शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

ताम्हणे धनगरवाडीतील रुग्णांना आजही डोलीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत ...

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने ताम्हणे - धनगरवाडीतील ६५ वर्षीय वृद्धाला औषधाेपचारासाठी चक्क डाेलीतून नेण्याची वेळ येऊन ठेपली.

स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यातील सर्वच धनगरवाड्या साेयी-सुविधांपासून काेसाे दूर राहिल्या आहेत. धनगरवाड्यांमधील पाण्याची समस्या कित्येक वर्ष सुटलेलीच नाही तर वाड्यांमध्ये जाण्यासाठी साधा रस्ताही हाेऊ शकलेला नाही. निवडणुकांवेळी केवळ आश्वासनांची खैरात करणारे निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फिरकतही नसल्याने या वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट हाेत चालली आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हणे - धनगरवाडीकडे जाण्यासाठी अवघा ४ किलाेमीटरचा रस्ता हाेणे गरजेचे आहे. मात्र, ताे करण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही.

ज्येष्ठ ग्रामस्थ नाना धोंडू अचिर्णेकर हे १० सप्टेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, काेणतेही वाहन धनगरवाड्यामध्ये येण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर ग्रामस्थांनी डोलीतून आणून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्ता नसल्याने अनेकवेळा वाडीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.

प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन देण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर या वचनाचा विसर पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

------------------

तब्बल ७१ प्रस्ताव रखडलेले

रत्नागिरी जिल्ह्यात ३०० धनगरवाड्या आहेत. या वाड्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वाड्यांमधील समस्यांबाबत शासनाकडे ७१ प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आजही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.

----------------------

जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सुविधाही नाहीत. धनगरवाड्यांचा तांडा वस्ती सुधार याेजनेत समावेश करण्यात आला आहे. पण, दाेन वर्षात निधीच मिळालेला नसल्याने याेजनेत समावेश करून उपयाेग काय? गेली १५ वर्ष मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ताम्हणे - धनगरवाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या घरासमाेरच उपाेषणाला बसणार आहे.

- रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबाेधन मंच.