शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

मरणानंतरही हाल, ग्रामकृती दले पीपीई किटविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हलविण्यासाठी पीपीई किट नाही, वाहन नाही, अशी अवस्था सर्व भागांत दिसत असून, ...

रत्नागिरी : कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हलविण्यासाठी पीपीई किट नाही, वाहन नाही, अशी अवस्था सर्व भागांत दिसत असून, ग्रामकृती दले शस्त्राविनाच कोरोनाशी लढा देत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गुरववाडीतील एका कोरोनाग्रस्त प्रौढाचा अचानक मृत्यू झाल्यानंतर, त्यांचा अंत्यविधीसाठी धावाधाव झाली होती. अखेर पुतण्या आणि काेरोनाबाधित मुलाने पीपीई किट घालून त्या प्रौढाचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून रुग्णालयाच्या स्वाधीन केला.

नेवरे गुरववाडीतील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर ५ दिवसांनी केलेल्या कोरोना चाचणीमध्ये तिचा पती आणि मुलगाही पॉझिटिव्ह आला. सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी त्यांना गृहअलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. मात्र, पत्नी आणि मुलगा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा ताण आल्याने या प्रौढ व्यक्तीचे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.

ही बाब वाडीमध्ये पसरली. मात्र, त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याने, खांदा देण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. काही वेळाने सरपंच दीपक फणसे, पाेलीस पाटील गणेश आरेकर, सर्कल, तलाठी सर्फराज संदे, ग्रामपंचायत सदस्य शकील डिंगणकर यांनी मृताच्या घरी धाव घेतली. मात्र, पुढचा सोपस्कार करायचा कसा आणि कोणी, असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. ग्रामकृती दलाकडे पीपीई किट उपलब्ध नव्हते. त्यामुळे पीपीई किटसाठी धावाधाव करावी लागली. अखेर मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून दोन पीपीई किट आणण्यात आले. त्यानंतर, मृत व्यक्तीचा पुतण्या आणि कोरोनाची लागण झालेल्या मुलगा यांनी पीपीई किट घालून मृतदेह कापड आणि प्लास्टीकमध्ये बांधला. मात्र, मृतदेह नेण्यासाठी लागणाऱ्या वाहनाचीही सोय नव्हती. पोलीस पाटील गणेश आरेकर, ग्रामपंचायत सदस्य शकील डिंगणकर यांनी रत्नागिरीतून शववाहिका मागवून त्यांचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. हे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी पहाटेचे ३ वाजले होते.

ग्रामकृती दले शस्त्राविनाच

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामकृती दलांवर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र, या ग्रामकृती दलाच्या सदस्यांसाठी सॅनिटायझर, मास्क आणि आवश्यकता लागल्यास पीपीई किटची सोय करणे आवश्यक आहे. ती नसल्याने ग्रामकृती दले शस्त्राविनाच कोरोनाशी लढा देत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

निर्जंतुकीकरण नाही

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पुतण्याने घरातील इतरांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी घर निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली. मात्र, दुपार झाली, तरी त्याकडे कोणीही फिरकला नव्हता. त्याबद्दलही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

.....................

जिल्ह्यातील ग्रामकृती दलांना मास्क, सॅनिटायझर वगैरे देण्यासाठी ग्रामपंचायतींनी खर्च करावयाचा आहे. त्याबाबत सूचना देण्याचा विचार सुरू आहे.

- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी,

जिल्हा परिषद, रत्नागिरी.