शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
3
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
4
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
5
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
6
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
7
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
8
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
9
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
10
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
11
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
12
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
13
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
14
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
15
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
16
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
17
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
18
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
19
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
20
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:24 IST

हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

ठळक मुद्देहवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली फळातील रसही शोषला जात असल्याने अनेक ठिकाणी नुकसान

रत्नागिरी : हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाणच अल्प राहिले आहे. आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. परंतु, सातत्याने एकसारखे हवामान नव्हते. वेळोवेळी हवामानात बदल होत होता. ८० टक्के सर्वत्र पालवी होती. ही पालवी जून होऊन मोहोर येण्यास अवधी गेला. काही दिवस असलेल्या थंडीमुळे पोषक हवामान तयार झाल्यानंतर मोहोर सुरू झाला. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा त्याला फटका बसला.

मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले. थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सध्या सर्वत्र आंबा कलमांना चांगला मोहोर आला आहे. कणीपासून वाटाणा, आवळा, सुपारी इतकेच नव्हे तर बोराएवढाही आंबा झाला आहे.

थंडीचे प्रमाण अधिक राहिल्यामुळे मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणा झाली होती, तेथेच मोहोर आल्यामुळे गळ सुरू झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. मोहोर आल्यामुळे फळधारणा झालेल्या फळांना पोषक खाद्य मिळत नसल्यामुळे कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. त्यामुळे झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला आहे.मोहोरातून थ्रीप्सचा प्रादुर्भाव असल्यामुळे फळांवरही तो होत आहे. मोहोराबरोबर फळांतील रस शोषला जात असल्यामुळे मोहोर काळा पडत आहे, तर फळातील रस शोषला जात असल्यामुळे हिरवे फळ चिकूसारखे होत आहे. सेंद्रीय, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्यामुळे शेतकरी चिंतात्रस्त झाले आहेत. 

यावर्षी पारा जिल्ह्यात अन्यत्र १५ ते १६ अंश, दापोलीमध्ये तर पारा ९ अंश सेल्सियस इतका खाली आला होता. मात्र, काही दिवसात पुन्हा उष्मा वाढला आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मोहोरावर उंट अळी, हिरव्या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ही कीड मोहोर कुरतडून टाकत आहेत. शिवाय तुडतुडाही कमी होत नाही. काळा व पांढरा थ्रीप्स मोहोराबरोबर फळांचे नुकसान करत आहे. महागडी कीटकनाशके वापरूनही नियंत्रणात येत नसल्यामुळे यावर संशोधन करणे गरजेचे आहे.- उमंग साळवी, शेतकरी, पावस

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी