शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

सणासुदीच्या काळातही रेल्वेच्या ‘स्पेशल’ महागड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी येता यावे, यासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने सुमारे २२० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या या विशेष गाड्या कोरोना निर्बंधामुळे पूर्णपणे आरक्षित असून, त्यांचे तिकीटही अधिक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना असेल, तरच या गाड्यांमधून दामदुप्पट दराने तिकिटे काढून येता येणार आहे.

खास गणेशोत्सवासाठी दिवा-मडगाव, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या पॅसेंजर गाड्याही आरक्षित असून, त्यांचे तिकीटही सुमारे ४०० रुपयांपर्यंत असणार आहे.

‘स्पेशल’ भाडे न परवडणारे?

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या, तरीही त्याचे भाडे दामदुप्पट असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. पॅसेजर गाडीने केवळ ७२ रुपयांमध्ये मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करता येत होता. मात्र, आता स्पेशल गाडीचे भाडे परवडणार कसे?

- कृष्णा सावंत, देवळे, ता.संगमेश्वर.

कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्या सर्व गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागत आहे. जवळजवळ ९० टक्के गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण मिळणेही अवघड झाले आहे.

- तेजस देसाई, रत्नागिरी

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

- पूर्वी दोन पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यांचे तिकीट ७२ रुपये होते. मात्र, आता सर्वच विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर ४०० रुपये आहे.

- सर्वच गाड्या आरक्षित असून, ९० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार

- पॅसेंजर गाडीचे तिकीट ७२ रुपये असल्याने सामान्यांना परवडणारे होते.

- दोन्ही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्य प्रवाशांना आता विशेष गाड्यांमधून प्रवास करणे न परवडणारे होणार आहे.