शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:39 IST

चिपळूण : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहाेचला आहे. लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांनी लगबग सुरू केली असून, दूरवरच्या ...

चिपळूण : गणेशाेत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहाेचला आहे. लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी गणेशभक्तांनी लगबग सुरू केली असून, दूरवरच्या मूर्तीकारखान्यातून गुरुवारी गणरायाला घरी आणण्यात आले. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने खरेदीसाठीही चिपळूणच्या बाजारात झुंबड उडाली होती. रात्री उशिरापर्यंत खरेदी केली जात होती. गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम असल्याचे दिसत आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त मुहूर्तांनुसार विधीवत पूजा करून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या क्षणाला आता काही तासांचा अवधी उरल्याने सर्वत्र उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे. चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येत असल्याने सर्व रस्ते वाहनांनी फुलून गेले आहेत. प्रवाशांची तपासणी नाक्यावर माहिती घेऊन पुढे पाठवले जात आहे.

त्यातच सजावट, रोषणाई आणि बाप्पासाठी नैवैद्य अशी सर्व तयारी करण्यात येत आहे. दूरवरच्या मूर्ती कारखान्यात ऑर्डर करण्यात आलेल्या गणेशमूर्ती एक दिवस अगोदरच घरी आणण्यासाठी गुरुवारी गणेशभक्तांची धावाधाव सुरू होती. दुपारनंतर काहींनी गणेशमूर्ती घरीही आणल्या.

शुक्रवारी गणेश चतुर्थीला गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असल्याने गुरुवारी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड झुंबड उडाली होती. कपड्यांसह फळे, हार, फुले, भाजीपाला, तसेच उत्सवासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी केली जात होती. ग्रामीण भागातील मंडळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. प्रत्येक दुकानात ग्राहकांची गर्दी दिसून येत होती. त्यामुळे व्यापारी देखील आनंदित दिसून येत होते. महिनाभरापूर्वी उदध्वस्त झालेली चिपळूणची बाजारपेठ आता फुलून आणि झगमगून गेली आहे, तर विघनहर्त्याच्या आगमनापुढे कोरोनाची भीतीदेखील मातीमोल ठरली आहे.

-------------------------

वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

गणेशोत्सवानिमित्ताने येथे वारंवार वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर येथे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनही पूर्णतः सज्ज झाले असून, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण, सावर्डे, अलोरे येथील पोलीस स्थानकातही यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

-------------------------

बँकांमध्ये रांगच रांग

महापुरात येथील बहुतांशी एटीएम पाण्याखाली गेल्याने आजही एटीएम यंत्रणा कार्यरत झालेली नाही. अनेक एटीएम बंद असल्याने बँकेत जाऊनच पैसे काढावे लागत आहेत. त्यातच मोबाईल व्हॅन एटीएम ‘आऊट ऑफ सर्व्हिस’ असल्याने खरेदीसाठी आलेल्या चाकरमान्यांसह अन्य ग्राहकांचीही पैसे काढण्यासाठी तारांबळ उडाली. काही बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.