शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यानंतरही नौका बंदरातच, मच्छिमारांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 15:38 IST

मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे एकीकडे खलाशी नाहीत, तर दुसरीकडे कोरोनाचे संकट, मासेमारी बंदचा इतर व्यवसायांवर परिणाममच्छीमार सापडले आर्थिक संकटात, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, वारा थांबण्याची प्रतीक्षा

रत्नागिरी : मासेमारी सुरू होऊन पंधरवडा उलटला तरी मासेमारी ठप्पच आहे. गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मागील मासेमारी हंगाम वादळानंतर कोरोनामुळे तोट्यात गेला होता. कोरोनाच्या भीतीने मासेमारी बंद ठेवावी लागली होती. मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मासे चांगल्या प्रमाणात मिळतात. मात्र, ऐन हंगामात कोरोनामुळे मासेमारी बंद झाल्याने खलाशीही हा हंगाम अर्धवट सोडून गेले होते. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मासेमारी व्यवसायावरच अवकळा पसरली होती.दरम्यान, मागील हंगामात झालेले नुकसान चालू मासेमारी हंगामामध्ये भरून निघेल, या मच्छिमारांच्या आशेवर कोरोनासह सततच्या वादळी वातावरणाने पाणी फेरले आहे. कोरोनाच्या भीतीने खलाशी न परतल्याने सुमारे ८५ टक्के मासेमारी नौका अजूनही बंद स्थिती आहेत. मात्र, ज्या नौकांनी मासेमारी सुरु केली त्यांना निसर्गाने मोठा फटका दिला.

गेल्या पंधरवड्यामध्ये अनेकदा झालेल्या हवामानातील बदलामुळे मासेमारीला खोल समुद्रात जाणे धोकादायक ठरु शकते, त्यासाठी हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे बहुतांश मालकांनी नौका नांगरावर ठेवण्यातच धन्यता मानली.मासेमारी ठप्प झाल्याने त्याचा परिणाम त्यावर अवलंबून असलेल्या टेम्पो, रिक्षा, पानपट्टी व अन्य व्यवसायावर झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसामुळे बहुतांश नौका नांगरावर आहेत. त्यामुळे बाजारात माशांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच कोरोनामुळे इतर राज्यात होणारी माशांची आयात-निर्यात बंदच झाली आहे. 

खोल समुद्रातील मासेमारीची हीच स्थिती आणखी काही दिवस राहिल्यास मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल. आजही स्थिती फार बिकट आहे. मागील हंगाम कोरोनामुळे तोट्यात गेला. आजही कोरोनाच्या संकटासह वादळी वातावरणामुळे मासेमारी ठप्पच आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने मच्छिमारांकडे लक्ष देण्याची गरज आहे.- निसार दर्वे, मच्छीमार नेते, रत्नागिरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरीfishermanमच्छीमार