शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट; मात्र, वर्दळ वाढलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे बुधवारी शहर आणि ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे बुधवारी शहर आणि परिसरात अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि औषधे दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या दुकानांसमोर शुकशुकाट होता. मात्र, रस्त्यावर वाहनांची वर्दळ मात्र कायम होती.

राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानेही मंगळवारपासून जिल्ह्यात मिनी लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यानुसार दिवसा ७ ते रात्री ८ या वेळेत जमावबंदी आणि रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सोमवार, दि. ११ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्णपणे लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन दिवसांत नागरिकांना अजिबातच बाहेर पडता येणार नाही.

जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश काढताच जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी या लाॅकडाऊनला कडाडून विराेध केला. न्यायालयात केस दाखल केली तरीही आम्ही दुकाने बंद करणार नाही, असा पवित्रा सर्वच दुकानदारांचा होता. मात्र, राज्याचा निर्णय असल्याने त्यांना तो मान्य करावा लागला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवताना या लाॅकडाऊनला विरोध असल्याचे फलक लावले आहेत.

मंगळवारी सकाळी काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली होती. मात्र, पोलिसांनीही दुकाने बंद करायला लावली. बुधवारी मात्र, किराणा, जनरल स्टोअर्स, औषधांची दुकाने तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. त्यामुळे या दुकानांसमोर दिवसभर शुकशुकाट होता. मात्र, रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरूच होती. वाहनांची ये जा कायम होती. मात्र, लाॅकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणा पुन्हा रस्त्यावर उभी राहिली. ये जा करणाऱ्या नागरिकांनी हेल्मेट, तसेच मास्क लावला नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पावतीद्वारे न करता ऑनलाईन कारवाई केली जात होती.

किराणा दुकाने, तसेच औषधांच्या दुकानातून रांगा लावून नागरिकांना खरेदी करावी लागत होती. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी पूर्णपणे बंद असल्याने नागरिक आतापासूनच सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडले होते. शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची अट असली तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही मार्चअखेरची धावपळ असल्याने १०० टक्के कर्मचारी उपस्थित होते.

कोटसाठी

सध्या जिल्ह्यात कोरोनाची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी नियमांचे पालन करायला हवे. सध्या धोका वाढला आहे. त्यामुळे किमान ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊनच्या नियमांचे पालन करून स्वयंशिस्त पाळायला हवी.

दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी

चौकट -

जिल्हा प्रशासनाने सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, यासाठी बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेतली. सर्व व्यापाऱ्यांशी याबाबत चर्चा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.