शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
3
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
4
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
5
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
7
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
8
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
9
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
10
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
11
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
12
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
13
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
14
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
15
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
16
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
17
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
18
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
19
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
20
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे

ठेकेदाराअभावी रखडल्या कृषिपंपांच्या जोडण्या

By admin | Updated: June 29, 2016 23:58 IST

महावितरण कंपनी : डोंगराळ भागामुळे उदासीनता

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वीजजोडण्या दिल्या जातात. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात वसलेला आहे. वीजजोडण्यांसाठी महावितरण ठेकेदारांची नियुक्ती करते. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या १ हजार १२४ जोडण्या रखडल्या आहेत.जिल्ह्यातील अनेक बेकार युवक रोजगार न मिळाल्याने सामूहिक शेती करीत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. पावसाळी शेती बरोबर बारमाही शेतीसाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषिपंपांच्या जोडण्या घेण्यात येतात. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विजेचे खांब टाकून वीज जोडण्या दिल्या जातात. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. शिवाय त्यासाठी दर अधिक मागण्यात येऊनसुध्दा दर देण्यात येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी ५०० वीज जोडण्यांचे उद्दिष्ट असताना ठेकेदारांअभावी जोडण्यांची उद्दिष्ट पूर्ती होण्यात अडथळा येत आहे. पैसे भरूनही जोडण्या न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तरूणवर्ग आता सजग झाला आहे. नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे कृषिपंपाच्या जोडण्या प्राधान्याने देणे गरजेचे आहे. ११२४ वीज जोडण्यांपैकी ६८० कृषिपंप आरक्षित कोट्यातील आहेत, तर ४४४ खुल्या गटातील आहेत. वर्षभरात केवळ ३१४ जोडण्या देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात २४२, चिपळूण विभागात १०४, खेड विभागात ९८ कृषिपंपाची यादी प्रलंबित आहेत.पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या नवीन कनेक्शन देण्याचे काम बंद आहे. पावसाळ्यात खोदाईसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर काम सुरू होईल. परंतु येत्या वर्षभरात ११२४ कृषिपंप शंभर टक्के देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रलंबित यादी वर्षभरात संपवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. (प्रतिनिधी)