शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पावसामुळे भाज्यांची आवक घटली, दर ‘जैसे- थे’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेले दहा-बारा दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसाने रविवारी मात्र विश्रांती घेतली होती. संततधार पावसामुळे जिल्ह्यात होणारी भाजीपाला आवक घटली आहे. भाज्यांचे दर अद्याप ‘जैसे थे’ आहेत. खाद्यतेलाच्या दरात किंचित घसरण झाली असून, दर आणखी खाली यावेत अशी अपेक्षा ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात भाज्या लगतच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येतात. फळे मात्र वाशी (नवी मुंबई), कोल्हापूर येथून येतात. भाज्यांचे दर ७० ते ८० रुपये किलोच्या घरात असून, कांदा २५ ते ३० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. बटाटा विक्री २२ ते २५ रुपये किलो दराने सुरू आहे. बाजारात सर्व प्रकारची फळे मुबलक स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनलाॅक सुरू झाले असले तरी गावोगावी भाजी विक्रेते वाहनातून भाजी विक्रीसाठी फिरत आहेत. त्यामुळे भाज्यांची उपलब्धता ग्रामीण भागात होत असून, दरात मात्र घसरण न झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे. पालेभाज्या, कोथिंबीर जुडी अद्याप १५ ते २० रुपये, तर टोमॅटो २० ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

बाजारात रानभाज्या विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. हंगामी भाज्यांना विशेष मागणी होत आहे. फोडशी, टाकळा, भारंगी, तसेच शेवग्याचा पाला, फणसाचे गरे, सुरण, आठला विक्रीसाठी येत आहेत. ग्रामीण भागातून मोजकेच विक्रेते भाज्या विक्रीसाठी शहरात आणत असल्याने हातोहात भाज्या संपत आहेत. ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.

अननस मुबलक स्वरूपात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. गावठी, तसेच बाजारी अननस विक्रीला येत असून, ३५ ते ४० रुपये नग दराने अननस विक्री सुरू आहे. गावठी अननससाठी विशेष पसंती होत आहे.

कांदा दर अद्याप ‘जैसे थे’च आहे. बटाट्याचेही दर घटलेले नाहीत. कांदा २५ ते ३० ते बटाटा २२ ते २५ रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. लसूण विक्री

१५० ते १६० रुपये दराने सुरू आहे. दर परवडत नसल्याने ग्राहक लागतील तेवढेच कांदे, बटाटे खरेदी करीत आहेत

अनलाॅकमुळे भाज्या विक्रेते गावोगावी येत असले तरी भाज्यांच्या दरावर मात्र काहीच फरक झालेला नाही. किमान कांदा, बटाटा, लसणाचे दर तरी खाली येणे आवश्यक होते. दरावर निर्बंध नसल्यामुळे वाढ सातत्याने होत आहे. इंधन दरातील वाढीचा परिणाम भाज्यांच्या दरावर होत असल्याने याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.

-उज्ज्वला शिंदे, गृहिणी

गेल्या वर्षभरानंतर खाद्यतेलाच्या दरात १० ते १५ रुपयांनी घसरण झाली. वास्तविक तेलाचे दर अजून खाली येणे अपेक्षित आहे. कोराेनामुळे रोजगार बुडाले असून, वाढत्या महागाईचा सामना करणे अवघड बनले आहे. साधा वरण-भातही महागला आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे असून, त्यासाठी सर्वसामान्यांचा किमान विचार करणे गरजेचे आहे.

- शमिका देवरूखकर, गृहिणी