शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

डस्टबीन अजूनही कचऱ्यात

By admin | Updated: July 21, 2016 00:56 IST

रत्नागिरी नगरपरिषद : ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पडून

रत्नागिरी : शहरातील एलइडी प्रकल्पाचा दीड वर्ष सुरू असलेला घोळ नुकताच संपला आहे. एलइडी पथदीप शहरात सुरू झाले आहेत. आता शहरवासीयांना ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी प्लास्टिक डस्टबीन देण्याच्या कार्यक्रमाचा घोळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर पोत्यांमध्ये भरलेली डस्टबीन वितरण करण्याचा महूर्त कधी निघणार? निवडणुकीच्या धामधुमीत वितरणाचा मुहूर्त आहे काय, असा खोचक सवाल रत्नागिरीकरांमधून विचारला जात आहे. रत्नागिरीचा घनकचरा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षांत होऊ शकलेला नाही. त्याचे भिजत घोंगडे असताना शहरवासीयांना प्रत्येक कुटुंबामागे कचरा संकलनासाठी दोन डस्टबीन वितरीत करण्याची योजना पालिकेने आखली. त्यासाठी मध्यम आकाराच्या ५० हजार प्लास्टिक डस्टबीन पालिकेत आणल्या गेल्या. या डस्टबीनची पोती पालिका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आली आहेत. यातील प्रत्येक डस्टबीनवर नंबर टाकला जाणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कारभाऱ्यांनी सांगितले होते. परंतु आतापर्यंत नंबर टाकण्याचे कामच पूर्ण झालेले नाही. ५० हजारपैकी अवघ्या १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यात आल्याचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी स्पष्ट केले आहे. १२ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी दोन महिने लागले तर उर्वरित ३८ हजार डस्टबीनवर नंबर टाकण्यासाठी अजून सहा महिने लागणार काय, असा सवालही केला जात आहे. एलइडी योजनेसाठी प्रथम मागवण्यात आलेल्या निविदा अधिक दराच्या होत्या. त्यावर वादंग झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यात लक्ष घातला व नंतर दोन कोटींचा खर्च ७० लाखांनी कमी झाला. त्यामुळे पालिकेच्या अनेक योजना, प्रकल्पांबाबत संशयाचे वातावरण शहरात निर्माण झाले आहे. घनकचरा प्रकल्पाचा पत्ता नाही. प्रत्येक अपार्टमेंटच्या आवारात कचऱ्याचा खतप्रकल्प उभारण्याचाही पत्ता नाही. मात्र, आता ओला व सुका कचरा संकलनासाठी नागरिकांना पालिकेकडून दोन छोट्या डस्टबीन दिल्या जाणार आहेत. या डस्टबीनचे वितरण नंबरमुळे अडले आहे की निवडणुकीमुळे अडले आहे, असा सवाल आता नागरिकांतून केला जात आहे. या डस्टबीन खरेदीसाठी तब्बल २५ लाखांवर रक्कम खर्च करण्यात आली आहे. खर्च करण्यात आलेल्या रकमेच्या तुलनेत या डस्टबीनचा दर्जा आहे की नाही, घाऊक प्रमाणात डस्टबीन खरेदी केलेल्या असल्याने त्यासाठी २५ लाख एवढी रक्कम योग्य आहे की यात काळेबेरे आहे, असा संशयही नागरिकांमधून व्यक्त होत आहे. याबाबत पारदर्शकता दाखवत खुलासा होण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)+रत्नागिरी शहरात दररोज २२ ते २४ टन कचरा संकलित केला जातो. दर महिन्याला ७२ ते ७५ टन कचरा संकलित होतो, तर वर्षभरात ८५० ते ९०० टन कचरा संकलन होते. त्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नगरपरिषदेकडून सुरू करण्यात आलेला नाही. घनकचरा प्रकल्पाच्या नावाने आश्वासनांची शाळा सुरू असून, प्रकल्पाबाबत पालिका गंभीर का नाही, असा सवाल केला जात आहे.