शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

शिक्षणाची दारे उघडतायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. ...

शाळांची दारे ही उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात नवीन शिक्षणाची दारे उघडू लागली आहेत, हीसुद्धा रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश राजेशिर्के या विद्यार्थ्याने लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेत २३६ वी रॅंक प्राप्त केली आहे, ही खरंच काैतुकास्पद बाब आहे. काेराेना काळात शाळा बंद असूनही शिक्षण अजून थांबलेले नाही, हे मात्र नक्की आहे. प्रथमेशच्या रूपाने शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक संधी मुलांसमाेर उघड झाली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रथमेशने आयएएस अधिकारी हाेण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि त्याने ध्येय्याने तिथपर्यंत मजल मारली. यापूर्वी २००५ मध्ये संगमेश्वर येथील डाॅ. अश्विनी जाेशी या आयएएस झाल्या आहेत. तर महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या परीक्षेतही रत्नागिरी जिल्ह्यातील युवकांनी आपला झेंडा राेवला आहे. जिल्ह्यातील युवकांनी केलेली ही कामगिरी निश्चितच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘नररत्नांची खाण’ म्हणून ज्या रत्नागिरीचा उल्लेख केला जात आहे. ती रत्नागिरी शैक्षणिक वाटचालीतही दैदीप्यमान कामगिरी करत आहे. जिल्ह्याची ही शैक्षणिक वाटचाल अधिक गतिमान हाेण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतला आहे, ही बाबही अधाेरेखित करणे गरजेचे आहे. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकालात ‘रत्नागिरी शैक्षणिक हब’ बनविण्याचा त्यांनी मानस धरला आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्राची मुहूर्तमेढ त्यांनी रत्नागिरीत राेवली आहे. आता पीपीई माॅडेलवर रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबराेबर जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने देशातले पहिले रिसर्च सेंटर उभारण्याचे त्यांनी निश्चित केले आहे. मुलांना स्कील डेव्हलपमेंट करण्यासाठी तसेच वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आयसीडीसीची शाखाही रत्नागिरीत उभारण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. एकंदरीत काेराेनानंतर शाळांची दारे उघडत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाची आणखी नवनवीन दालने उघडत आहेत. या दालनात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी पाऊल टाकून त्यात यशस्वीतेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्यासाठी प्रामाणिक जिद्दीची जाेड हवी आणि या विद्यार्थ्यांना भक्कम पाठबळही हवे.

- अरुण आडिवरेकर