शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

खार बंधार्‍यांवरील ऊर्जा निर्मिती स्वप्नच प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: May 31, 2014 01:11 IST

गावडेआंबरे,चाफेरींची निवड

रहिम दलाल / रत्नागिरी तालुक्यातील दोन खारलँड बंधार्‍यांवर अपांरपरिक ऊर्जा तयार करण्याचा खारलँड विभागाचा प्रस्ताव अजूनही कागदावरच आहे. अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी लागणार्‍या उपकरणांसाठी येणारा खर्च कोण करणार, असा प्रश्न या विभागाला सतावत आहे. जिल्ह्यात कोयना, रत्नागिरी गॅस, जिंदाल, फिनोलेक्स असे वीज तयार करणारे मोठे प्रकल्प आहेत. अर्थात राज्याची गरज उत्पादनापेक्षा अधिक असल्याने विजेची कमतरता नेहमीच भासते. त्यावर पर्याय म्हणून खारलँडडने जिथे बंधारे घातले आहेत, तेथे ऊर्जानिर्मितीचा प्रस्ताव आहे. जिल्ह्यात १७१ खारलँड बंधारे बांधण्यात येणार असून, आतापर्यंत ६९ खारलँड बंधारे बांधण्यात आले आहेत़ त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : मंडणगड-४, दापोली-४, खेड-८, चिपळूण-९, गुहागर-२, रत्नागिरी-२७, लांजा-१, राजापूर-१४ आहेत़ तर आणखी १२ खारलँड बंधार्‍यांची कामे सुरु आहेत़ समुद्राच्या लाटांच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये प्रयत्न करण्यात आला होता. आता शासनाच्या खारलँड विभागानेही अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी पावले उचलली होती. त्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे व ्नचाफेरी कासारी या गावांची निवड केलेली आहे. या बंधार्‍यांमध्ये समुद्राचे पाणी वेगात आतमध्ये शिरत असल्याने त्याचा फायदा घेण्यात येणार आहे. गावडेआंबेरे खारलँड बंधार्‍याला ६५ झडपे, तर चाफेरी कासारी खारलँड बंधार्‍याला २२ झडपे आहेत. या दोन्ही खारलँड बंधार्‍यांच्या प्रत्येकी दोन झडपांचा वापर अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे. दिवसांतून २ वेळा भरती व २ वेळा ओहोटीच्या फायदा घेऊन ४ किलोवॅट अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यात येणार आहे. ही ऊर्जा तयार करण्यापूर्वी या बंधार्‍यांचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव मेढाकडे पाठविण्यात येणार होता. त्यासाठी तयारी सुरु करण्यात आली होती. मात्र, ही तयारी करीत असतानाच ही ऊर्जा तयार करण्यासाठी सुरुवातीला त्यासाठी लागणार्‍या उपकरणांसाठी खर्च मोठ्या प्रमाणात करावा लागतो. तो खर्च खारलँड विभागाला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च कुठून करावा, असा प्रश्न खारलँड विभागासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे आता अपारंपरिक ऊर्जा तयार करण्याचा प्रस्ताव कागदावरच राहिला असून तो बारगळला आहे.