शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हणे धनगरवाडीतील रुग्णांना आजही डोलीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत ...

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने ताम्हणे - धनगरवाडीतील ६५ वर्षीय वृद्धाला औषधाेपचारासाठी चक्क डाेलीतून नेण्याची वेळ येऊन ठेपली.

स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यातील सर्वच धनगरवाड्या साेयी-सुविधांपासून काेसाे दूर राहिल्या आहेत. धनगरवाड्यांमधील पाण्याची समस्या कित्येक वर्ष सुटलेलीच नाही तर वाड्यांमध्ये जाण्यासाठी साधा रस्ताही हाेऊ शकलेला नाही. निवडणुकांवेळी केवळ आश्वासनांची खैरात करणारे निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फिरकतही नसल्याने या वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट हाेत चालली आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हणे - धनगरवाडीकडे जाण्यासाठी अवघा ४ किलाेमीटरचा रस्ता हाेणे गरजेचे आहे. मात्र, ताे करण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही.

ज्येष्ठ ग्रामस्थ नाना धोंडू अचिर्णेकर हे १० सप्टेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, काेणतेही वाहन धनगरवाड्यामध्ये येण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर ग्रामस्थांनी डोलीतून आणून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्ता नसल्याने अनेकवेळा वाडीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.

प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन देण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर या वचनाचा विसर पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

------------------

तब्बल ७१ प्रस्ताव रखडलेले

रत्नागिरी जिल्ह्यात ३०० धनगरवाड्या आहेत. या वाड्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वाड्यांमधील समस्यांबाबत शासनाकडे ७१ प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आजही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.

----------------------

जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सुविधाही नाहीत. धनगरवाड्यांचा तांडा वस्ती सुधार याेजनेत समावेश करण्यात आला आहे. पण, दाेन वर्षात निधीच मिळालेला नसल्याने याेजनेत समावेश करून उपयाेग काय? गेली १५ वर्ष मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ताम्हणे - धनगरवाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या घरासमाेरच उपाेषणाला बसणार आहे.

- रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबाेधन मंच.