शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सणासुदीच्या काळातही रेल्वेच्या ‘स्पेशल’ महागड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी येता यावे, यासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने सुमारे २२० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या या विशेष गाड्या कोरोना निर्बंधामुळे पूर्णपणे आरक्षित असून, त्यांचे तिकीटही अधिक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना असेल, तरच या गाड्यांमधून दामदुप्पट दराने तिकिटे काढून येता येणार आहे.

खास गणेशोत्सवासाठी दिवा-मडगाव, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या पॅसेंजर गाड्याही आरक्षित असून, त्यांचे तिकीटही सुमारे ४०० रुपयांपर्यंत असणार आहे.

‘स्पेशल’ भाडे न परवडणारे?

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या, तरीही त्याचे भाडे दामदुप्पट असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. पॅसेजर गाडीने केवळ ७२ रुपयांमध्ये मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करता येत होता. मात्र, आता स्पेशल गाडीचे भाडे परवडणार कसे?

- कृष्णा सावंत, देवळे, ता.संगमेश्वर.

कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्या सर्व गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागत आहे. जवळजवळ ९० टक्के गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण मिळणेही अवघड झाले आहे.

- तेजस देसाई, रत्नागिरी

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

- पूर्वी दोन पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यांचे तिकीट ७२ रुपये होते. मात्र, आता सर्वच विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर ४०० रुपये आहे.

- सर्वच गाड्या आरक्षित असून, ९० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार

- पॅसेंजर गाडीचे तिकीट ७२ रुपये असल्याने सामान्यांना परवडणारे होते.

- दोन्ही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्य प्रवाशांना आता विशेष गाड्यांमधून प्रवास करणे न परवडणारे होणार आहे.