शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

परदेशी निर्यात रोडावल्यामुळे राज्याअंतर्गत विक्रीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आंबा उत्पादन कमी असताना, परदेशातून आंब्याला चांगली मागणी होती, मात्र कोरोनामुळे विमानवाहतूक सेवा दि. ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यात ठप्प झाली आहे. वाशी येथील आंब्याचे दर गडगडले असून, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पणन मंडळातर्फे राज्यांतर्गत विक्रीवर भर देण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक येथे शेतकऱ्यांच्या १५० आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

आंबा उत्पादन कमी असतानाच, निर्यातीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांकडील दुसऱ्या टप्प्यातील आंबा सुरू असून, उष्म्यामुळे आंबा लवकर तयार होत आहे. परदेशातून आंब्याला चांगली मागणी चांगली होती. रत्नागिरीतील पणन मंडळातर्फे सद्गुरू एंटरप्रायझेसच्या माध्यमातून कॅनडासाठी ४५० डझन, लंडनसाठी ७८८ डझन, तर कतारसाठी ४२६ डझन आंबा निर्यात करण्यात आला आहे. परदेशासह दिल्लीतील विक्रीवर विशेष भर देण्यात आला होता. दिल्लीत एकूण सात हजार २०० डझन आंबा पाठविण्यात आला.

पणन विभागाच्या माध्यमातून सदगुरू एंटरप्रायजेसतर्फे शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात येऊन रत्नागिरीतून थेट आंबा निर्यात करण्यात येत होता. विमान सेवाच बंद झाल्यामुळे निर्यात बंद झाली आहे. मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई, पुणे, नाशिक येथील ग्राहकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. ५०० ते ६०० रुपये डझन दराने आंबा विक्री सुरू आहे. वाशी येथील एपीएमसी मार्केटमध्येही दर कोसळले असल्यामुळे राज्यांतर्गत विक्री परवडत आहे. शेतकऱ्यांना हमाली, वाहतूक खर्च जाऊन दर परवडत नसल्यामुळे एपीएमसीपेक्षा जाग्यावरील विक्री शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.

................................

स्थानिक शेतकऱ्यांना जाग्यावरच चांगला दर प्राप्त व्हावा, यासाठी अपेडाच्या मान्यतेने सदगुरू एंटरप्रायझेसतर्फे जगातील विविध देशांपर्यंत आंबा विक्री करताना थेट निर्यातीवर भर देण्यात आला होता. मात्र विमानसेवाच बंद असल्यामुळे निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यांतर्गत आंबा विक्रीसाठी सद्गुरू एंटरप्रायझेस प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्यात येत आहे.

- प्रांजली प्रशांत नारकर, संचालिका, सदगुरू एंटरप्रायझेस