शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:24 IST

हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

ठळक मुद्देहवामानातील बदलामुळे थ्रीप्सचा प्रादुर्भाव, फळगळही वाढली फळातील रसही शोषला जात असल्याने अनेक ठिकाणी नुकसान

रत्नागिरी : हवामानात गेले चार दिवसात बदल झाला असून, थंडीचे प्रमाण कमी झाले असून, उष्मा वाढला आहे. शिवाय काही झाडांना पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामानातील बदलामुळे तुडतुडा व थ्रीप्सचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. काळा, पांढरा थ्रीप्स मोहोर व फळांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. थ्रीप्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करूनसुध्दा योग्य उपयोग होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाणच अल्प राहिले आहे. आॅक्टोबरपासून थंडी सुरू झाली. परंतु, सातत्याने एकसारखे हवामान नव्हते. वेळोवेळी हवामानात बदल होत होता. ८० टक्के सर्वत्र पालवी होती. ही पालवी जून होऊन मोहोर येण्यास अवधी गेला. काही दिवस असलेल्या थंडीमुळे पोषक हवामान तयार झाल्यानंतर मोहोर सुरू झाला. मात्र, नोव्हेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा त्याला फटका बसला.

मोहोर वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड केली. डिसेंबरपासून पुन्हा थंडीचे प्रमाण वाढले. थंडीमुळे मोहोर प्रक्रिया वेगाने सुरू झाली. सध्या सर्वत्र आंबा कलमांना चांगला मोहोर आला आहे. कणीपासून वाटाणा, आवळा, सुपारी इतकेच नव्हे तर बोराएवढाही आंबा झाला आहे.

थंडीचे प्रमाण अधिक राहिल्यामुळे मोहोरातून पुनर्मोहोर सुरू झाल्यामुळे फळधारणा झाली होती, तेथेच मोहोर आल्यामुळे गळ सुरू झाली असून, त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ लागला आहे. मोहोर आल्यामुळे फळधारणा झालेल्या फळांना पोषक खाद्य मिळत नसल्यामुळे कैरी पिवळी पडून गळू लागली आहे. त्यामुळे झाडाखाली कैऱ्यांचा खच पडला आहे.मोहोरातून थ्रीप्सचा प्रादुर्भाव असल्यामुळे फळांवरही तो होत आहे. मोहोराबरोबर फळांतील रस शोषला जात असल्यामुळे मोहोर काळा पडत आहे, तर फळातील रस शोषला जात असल्यामुळे हिरवे फळ चिकूसारखे होत आहे. सेंद्रीय, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करूनही थ्रीप्स नष्ट होत नसल्यामुळे शेतकरी चिंतात्रस्त झाले आहेत. 

यावर्षी पारा जिल्ह्यात अन्यत्र १५ ते १६ अंश, दापोलीमध्ये तर पारा ९ अंश सेल्सियस इतका खाली आला होता. मात्र, काही दिवसात पुन्हा उष्मा वाढला आहे. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मोहोरावर उंट अळी, हिरव्या किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ही कीड मोहोर कुरतडून टाकत आहेत. शिवाय तुडतुडाही कमी होत नाही. काळा व पांढरा थ्रीप्स मोहोराबरोबर फळांचे नुकसान करत आहे. महागडी कीटकनाशके वापरूनही नियंत्रणात येत नसल्यामुळे यावर संशोधन करणे गरजेचे आहे.- उमंग साळवी, शेतकरी, पावस

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी