शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

परदेशी निर्यात रोडावल्यामुळे राज्याअंतर्गत विक्रीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा दि. ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन मंडळातर्फे राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या १५० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू असून, उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. परदेशातून आंब्याला चांगली मागणी चांगली होती. रत्नागिरीतील पणन मंडळातर्फे सद्गुरू एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. परदेशासह दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला होता. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला.

पणन विभागाच्या माध्यमातून सदगुरू एंटरप्रायजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमान सेवाच बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येही दर कोसळले असल्यामुळे राज्यांतर्गत विक्री परवडत आहे. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जाग्यावरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

................................

स्थानिक शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. मात्र विमानसेवाच बंद असल्यामुळे निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेस प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस