शहरं
Join us  
Trending Stories
1
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
2
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
3
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
4
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
5
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
6
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
7
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
8
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
9
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
10
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
11
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
12
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
13
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
14
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
15
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
16
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
17
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
18
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
19
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
20
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  

पावसामुळे भाज्यांची आवक घटली, दर ‘जैसे- थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात होणारी भाजीपाला आवक घटली आहे. भाज्यांचे दर अद्याप ‘जैसे थे’ आहेत. खाद्यतेलाच्या दरात किंचित घसरण झाली असून, दर आणखी खाली यावेत अशी अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात भाज्या लगतच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येतात. फळे मात्र वाशी (नवी मुंबई), कोल्हापूर येथून येतात. भाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलोच्या घरात असून, कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा विक्री २२ ते २५ रुपये किलो दराने सुरू आहे. बाजारात सर्व प्रकारची फळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनलाॅक सुरू झाले असले तरी गावोगावी भाजी विक्रेते वाहनातून भाजी विक्रीसाठी फिरत आहेत. त्यामुळे भाज्यांची उपलब्धता ग्रामीण भागात होत असून, दरात मात्र घसरण न झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. पालेभाज्या, कोथिंबीर जुडी अद्याप १५ ते २० रुपये, तर टोमॅटो २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. फोडशी, टाकळा, भारंगी, तसेच शेवग्याचा पाला, फणसाचे गरे, सुरण, आठला विक्रीसाठी येत आहेत. ग्रामीण भागातून मोजकेच विक्रेते भाज्या विक्रीसाठी शहरात आणत असल्याने हातोहात भाज्या संपत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

अननस मुबलक स्वरूपात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. गावठी, तसेच बाजारी अननस विक्रीला येत असून, ३५ ते ४० रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. गावठी अननससाठी विशेष पसंती होत आहे.

कांदा दर अद्याप ‘जैसे थे’च आहे. बटाट्याचेही दर घटलेले नाहीत. कांदा २५ ते ३० ते बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लसूण विक्री

१५० ते १६० रुपये दराने सुरू आहे. दर परवडत नसल्याने ग्राहक लागतील तेवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत

अनलाॅकमुळे भाज्या विक्रेते गावोगावी येत असले तरी भाज्यांच्या दरावर मात्र काहीच फरक झालेला नाही. किमान कांदा, बटाटा, लसणाचे दर तरी खाली येणे आवश्यक होते. दरावर निर्बंध नसल्यामुळे वाढ सातत्याने होत आहे. इंधन दरातील वाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याने याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

-उज्ज्वला शिंदे, गृहिणी

गेल्या वर्षभरानंतर खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली. वास्तविक तेलाचे दर अजून खाली येणे अपेक्षित आहे. कोराेनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे असून, त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे.

- शमिका देवरूखकर, गृहिणी