शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

डस्टबीन अजूनही कचऱ्यात

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

रत्नागिरी नगरपरिषद : ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पडून

रत्नागिरी : शहरातील एलइडी प्रकल्पाचा दीड वर्ष सुरू असलेला घोळ नुकताच संपला आहे. एलइडी पथदीप शहरात सुरू झाले आहेत. आता शहरवासीयांना ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक डस्टबीन देण्याच्या कार्यक्रमाचा घोळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर पोत्यांमध्ये भरलेली डस्टबीन वितरण करण्याचा महूर्त कधी निघणार? निवडणुकीच्या धामधुमीत वितरणाचा मुहूर्त आहे काय, असा खोचक सवाल रत्नागिरीकरांमधून विचारला जात आहे. रत्नागिरीचा घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांत होऊ शकलेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असताना शहरवासीयांना प्रत्येक कुटुंबामागे कचरा संकलनासाठी दोन डस्टबीन वितरीत करण्याची योजना पालिकेने आखली. त्यासाठी मध्यम आकाराच्या ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पालिकेत आणल्या गेल्या. या डस्टबीनची पोती पालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. यातील प्रत्येक डस्टबीनवर नंबर टाकला जाणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कारभाऱ्यांनी सांगितले होते. परंतु आतापर्यंत नंबर टाकण्याचे कामच पूर्ण झालेले नाही. ५० हजारपैकी अवघ्या १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यात आल्याचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी स्पष्ट केले आहे. १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी दोन महिने लागले तर उर्वरित ३८ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी अजून सहा महिने लागणार काय, असा सवालही केला जात आहे. एलइडी योजनेसाठी प्रथम मागवण्यात आलेल्या निविदा अधिक दराच्या होत्या. त्यावर वादंग झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातला व नंतर दोन कोटींचा खर्च ७० लाखांनी कमी झाला. त्यामुळे पालिकेच्या अनेक योजना, प्रकल्पांबाबत संशयाचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. घनकचरा प्रकल्पाचा पत्ता नाही. प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात कचऱ्याचा खतप्रकल्प उभारण्याचाही पत्ता नाही. मात्र, आता ओला व सुका कचरा संकलनासाठी नागरिकांना पालिकेकडून दोन छोट्या डस्टबीन दिल्या जाणार आहेत. या डस्टबीनचे वितरण नंबरमुळे अडले आहे की निवडणुकीमुळे अडले आहे, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे. या डस्टबीन खरेदीसाठी तब्बल २५ लाखांवर रक्कम खर्च करण्यात आली आहे. खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत या डस्टबीनचा दर्जा आहे की नाही, घाऊक प्रमाणात डस्टबीन खरेदी केलेल्या असल्याने त्यासाठी २५ लाख एवढी रक्कम योग्य आहे की यात काळेबेरे आहे, असा संशयही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत पारदर्शकता दाखवत खुलासा होण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)+रत्नागिरी शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. दर महिन्याला ७२ ते ७५ टन कचरा संकलित होतो, तर वर्षभरात ८५० ते ९०० टन कचरा संकलन होते. त्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेला नाही. घनकचरा प्रकल्पाच्या नावाने आश्वासनांची शाळा सुरू असून, प्रकल्पाबाबत पालिका गंभीर का नाही, असा सवाल केला जात आहे.