शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

एका पत्रामुळे भाजपचा महाराष्ट्रात नंगानाच सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST

रत्नागिरी : शिवसेना ही राज्यात सत्तारूढ पार्टी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इमेज सुसंस्कृत, संयमी, शांत आणि अभ्यासूपणा असा ...

रत्नागिरी : शिवसेना ही राज्यात सत्तारूढ पार्टी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इमेज सुसंस्कृत, संयमी, शांत आणि अभ्यासूपणा असा स्वभाव संपूर्ण महाराष्ट्राला भावलेला आहे. त्यामुळे त्यांनी उतावळेपणा न दाखवता त्या पत्रातल्या दोन बोलक्या त्रुटी महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिल्या. भाजपने परमबीर सिंगच्या पत्राच्या नावाने महाराष्ट्रात नंगानाच सुरू केला आहे. त्या भाजपच्या लक्षात आणून दिले गेले की, त्या पत्रावर त्यांची सहीच नाही. तसेच त्यांनी जो ई-मेल आयडी दिला आहे. तो त्यांचा ऑफिशियल नाहीच, या दोन बाबी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून समोर आणण्यात आल्या आहेत. याच्यातून महाराष्ट्राला काय तो संदेश गेलेला आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया आमदार भास्कर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनीही सांगितले की, दिल्लीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते. त्यानंतर ते मुंबईत गेल्यावर हे पत्र पब्लिश कसे काय झाले, हा तिसरा मुद्दा आहे. या पत्राबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी बोलतील, असेही आमदार जाधव यांनी सांगितले. भाजपच्या नैतिकतेबाबत ते म्हणाले की, नैतिकता कोणी शिकवायची. ज्यावेळेला अमित शाह गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांच्यावर गुजरातचे पोलीसप्रमुख डी. जी. वंजारी यांनी याहीपेक्षा भयानक आरोप केले होते. त्यावेळी अमित शाह यांनी राजीनामा दिला होता का, तसेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी मोदींनी राजीनामा दिला होता का, असा प्रश्न आमदार जाधव यांनी उपस्थित केला.

काही दिवसांपूर्वी खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या करून सर्वांची नावे दिली. प्रफुल्ल छेडा याचे नाव असून तो मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होता. अमित शहांना न्यायालयाने तीन वर्षे राज्याच्या बाहेर पाठवले. ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांच्यापैकी कोणी राजीनामा दिला. त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी भाजपाने करू नयेत, अशा शब्दात आमदार जाधव यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केले.