शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी, तेल तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:40 IST

CoronaVirus, Diwali, Oil, ratnagiri कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने कित्येकांच्या रोजगाारावर परिणाम झाला आहे. आर्थिक झळ सोसत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसली आहे.

ठळक मुद्देदिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी, तेल तापलेभरमसाठ वाढीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले

रत्नागिरी : कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने कित्येकांच्या रोजगाारावर परिणाम झाला आहे. आर्थिक झळ सोसत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसली आहे.कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने खासगी आस्थापनातील कित्येकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरू झाले असले तरी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे तयार पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच अचानक खाद्यतेल, डाळी, कडधान्य यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे.खाद्यतेलाची किंमतही गेल्या महिन्याच्या तुलनेत १५ ते २० रूपयांनी वाढली आहे. डाळींच्या किमतीत १० ते १५ रूपये, कडधान्यांच्या किमतीत १२ ते १५ रूपयांनी वाढ झाली आहे. जूनपासून चहा पावडरचे दर तर किलोमागे ४० ते ५० रूपयांनी वाढले आहेत. कांदा, बटाट्याच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साखर, रवा, मैदा, खोबरे यांचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.कांदा ८५ ते १२० रूपये, बटाटा ५५ ते ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. दिवाळीत तेल, डाळींचा वापर सर्वाधिक होत असल्याने नेमकी याचवेळी दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे.

कोरोनामुळे आधीच दिवाळं वाजलं असतानाच महागाईचा भस्मासूर उसळला आहे. नित्याचा डाळ-भातच महागला असून, फराळाच्या जिन्नसाला तर महागाईची झणझणीत फोडणी बसली आहे. दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणणे अत्यावश्यक आहे.- अनिता यशवंत पवार, गृहिणी

जिल्ह्यात विक्रीसाठी येणारा किराणा माल हा वाशी व कोल्हापूर येथून येत आहे. जागेवरच दरात वाढ झाली आहे. त्यामुळे वाढीव दराने विकणे क्रमप्राप्त होत आहे. दर वाढल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला आहे.- ए. एस्. शेट्ये, विक्रेता.

टॅग्स :DiwaliदिवाळीOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पRatnagiriरत्नागिरी