शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

निधीअभावी अर्जुना नदीपलीकडील जाेडरस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

राजापूर : राजापूरमधील अर्जुना नदीच्या पलीकडील चार वाड्यांकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्क्या रस्त्याचे काम अद्याप ...

राजापूर : राजापूरमधील अर्जुना नदीच्या पलीकडील चार वाड्यांकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूच्या पक्क्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असल्याने पावसाळी दिवसांत त्यावरून वाहने चालविणे अवघड बनणार आहे. दरम्यान या वाढीव कामासाठी निधीची तरतूद न केल्याने जोडरस्त्याचे काम रखडल्याचे पुढे आले आहे.

रायपाटणमधील अर्जुना नदीच्या पलीकडील बागवाडी, कदमवाडी, बौद्धवाडी आणि खाडेवाडी यांना जोडणाऱ्या वाहतुकीचा पूल गतवर्षी बांधून पूर्ण झाला होता. त्या पुलाचे कठडे व दोन्ही बाजूला जोडणाऱ्या पक्क्या स्वरूपातील जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मात्र, पुलावरून रहदारी सुरू झाली होती. उन्हाळ्यात संबंधित ठेकेदाराने पुलाच्या कठड्यांचे काम पूर्ण केले. मात्र, पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम अपूर्णावस्थेत राहिले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या वाढीव स्वरूपातील कामासाठी निधीची तरतूद नसल्याने काम पूर्ण झालेले नसल्याचे पुढे आले आहे. विद्यमान क्षणी पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते सततच्या वाहतुकीमुळे खराब बनले आहेत. त्यावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे. रस्त्यावरील खडी वर तर आली असून, ती आजूबाजूला पसरली आहे. त्यामुळे वाहने जपून चालवावी लागतात. वाहने घसरण्याचा धोकाही आहे.

पावसाळा सुरू व्हायला जेमतेम पंधरा ते वीस दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी जोडरस्त्याचे काम होणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. संबंधित विभागाने वाढीव निधी दिलेला नाही़ परिणामी, पुलाला जोडणाऱ्या दुतर्फा बाजूच्या रस्त्यांचे काम अपूर्णावस्थेत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक वर्षे रायपाटणमधील चार वाड्यांकडे जाण्यासाठी अर्जुना नदीवर पूल बांधणे व पक्क्या स्वरूपाचा रस्ता बनविणे यासाठी चार वाड्यांतील मुंबईसह स्थानिक ग्रामस्थांनी सातत्याने संघर्ष केला होता़ शासन दरबारी पत्रव्यवहार सुरूच ठेवला होता. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे उपोषणही केले होते़ त्याची दखल माजी खा. नीलेश राणे यांनी घेतली होती़ त्यानंतर त्यांनी राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची स्थानिक ग्रामस्थांसह भेट घेतल्यानंतर रायपाटणमधील पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होतीच़ शिवाय वर्षभरात काम मार्गीही लागले होते. आ. राजन साळवी यांनीही या पुलासाठी पाठपुरावा केला होता.

रायपाटणमधील चार वाड्यांना जोडणाऱ्या अर्जुना नदीवरील पुलाचे काम मार्गी लागले आहे. मात्र, त्या पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंचे जोडरस्ते यांचे काम अपूर्णावस्थेत असल्याने यावर्षी पुलावरून वाहतूक करणे अवघड बनले आहे. संबंधित बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी पुलाला जोडणाऱ्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याचे पक्क्या स्वरूपात काम करावे, अशी मागणी आता स्थानिकांमधून करण्यात आली आहे.