शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

देवडे गावात राबवले जाणार कोरडवाहू शेती अभियान

By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST

कृषी विभातार्फे निवड : कापणीनंतर अभियानाला प्रारंभ होणार

मार्लेश्वर : बारमाही पीक घेण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावाची या अभियानासाठी कृषी विभागाने नुकतीच निवड केली आहे. भात कापणीनंतर या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कोकणात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील शेतकरी शेतीवरच गुजराण करत असतो. मात्र, सद्यस्थितीत आजचा तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करत असून, उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबई वा पुणे यांसारख्या शहरांकडे धाव घेत आहे. दुसरीकडे काही शेतकरी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.शेतकरी शेती करुन आपली गुजराण करत असला तरी शेतकरी म्हणावा इतका आर्थिकदृष्ट्या सबल झालेला दिसत नाही. यासाठी शेतीला चालना मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या उद्देशाने शासनाने अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता यावे, याकरिता शासनाने कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक तालुक्यातून या अभियानासाठी सुरुवातीला एका गावाची निवड करण्याचे शासनाचे धोरण आहे.यावर्षी हे अभियान तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या देवडे गावात राबवण्यात येणार आहे. हे अभियान राबवण्यासाठी देवडे गावातील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी तालुका कृषी कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत कृषी विभागाने देवडे गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड केली आहे. या अभियानांतर्गत गावातील ग्रामस्थांचे गट तयार करण्यात येणार असून, या गटांच्या सहायाने गावात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाणार आहे. तालुका कृषी विभाग कमिटीने या गावाची प्रथमदर्शनी पाहणी केली ग्रामस्थांशी या अभियानासंदर्भात चर्चा केली आहे. भातकापणीचा हंगाम संपताच या अभियानाला प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)देवडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी कांदा, हळद, कणगर, सूर्यफुलाची उन्हाळी शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आता बेर्डे यांच्या पुढाकारातून गावात कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचा मान मिळाल्याने गावातील शेतकरी हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उत्सुक झाले आहेत.