शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:24 IST

हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

ठळक मुद्देहवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली फळातील रसही शोषला जात असल्याने अनेक ठिकाणी नुकसान

रत्नागिरी : हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाणच अल्प राहिले आहे. आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. परंतु, सातत्याने एकसारखे हवामान नव्हते. वेळोवेळी हवामानात बदल होत होता. ८० टक्के सर्वत्र पालवी होती. ही पालवी जून होऊन मोहोर येण्यास अवधी गेला. काही दिवस असलेल्या थंडीमुळे पोषक हवामान तयार झाल्यानंतर मोहोर सुरू झाला. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा त्याला फटका बसला.

मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले. थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सध्या सर्वत्र आंबा कलमांना चांगला मोहोर आला आहे. कणीपासून वाटाणा, आवळा, सुपारी इतकेच नव्हे तर बोराएवढाही आंबा झाला आहे.

थंडीचे प्रमाण अधिक राहिल्यामुळे मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणा झाली होती, तेथेच मोहोर आल्यामुळे गळ सुरू झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. मोहोर आल्यामुळे फळधारणा झालेल्या फळांना पोषक खाद्य मिळत नसल्यामुळे कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. त्यामुळे झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला आहे.मोहोरातून थ्रीप्सचा प्रादुर्भाव असल्यामुळे फळांवरही तो होत आहे. मोहोराबरोबर फळांतील रस शोषला जात असल्यामुळे मोहोर काळा पडत आहे, तर फळातील रस शोषला जात असल्यामुळे हिरवे फळ चिकूसारखे होत आहे. सेंद्रीय, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्यामुळे शेतकरी चिंतात्रस्त झाले आहेत. 

यावर्षी पारा जिल्ह्यात अन्यत्र १५ ते १६ अंश, दापोलीमध्ये तर पारा ९ अंश सेल्सियस इतका खाली आला होता. मात्र, काही दिवसात पुन्हा उष्मा वाढला आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मोहोरावर उंट अळी, हिरव्या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ही कीड मोहोर कुरतडून टाकत आहेत. शिवाय तुडतुडाही कमी होत नाही. काळा व पांढरा थ्रीप्स मोहोराबरोबर फळांचे नुकसान करत आहे. महागडी कीटकनाशके वापरूनही नियंत्रणात येत नसल्यामुळे यावर संशोधन करणे गरजेचे आहे.- उमंग साळवी, शेतकरी, पावस

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी