवळे, ता.संगमेश्वर.

कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्या सर्व गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागत आहे. जवळजवळ ९० टक्के गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण मिळणेही अवघड झाले आहे.

- तेजस देसाई, रत्नागिरी

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

- पूर्वी दोन पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यांचे तिकीट ७२ रुपये होते. मात्र, आता सर्वच विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर ४०० रुपये आहे.

- सर्वच गाड्या आरक्षित असून, ९० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार

- पॅसेंजर गाडीचे तिकीट ७२ रुपये असल्याने सामान्यांना परवडणारे होते.

- दोन्ही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्य प्रवाशांना आता विशेष गाड्यांमधून प्रवास करणे न परवडणारे होणार आहे.