शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

ताम्हणे धनगरवाडीतील रुग्णांना आजही डोलीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत ...

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने ताम्हणे - धनगरवाडीतील ६५ वर्षीय वृद्धाला औषधाेपचारासाठी चक्क डाेलीतून नेण्याची वेळ येऊन ठेपली.

स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यातील सर्वच धनगरवाड्या साेयी-सुविधांपासून काेसाे दूर राहिल्या आहेत. धनगरवाड्यांमधील पाण्याची समस्या कित्येक वर्ष सुटलेलीच नाही तर वाड्यांमध्ये जाण्यासाठी साधा रस्ताही हाेऊ शकलेला नाही. निवडणुकांवेळी केवळ आश्वासनांची खैरात करणारे निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फिरकतही नसल्याने या वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट हाेत चालली आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हणे - धनगरवाडीकडे जाण्यासाठी अवघा ४ किलाेमीटरचा रस्ता हाेणे गरजेचे आहे. मात्र, ताे करण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही.

ज्येष्ठ ग्रामस्थ नाना धोंडू अचिर्णेकर हे १० सप्टेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, काेणतेही वाहन धनगरवाड्यामध्ये येण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर ग्रामस्थांनी डोलीतून आणून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्ता नसल्याने अनेकवेळा वाडीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.

प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन देण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर या वचनाचा विसर पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

------------------

तब्बल ७१ प्रस्ताव रखडलेले

रत्नागिरी जिल्ह्यात ३०० धनगरवाड्या आहेत. या वाड्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वाड्यांमधील समस्यांबाबत शासनाकडे ७१ प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आजही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.

----------------------

जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सुविधाही नाहीत. धनगरवाड्यांचा तांडा वस्ती सुधार याेजनेत समावेश करण्यात आला आहे. पण, दाेन वर्षात निधीच मिळालेला नसल्याने याेजनेत समावेश करून उपयाेग काय? गेली १५ वर्ष मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ताम्हणे - धनगरवाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या घरासमाेरच उपाेषणाला बसणार आहे.

- रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबाेधन मंच.