शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुष्काळी भागाचा घास स्थानिक जनावरांच्या मुखी

By admin | Updated: June 13, 2016 00:12 IST

राजापूर : दुष्काळी भागाला एका पेंढ्याचीही मदत नाही

राजापूर : दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळावा, यासाठी सौंदळ व पाचल येथे सुमारे ५० एकर जागेत केलेल्या पेरणीनंतर उगवलेला चारा मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केल्यामुळे पावसाळ्याला सुरुवात झाली तरी एक पेंढाही दुष्काळी भागात येथून रवाना झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी केलेला पहिलाच प्रयोग अपयशी ठरला आहे. चारा तयार करून त्याच्या संरक्षणासाठी कोणतीच उपाययोजना केलेली नसल्याने हा चारा फस्त झाला.यावर्षीचा उन्हाळा कडाक्याचा गेला. त्याचा जोरदार फटका विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्राला बसला. पिण्याच्या पाण्यासह शेती व जनावरांसाठीचा पाणीप्रश्न उग्र बनून राहिला होता. त्यामुळे प्रशासनाला पाण्याचा पुरवठा करताना नाकीनऊ आले होते. दुष्काळी भागातील जनावरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नव्हते तसेच चाऱ्याचा प्रश्न अत्यंत बिकट बनला होता. ओला चारा आणायचा कुठून, ही समस्या कायम असताना राज्याच्या अन्य भागातून दुष्काळी भागातील जनावरांना चारा पुरवला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यात उपलब्ध पाणी व ओसाड जमिनी लक्षात घेता, त्या जमिनीत काही एकरात मक्याची पेरणी करायची व हा तयार चारा दुष्काळी परिसरात पाठवायचा या उद्देशाने राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी पाचल व सौंदळमधील शेतकऱ्यांशी चर्चा करुन काही एकरात हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तालुका कृषी विभागाच्या सहाय्याने तत्काळ पेरण्या करण्यात आल्या. स्थानिक जनतेनेचे सहकार्य मिळाले. या पेरणीला पाणीपुरवठा महसूलचे दोन कर्मचारी करत होते. बऱ्यापैकी चारा तयारही झाला होता. मात्र, संपूर्ण चाऱ्याभोवती कुठल्याही प्रकारचे बंदिस्त कुंपण घालण्यात न आल्याने परिसरातील मोकाट जनावरांनी हा चारा खाऊन टाकला. फक्त पाचलमधील चाऱ्याभोवती कुंपण घालण्यात आल्याने त्या ठिकाणचा चारा वाचवता आला. सौंदळमधील हा ओला चारा जनावरांनी फस्त केला. परिणामी नंतर प्रशासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष झाले आणि पुढील प्रक्रिया थांबली. दुष्काळग्रस्तांसाठी चाऱ्याची पेरणी होऊनही येथून एकही चाऱ्याचा पेंढा पावसाळा सुरु झाला तरी दुष्काळी भागात गेलेला नाही. पाचलमधील चारा तयार होऊनही त्याचे काय झाले ते मात्र कळू शकलेले नाही. (प्रतिनिधी)उपक्रम कशासाठी : चाऱ्याच्या संरक्षणाची उपाययोजनाच नाहीदुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या जनावरांना ओला चारा मिळण्यासाठी राजापूर तालुक्यात चारा तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. मात्र, तयार होणाऱ्या चाऱ्याच्या संरक्षणासाठी कोणतीही उपयायोजना करण्यात न आल्याने नेमका हा उपक्रम कशासाठी राबविण्यात आला? असा सवाल केला जात आहे.चारा गेला कुठे?सुमारे ५० एकर जागेत पेरणीनंतर उगवलेला चारा एका रात्रीत मोकाट जनावरांनी खाऊन फस्त केला का? असा सवाल आता केला जात आहे. एवढ्या मोठ्या जागेतील सर्व चारा गायब कसा झाला? याचे उत्तर अनुत्तरीत आहे. चारा नक्की जनावरांनी फस्त केला का, असा सवाल होत आहे.