शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

आठ माध्यमिक शाळा अनधिकृत!

By admin | Updated: June 7, 2014 00:43 IST

राजेंद्र अहिरे : शिक्षण विभागाने दिली कारवाईची नोटीस

टेंभ्ये : शासनाची पूर्वपरवानगी न घेता सुरु करण्यात आलेल्या जिल्ह्यातील आठ माध्यमिक शाळा शिक्षण विभागाने अनधिकृत ठरवल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत या शाळांना कारवाईची नोटीस पाठवण्यात आली असून, संबंधित शाळांमध्ये विद्यार्थी दाखल करु नयेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे यांनी केले आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९मधील तरतुदीनुसार कोणत्याही माध्यमाची नवीन शाळा सुरु करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. जिल्ह्यामध्ये अशा ८ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरु आहेत.या आठ अनधिकृत शाळांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत शाळा तत्काळ बंद करण्याबाबत नोटीस काढण्यात आल्या आहेत. शिक्षण हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) व १९ (१) मधील तरतुदीनुसार या शाळांना १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.तसेच शाळा बंद करण्याची नोटीस दिल्यसानंतरदेखील शाळा सुरु ठेवल्यास प्रतिदिवस १० हजार रुपये दंड आकारला जाऊ शकतो. या कायद्यातील तरतुदीनुसार शाळा मान्यतेचे सर्व निकष पूर्ण करुन शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय नवीन शाळा सुरु करता येत नाहीत.संबंधित शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांना दाखल करु नये. अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असे शिक्षणाधिकारी अहिरे यांनी कळविले आहे. त्यामुळे या शाळांना आता लवकरच टाळे लागणार आहे.शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.(वार्ताहर)