शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळातही रेल्वेच्या ‘स्पेशल’ महागड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोकणाचे आराध्य दैवत असलेल्या गणेशाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होतो. यासाठी गणेशभक्तांना त्यांच्या गावी येता यावे, यासाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या सहकार्याने सुमारे २२० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोकणात येणाऱ्या या विशेष गाड्या कोरोना निर्बंधामुळे पूर्णपणे आरक्षित असून, त्यांचे तिकीटही अधिक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना असेल, तरच या गाड्यांमधून दामदुप्पट दराने तिकिटे काढून येता येणार आहे.

खास गणेशोत्सवासाठी दिवा-मडगाव, दिवा-रत्नागिरी आणि रत्नागिरी-मडगाव या पॅसेंजर गाड्याही आरक्षित असून, त्यांचे तिकीटही सुमारे ४०० रुपयांपर्यंत असणार आहे.

‘स्पेशल’ भाडे न परवडणारे?

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या असल्या, तरीही त्याचे भाडे दामदुप्पट असल्याने सामान्यांना ते परवडणारे नाही. पॅसेजर गाडीने केवळ ७२ रुपयांमध्ये मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करता येत होता. मात्र, आता स्पेशल गाडीचे भाडे परवडणार कसे?

- कृष्णा सावंत, देवळे, ता.संगमेश्वर.

कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत, त्या सर्व गाड्यांचे आधीच आरक्षण करावे लागत आहे. जवळजवळ ९० टक्के गाड्यांचे आरक्षणही फुल्ल झाले आहे. त्यामुळे आरक्षण मिळणेही अवघड झाले आहे.

- तेजस देसाई, रत्नागिरी

दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार

- पूर्वी दोन पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यांचे तिकीट ७२ रुपये होते. मात्र, आता सर्वच विशेष गाड्यांचे तिकिटाचे दर ४०० रुपये आहे.

- सर्वच गाड्या आरक्षित असून, ९० टक्के आरक्षण फुल्ल झाले आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार

- पॅसेंजर गाडीचे तिकीट ७२ रुपये असल्याने सामान्यांना परवडणारे होते.

- दोन्ही पॅसेंजर गाड्या बंद झाल्याने सामान्य प्रवाशांना आता विशेष गाड्यांमधून प्रवास करणे न परवडणारे होणार आहे.