शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

शिक्षण विभाग बॅकफूटवर

By admin | Updated: November 22, 2014 00:15 IST

निर्णय चुकीचा : आॅफ लाईन पद्धतीने वेतनबिले स्वीकारण्याची मागणी

सागर पाटील - टेंभ्ये -संचमान्यता व अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर गेला महिनाभर शिक्षण विभागाचा सावळागोंधळ सुरु आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांचा काहीही संबंध नाही, अशा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार बिल न स्वीकारण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय पूर्णत: चुकीचा असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विविध संघटनांच्या मागण्या व शासनाचा आदेश या संघर्षामध्ये सर्वसामान्य अध्यापक व कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे अयोग्य आहे. हा सावळा गोंधळ असाच सुरु राहिला तर नोव्हेंबरचा पगार कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळणे अशक्य आहे. यावर उपाय म्हणून आॅफ लाईन पद्धतीने वेतन बिले स्वीकारण्याची मागणी होत आहे.सन २०१३-१४च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांचे १०० टक्के समावेशन पूर्ण झाले आहे. एकही शिक्षक सेवेतून बाहेर जात नाही, असे असतानादेखील काही ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त न केल्याने व काही ठिकाणी हजर न करुन घेतल्याने ही प्रक्रिया प्रलंबित आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अपुरी आहे, त्या शाळांमधील शिक्षकदेखील अतिरिक्त करण्यात येऊ नयेत, ही मागणी अव्यवहार्य असल्याचे मत शिक्षण विभागाकडून व्यक्त केले जात आहे. या प्रक्रियेला विरोध करणाऱ्या शाळांची वेतन देयके स्वीकारु नयेत, असा आदेश शासनस्तरावरुन काढण्यात आला आहे. यामुळे प्रत्यक्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांचा कोणताही दोष नसताना त्यांचे पगार लांबणीवर जाणे हे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त केले जात आहे. शासन स्तरावरुन याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने हा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात एकही शिक्षक सेवाबाह्य राहात नाही. यामुळे शिक्षकांचा प्रश्न विनाव्यत्यय सुटण्यास हरकत नसल्याचे मत शिक्षकवर्गातून व्यक्त होत आहे. सर्व बाबींचा साकल्याने विचार करून शासनाने सध्या आॅफ लाईन पध्दतीने वेतन देयके पत्रके स्वीकारून वेतन देण्यात यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसे न झाल्यास शिक्षकांवर अन्याय होईल.कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अन्यायकारकचतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा नवा आकृतीबंध हा निश्चितच अन्यायकारक आहे. एका शाळेमध्ये किमान दोन शिपाई असणे आवश्यक आहे. लिपिकांच्या बाबतीमधील विद्यार्थीसंख्येचा निकष अव्यवहार्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांवर अन्याय होत आहे. याबाबत शासन स्तरावरुन तत्काळ निर्णय होणे आवश्यक आहे.आॅफलाईन वेतन देयके स्वीकाराजिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होणे आवश्यक आहे. संचमान्यतेच्या प्रश्नामुळे वेतन लांबणीवर जाणे अयोग्य आहे. त्यामुळे सर्व शाळांची वेतन बिले आॅफलाईन पद्धतीने तत्काळ स्वीकारण्यात यावीत, अशी मागणी अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी केली आहे.संचमान्यतेसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नावर लवकरच शासन निर्णय होणार आहे. शासनाचा आदेश होताच त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल. शिक्षक कर्मचाऱ्याला कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.- सर्जेराव जाधव, शिक्षण संचालक