शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

दुष्काळी भागाचा घास स्थानिक जनावरांच्या मुखी

By admin | Updated: June 13, 2016 00:12 IST

राजापूर : दुष्काळी भागाला एका पेंढ्याचीही मदत नाही

राजापूर : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळावा, यासाठी सौंदळ व पाचल येथे सुमारे ५० एकर जागेत केलेल्या पेरणीनंतर उगवलेला चारा मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केल्यामुळे पावसाळ्याला सुरुवात झाली तरी एक पेंढाही दुष्काळी भागात येथून रवाना झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी केलेला पहिलाच प्रयोग अपयशी ठरला आहे. चारा तयार करून त्याच्या संरक्षणासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नसल्याने हा चारा फस्त झाला.यावर्षीचा उन्हाळा कडाक्याचा गेला. त्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला बसला. पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांसाठीचा पाणीप्रश्न उग्र बनून राहिला होता. त्यामुळे प्रशासनाला पाण्याचा पुरवठा करताना नाकीनऊ आले होते. दुष्काळी भागातील जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते तसेच चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला होता. ओला चारा आणायचा कुठून, ही समस्या कायम असताना राज्याच्या अन्य भागातून दुष्काळी भागातील जनावरांना चारा पुरवला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात उपलब्ध पाणी व ओसाड जमिनी लक्षात घेता, त्या जमिनीत काही एकरात मक्याची पेरणी करायची व हा तयार चारा दुष्काळी परिसरात पाठवायचा या उद्देशाने राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी पाचल व सौंदळमधील शेतकऱ्यांशी चर्चा करुन काही एकरात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या सहाय्याने तत्काळ पेरण्या करण्यात आल्या. स्थानिक जनतेनेचे सहकार्य मिळाले. या पेरणीला पाणीपुरवठा महसूलचे दोन कर्मचारी करत होते. बऱ्यापैकी चारा तयारही झाला होता. मात्र, संपूर्ण चाऱ्याभोवती कुठल्याही प्रकारचे बंदिस्त कुंपण घालण्यात न आल्याने परिसरातील मोकाट जनावरांनी हा चारा खाऊन टाकला. फक्त पाचलमधील चाऱ्याभोवती कुंपण घालण्यात आल्याने त्या ठिकाणचा चारा वाचवता आला. सौंदळमधील हा ओला चारा जनावरांनी फस्त केला. परिणामी नंतर प्रशासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पुढील प्रक्रिया थांबली. दुष्काळग्रस्तांसाठी चाऱ्याची पेरणी होऊनही येथून एकही चाऱ्याचा पेंढा पावसाळा सुरु झाला तरी दुष्काळी भागात गेलेला नाही. पाचलमधील चारा तयार होऊनही त्याचे काय झाले ते मात्र कळू शकलेले नाही. (प्रतिनिधी)उपक्रम कशासाठी : चाऱ्याच्या संरक्षणाची उपाययोजनाच नाहीदुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळण्यासाठी राजापूर तालुक्यात चारा तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, तयार होणाऱ्या चाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणतीही उपयायोजना करण्यात न आल्याने नेमका हा उपक्रम कशासाठी राबविण्यात आला? असा सवाल केला जात आहे.चारा गेला कुठे?सुमारे ५० एकर जागेत पेरणीनंतर उगवलेला चारा एका रात्रीत मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केला का? असा सवाल आता केला जात आहे. एवढ्या मोठ्या जागेतील सर्व चारा गायब कसा झाला? याचे उत्तर अनुत्तरीत आहे. चारा नक्की जनावरांनी फस्त केला का, असा सवाल होत आहे.