शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:38 IST

मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे एकीकडे खलाशी नाहीत, तर दुसरीकडे कोरोनाचे संकट, मासेमारी बंदचा इतर व्यवसायांवर परिणाममच्छीमार सापडले आर्थिक संकटात, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, वारा थांबण्याची प्रतीक्षा

रत्नागिरी : मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील मासेमारी हंगाम वादळानंतर कोरोनामुळे तोट्यात गेला होता. कोरोनाच्या भीतीने मासेमारी बंद ठेवावी लागली होती. मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मासे चांगल्या प्रमाणात मिळतात. मात्र, ऐन हंगामात कोरोनामुळे मासेमारी बंद झाल्याने खलाशीही हा हंगाम अर्धवट सोडून गेले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मासेमारी व्यवसायावरच अवकळा पसरली होती.दरम्यान, मागील हंगामात झालेले नुकसान चालू मासेमारी हंगामामध्ये भरून निघेल, या मच्छिमारांच्या आशेवर कोरोनासह सततच्या वादळी वातावरणाने पाणी फेरले आहे. कोरोनाच्या भीतीने खलाशी न परतल्याने सुमारे ८५ टक्के मासेमारी नौका अजूनही बंद स्थिती आहेत. मात्र, ज्या नौकांनी मासेमारी सुरु केली त्यांना निसर्गाने मोठा फटका दिला.

गेल्या पंधरवड्यामध्ये अनेकदा झालेल्या हवामानातील बदलामुळे मासेमारीला खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरु शकते, त्यासाठी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे बहुतांश मालकांनी नौका नांगरावर ठेवण्यातच धन्यता मानली.मासेमारी ठप्प झाल्याने त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या टेम्पो, रिक्षा, पानपट्टी व अन्य व्यवसायावर झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे बहुतांश नौका नांगरावर आहेत. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच कोरोनामुळे इतर राज्यात होणारी माशांची आयात-निर्यात बंदच झाली आहे. 

खोल समुद्रातील मासेमारीची हीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आजही स्थिती फार बिकट आहे. मागील हंगाम कोरोनामुळे तोट्यात गेला. आजही कोरोनाच्या संकटासह वादळी वातावरणामुळे मासेमारी ठप्पच आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.- निसार दर्वे, मच्छीमार नेते, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार