शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विसर्जन मार्गावर गटाराचे सांडपाणी

By admin | Updated: September 1, 2014 23:56 IST

रत्नागिरी पालिका : पावसाळापूर्व कामाची ऐशी की तैशी

उमेश पाटणकर - रत्नागिरी --पाच दिवसांच्या बाप्पांचे उद्या (मंगळवारी) विसर्जन होत आहे. यानिमित्त रत्नागिरीच्या मांडवी किनारी विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत रंगणार आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून गणेशाची विसर्जन मिरवणूक जाणार असून, ही मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.गणेश विसर्जन अवघ्या काही दिवसांवर आले असताना गणेशभक्त आणि गणेशाला रत्नागिरी पालिकेने पावसाळापूर्व कामाच्या केलेल्या या ओंगळवाण्या कामाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. रस्त्यावरील खड्डे हा विषय रत्नागिरीत ऐरणीवर आला असतानाच आता या रस्त्याशेजारी असलेली गटारेही सांडपाणी रस्त्यावर सोडून दुर्गंधी पसरवत आहेत. विशेष म्हणजे येथील नगर पालिकेचा गणपती याच रस्त्यावरून जात असताना पालिका ढिम्म का? असा सवाल होत आहे. विसर्जन मार्गावरील गटारांची दुरवस्था झाल्याने गणेशभक्तांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. खुद्द मांडवी किनारी असणारा हायमास्ट वगळला तर जेट्टीवरील प्रकाश व्यवस्था पूर्ण मोडकळीस आली आहे.रत्नागिरी शहरासह कुवारबाव, नाचणे मिरजोळे येथील अनेक गणेशभक्त ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी मांडवी चौपाटीला प्राधान्य देत असतात. यामुळे शहराची मुख्य बाजारपेठ मिरवणुकीमुळे गजबजून जाते. रामनाका - तेलीआळी नाका- रहाटाघरमार्गे भुतेनाका मांडवी हा पर्यायी ८० फुटी रस्ता असला तरी विघ्नहर्त्याची विसर्जन मिरवणूक गोखले नाका, काँग्रेस भुवनमार्गेच जात असते. मार्गावरील संजीवनी हॉस्पिटलसमोर महावितरणच्या विद्युत जनित्रालगत असणाऱ्या गटारावरील झडपा गायब आहेत. यासोबतच मुरलीधर मंदिर नाका आणि मांडवीनाका येथेही गटारांवरील झडपा बसवण्याची गरज आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेला एखादा गणेशभक्त अशा ठिकाणी गटारात कोसळून गंभीर जखमी होण्याची शक्यता आहे. भुतेनाका येथील लोखंडी जाळी वाहनांच्या वर्दळीने वाकली असल्याने येथेही गणेशभक्त जखमी होण्याची शक्यता आहे. कित्ते भंडारी हॉलसमोरील भूमिगत गटार तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रस्त्यावरुनच वाहात आहे.प्रत्यक्ष मांडवी धक्क्याची दुरवस्था झाली असून, संरक्षक कठडे आता घातपाती कठडे बनले आहेत. जेटीवरील रेलिंगचे लोखंडी पाईप गंजून गायब झाले असून, अद्याप त्याची दुरुस्ती केलेली नाही. गणेश विसर्जन सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात या जेटीवर गर्दी होत असते. रेलिंग नसल्याने मोठ्या प्रमाणात दुर्दैवी प्रसंग घडण्याची दाट शक्यता आहे. जेटीवर उभारलेली प्रकाश व्यवस्थेची संपूर्ण यंत्रणा वाऱ्याच्या वेगाने आणि खाऱ्या हवेने पूर्णत: निकामी झाली आहे. गणपती विसर्जनानंतर मांडवी येथून माघारी येणारी वाहने ८० फुटी मार्गाने परत जातात. मात्र, भुतेनाका ते रहाटाघर बसस्थानक दरम्यान असणाऱ्या वळणावर पावसाचे पाणी साठून राहिले आहे. बाजूलाच असलेल्या गटारातील पाणी येथे साठत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्याच्या उंचीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेच्या मार्गाने आपली वाहने काढत असतात. विसर्जनाच्या रात्रीही अशीच परिस्थिती कायम राहिल्यास वाहतूक कोंडी होऊन अपघातात वाढ होणार आहे.