शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी निर्यात रोडावल्यामुळे राज्याअंतर्गत विक्रीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा दि. ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन मंडळातर्फे राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या १५० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू असून, उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. परदेशातून आंब्याला चांगली मागणी चांगली होती. रत्नागिरीतील पणन मंडळातर्फे सद्गुरू एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. परदेशासह दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला होता. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला.

पणन विभागाच्या माध्यमातून सदगुरू एंटरप्रायजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमान सेवाच बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येही दर कोसळले असल्यामुळे राज्यांतर्गत विक्री परवडत आहे. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जाग्यावरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

................................

स्थानिक शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. मात्र विमानसेवाच बंद असल्यामुळे निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेस प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस