शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

खेड तालुक्यातील आठ महसुली गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

खेड : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जेवढी प्रयत्नशील आहे, तेवढेच प्रयत्न त्या - त्या गावच्या ग्रामपंचायत ...

खेड : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जेवढी प्रयत्नशील आहे, तेवढेच प्रयत्न त्या - त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील २०० पैकी १९२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ८ महसुली गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे.

तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सवणस ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सवणस व मुळगाव या दोन्ही महसुली गावात अद्याप कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. या ग्रामपंचायतीत २९० कुटुंबे असून, लोकसंख्या १०४६ एवढी आहे. कर्जी, तुंबाड व चौगुले मोहल्ला या अन्य खाडीपट्ट्यातील तीन गावात कोरोनाचा प्रवेश ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने रोखला आहे. कर्जी गावात ३४४ कुटुंबे असून, लोकसंख्या १६९७ आहे, तर तुंबाडमध्ये २३१ कुटुंबे व ७०९ लोकसंख्या आहे. तुळशी खुर्द व बुद्रुकमध्ये २४२ कुटुंबे असून, लोकसंख्या ७७० आहे. या गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दुसरी लाटेतही हे गाव अबाधित राहिले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जैतापूर या गावात २५० कुटुंबे व ७५१ लोकसंख्या असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत या गावाने कोरोनाला आपल्या गावात शिरकाव करू दिलेला नाही. ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाने गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असतानाही जैतापूरवासीयांनी कोरोनाला आपल्या वेशीवर रोखून धरले आहे. भेलसई ग्रामपंचायतीत येणाऱ्या बौद्धवाडी या महसुली गावातही अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेले सहकार्य व घेतलेली काळजी, यामुळे या आठ गावांमध्ये अजूनही कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही.

....................................

ग्राम कृती दलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा किंवा चाकरमानी गावात आला तरी त्याची चौकशी करून होम क्वारंटाईन केले जात होते. सरपंच, प्रशासन यांच्या सहकार्याने गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली गेली. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य करून सर्व नियमांचे पालन केले.

- विजया पवार - ननावरे, ग्रामसेविका, कर्जी

................................

ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे जैतापूर गावात अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. गावात येणारे चाकरमानी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून अलगीकरणात राहत आहेत. गावात जनजागृती व नियमित तपासणी यामुळे गाव कोरोना संसर्गापासून दूर राहिले आहे.

- विनोद तोडणकर, ग्रामसेवक, जैतापूर.