शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

या चुका करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST

तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत वायफळ गप्पा मारणे बंद करा .लोकांना बऱ्याचदा बिनकामाच्या गप्पा मारण्याची सवय असते. आपण त्याला ...

तिसरं म्हणजे एखाद्या गोष्टीबाबत वायफळ गप्पा मारणे बंद करा .लोकांना बऱ्याचदा बिनकामाच्या गप्पा मारण्याची सवय असते. आपण त्याला गॉसिप असं गोंडस नाव देखील देतो. मात्र इतरांबाबत केल्या जाणाऱ्या या गप्पा आपल्या काहीच कामाच्या नाहीत, हेच अनेकांना समजत नाही. शिवाय या गप्पा मारण्याच्या नादात आपण आपल्या जीवनातील महत्त्वाचा वेळ सहज वाया घालवतो. ज्यामुळे यशासाठी लागणारे प्रयत्न कमी पडतात. यशस्वी माणसं मात्र जीवनात अशा गप्पा मारण्यात मुळीच वेळ वाया घालवत नाहीत. हे त्यांच्या यशमागचं एक महत्त्वाचं कारण असतं. चौथे म्हणजे स्वतःला दोष देत राहणे बंद करा .काहीही घडलं तरी त्यासाठी स्वतः ला जबाबदार धरण्याची अनेकांना सवय असते. मात्र असं केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नकळत कमी होत जातो. यासाठी केलेल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा त्यातून योग्य धडा घेणं फार गरजेचं आहे. जीवनात यशस्वी झालेल्या माणसांनी आयुष्यात कधीच काही चुका केलेल्या नसतात, असं मुळीच नाही. कारण चुकांमधूनच माणसं नवं काहीतरी शिकत असतात. त्यामुळे अशा चुकांसाठी स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं, याचा विचार करणं फार गरजेचं आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत बसू नका. जीवनात कधी कोणत्या परिस्थितीला माणसाला सामोरं जावं लागेल, हे सांगता येत नाही. मात्र जर कधी वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं, तर नशिबात असेल तसं घडेल अथवा चांगली परिस्थिती येण्याची वाट पाहत राहणं फारच चुकीचं ठरेल. यशस्वी माणसं कधीच अशी परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत राहत नाहीत. उलट योग्य निर्णय घेत परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे विनाकारण कोणत्याही गोष्टींची अती चिंता करू नका. काहीवेळा एखाद्या गोष्टीचा अती विचार करत बसल्यामुळे नकळत चिंता, काळजीने तुमचे मन गढूळ होत जातं. असं अती चिंता केल्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणारी भीती तुमचा वर्तमान काळ खराब करू शकते. शिवाय याचा ताण आल्यामुळे माणसे नैराश्येच्या अधीन जाऊ शकतात. ज्याचा परिणाम नक्कीच घातक ठरू शकतो. असं असेल तर विनाकारण चिंता, काळजी करत बसण्यापेक्षा सकारात्मक विचार आणि योग्य प्रयत्न करून तुम्ही तुमच्या जीवनात यश खेचून आणू शकता.

डॉ . गजानन पाटील