शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पावसामुळे भाज्यांची आवक घटली, दर ‘जैसे- थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात होणारी भाजीपाला आवक घटली आहे. भाज्यांचे दर अद्याप ‘जैसे थे’ आहेत. खाद्यतेलाच्या दरात किंचित घसरण झाली असून, दर आणखी खाली यावेत अशी अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात भाज्या लगतच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येतात. फळे मात्र वाशी (नवी मुंबई), कोल्हापूर येथून येतात. भाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलोच्या घरात असून, कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा विक्री २२ ते २५ रुपये किलो दराने सुरू आहे. बाजारात सर्व प्रकारची फळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनलाॅक सुरू झाले असले तरी गावोगावी भाजी विक्रेते वाहनातून भाजी विक्रीसाठी फिरत आहेत. त्यामुळे भाज्यांची उपलब्धता ग्रामीण भागात होत असून, दरात मात्र घसरण न झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. पालेभाज्या, कोथिंबीर जुडी अद्याप १५ ते २० रुपये, तर टोमॅटो २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. फोडशी, टाकळा, भारंगी, तसेच शेवग्याचा पाला, फणसाचे गरे, सुरण, आठला विक्रीसाठी येत आहेत. ग्रामीण भागातून मोजकेच विक्रेते भाज्या विक्रीसाठी शहरात आणत असल्याने हातोहात भाज्या संपत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

अननस मुबलक स्वरूपात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. गावठी, तसेच बाजारी अननस विक्रीला येत असून, ३५ ते ४० रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. गावठी अननससाठी विशेष पसंती होत आहे.

कांदा दर अद्याप ‘जैसे थे’च आहे. बटाट्याचेही दर घटलेले नाहीत. कांदा २५ ते ३० ते बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लसूण विक्री

१५० ते १६० रुपये दराने सुरू आहे. दर परवडत नसल्याने ग्राहक लागतील तेवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत

अनलाॅकमुळे भाज्या विक्रेते गावोगावी येत असले तरी भाज्यांच्या दरावर मात्र काहीच फरक झालेला नाही. किमान कांदा, बटाटा, लसणाचे दर तरी खाली येणे आवश्यक होते. दरावर निर्बंध नसल्यामुळे वाढ सातत्याने होत आहे. इंधन दरातील वाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याने याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

-उज्ज्वला शिंदे, गृहिणी

गेल्या वर्षभरानंतर खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली. वास्तविक तेलाचे दर अजून खाली येणे अपेक्षित आहे. कोराेनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे असून, त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे.

- शमिका देवरूखकर, गृहिणी