शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

खेड तालुक्यातील आठ महसुली गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST

खेड : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जेवढी प्रयत्नशील आहे, तेवढेच प्रयत्न त्या - त्या गावच्या ग्रामपंचायत ...

खेड : दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जेवढी प्रयत्नशील आहे, तेवढेच प्रयत्न त्या - त्या गावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थांनीही केले. त्यामुळे तालुक्यातील २०० पैकी १९२ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असला तरी अजूनही ८ महसुली गावांनी कोरोनाला गावात प्रवेश दिलेला नाही. कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा मार्च महिन्यात लागू झालेल्या संचारबंदीनंतर आजतागायत प्रशासन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना हळूहळू यश येत आहे.

तालुक्यातील खाडीपट्ट्यातील सवणस ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सवणस व मुळगाव या दोन्ही महसुली गावात अद्याप कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. या ग्रामपंचायतीत २९० कुटुंबे असून, लोकसंख्या १०४६ एवढी आहे. कर्जी, तुंबाड व चौगुले मोहल्ला या अन्य खाडीपट्ट्यातील तीन गावात कोरोनाचा प्रवेश ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मदतीने रोखला आहे. कर्जी गावात ३४४ कुटुंबे असून, लोकसंख्या १६९७ आहे, तर तुंबाडमध्ये २३१ कुटुंबे व ७०९ लोकसंख्या आहे. तुळशी खुर्द व बुद्रुकमध्ये २४२ कुटुंबे असून, लोकसंख्या ७७० आहे. या गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या दुसरी लाटेतही हे गाव अबाधित राहिले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जैतापूर या गावात २५० कुटुंबे व ७५१ लोकसंख्या असून, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत या गावाने कोरोनाला आपल्या गावात शिरकाव करू दिलेला नाही. ग्रामपंचायत, ग्रामकृती दल, आशासेविका, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त प्रयत्नाने गेल्या दोन महिन्यांत तालुक्यात इतरत्र मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असतानाही जैतापूरवासीयांनी कोरोनाला आपल्या वेशीवर रोखून धरले आहे. भेलसई ग्रामपंचायतीत येणाऱ्या बौद्धवाडी या महसुली गावातही अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. ग्रामस्थांनी प्रशासनाला केलेले सहकार्य व घेतलेली काळजी, यामुळे या आठ गावांमध्ये अजूनही कोरोनाला शिरकाव करता आलेला नाही.

....................................

ग्राम कृती दलाने वाडीनिहाय काम केले. कोणी पाहुणा किंवा चाकरमानी गावात आला तरी त्याची चौकशी करून होम क्वारंटाईन केले जात होते. सरपंच, प्रशासन यांच्या सहकार्याने गावात सुरुवातीपासूनच जनजागृती केली गेली. तसेच ग्रामस्थांनीही सहकार्य करून सर्व नियमांचे पालन केले.

- विजया पवार - ननावरे, ग्रामसेविका, कर्जी

................................

ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्यामुळे जैतापूर गावात अद्यापपर्यंत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. गावात येणारे चाकरमानी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून अलगीकरणात राहत आहेत. गावात जनजागृती व नियमित तपासणी यामुळे गाव कोरोना संसर्गापासून दूर राहिले आहे.

- विनोद तोडणकर, ग्रामसेवक, जैतापूर.