शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

देवडे गावात राबवले जाणार कोरडवाहू शेती अभियान

By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST

कृषी विभातार्फे निवड : कापणीनंतर अभियानाला प्रारंभ होणार

मार्लेश्वर : बारमाही पीक घेण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावाची या अभियानासाठी कृषी विभागाने नुकतीच निवड केली आहे. भात कापणीनंतर या अभियानाला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कोकणात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. कोकणातील शेतकरी शेतीवरच गुजराण करत असतो. मात्र, सद्यस्थितीत आजचा तरुणवर्ग शेतीकडे दुर्लक्ष करत असून, उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी मुंबई वा पुणे यांसारख्या शहरांकडे धाव घेत आहे. दुसरीकडे काही शेतकरी आजही आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.शेतकरी शेती करुन आपली गुजराण करत असला तरी शेतकरी म्हणावा इतका आर्थिकदृष्ट्या सबल झालेला दिसत नाही. यासाठी शेतीला चालना मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या उद्देशाने शासनाने अनेक विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यानुसार शेतकऱ्यांना बारमाही पीक घेता यावे, याकरिता शासनाने कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचे ठरवले आहे. प्रत्येक तालुक्यातून या अभियानासाठी सुरुवातीला एका गावाची निवड करण्याचे शासनाचे धोरण आहे.यावर्षी हे अभियान तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या देवडे गावात राबवण्यात येणार आहे. हे अभियान राबवण्यासाठी देवडे गावातील प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेर्डे यांनी पुढाकार घेतला आहे. तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी तालुका कृषी कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावाची दखल घेत कृषी विभागाने देवडे गावाची कोरडवाहू शेती अभियानासाठी निवड केली आहे. या अभियानांतर्गत गावातील ग्रामस्थांचे गट तयार करण्यात येणार असून, या गटांच्या सहायाने गावात विविध पिकांचे उत्पादन घेतले जाणार आहे. तालुका कृषी विभाग कमिटीने या गावाची प्रथमदर्शनी पाहणी केली ग्रामस्थांशी या अभियानासंदर्भात चर्चा केली आहे. भातकापणीचा हंगाम संपताच या अभियानाला प्रारंभ होणार आहे. (वार्ताहर)देवडे गावातील प्रगतशील शेतकरी प्रकाश बेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी कांदा, हळद, कणगर, सूर्यफुलाची उन्हाळी शेती करुन इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. आता बेर्डे यांच्या पुढाकारातून गावात कोरडवाहू शेती अभियान राबवण्याचा मान मिळाल्याने गावातील शेतकरी हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी उत्सुक झाले आहेत.