शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

देवडे गावात राबवले जाणार कोरडवाहू शेती अभियान

By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST

कृषी विभातार्फे निवड : कापणीनंतर अभियानाला प्रारंभ होणार

मार्लेश्वर : बारमाही पीक घेण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावाची या अभियानासाठी कृषी विभागाने नुकतीच निवड केली आहे. भात कापणीनंतर या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कोकणात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील शेतकरी शेतीवरच गुजराण करत असतो. मात्र, सद्यस्थितीत आजचा तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करत असून, उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबई वा पुणे यांसारख्या शहरांकडे धाव घेत आहे. दुसरीकडे काही शेतकरी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.शेतकरी शेती करुन आपली गुजराण करत असला तरी शेतकरी म्हणावा इतका आर्थिकदृष्ट्या सबल झालेला दिसत नाही. यासाठी शेतीला चालना मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या उद्देशाने शासनाने अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता यावे, याकरिता शासनाने कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक तालुक्यातून या अभियानासाठी सुरुवातीला एका गावाची निवड करण्याचे शासनाचे धोरण आहे.यावर्षी हे अभियान तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या देवडे गावात राबवण्यात येणार आहे. हे अभियान राबवण्यासाठी देवडे गावातील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी तालुका कृषी कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत कृषी विभागाने देवडे गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड केली आहे. या अभियानांतर्गत गावातील ग्रामस्थांचे गट तयार करण्यात येणार असून, या गटांच्या सहायाने गावात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाणार आहे. तालुका कृषी विभाग कमिटीने या गावाची प्रथमदर्शनी पाहणी केली ग्रामस्थांशी या अभियानासंदर्भात चर्चा केली आहे. भातकापणीचा हंगाम संपताच या अभियानाला प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)देवडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी कांदा, हळद, कणगर, सूर्यफुलाची उन्हाळी शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आता बेर्डे यांच्या पुढाकारातून गावात कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचा मान मिळाल्याने गावातील शेतकरी हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उत्सुक झाले आहेत.