शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हणे धनगरवाडीतील रुग्णांना आजही डोलीचाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत ...

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : राजापूर तालुका हा विकसित तालुका म्हणून ओळखला जात आहे. परंतु, याच तालुक्यात सह्याद्री पर्वताच्या खोऱ्यांत अनेक धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही रस्त्यांच्या मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ता नसल्याने ताम्हणे - धनगरवाडीतील ६५ वर्षीय वृद्धाला औषधाेपचारासाठी चक्क डाेलीतून नेण्याची वेळ येऊन ठेपली.

स्वातंत्र्यानंतरही जिल्ह्यातील सर्वच धनगरवाड्या साेयी-सुविधांपासून काेसाे दूर राहिल्या आहेत. धनगरवाड्यांमधील पाण्याची समस्या कित्येक वर्ष सुटलेलीच नाही तर वाड्यांमध्ये जाण्यासाठी साधा रस्ताही हाेऊ शकलेला नाही. निवडणुकांवेळी केवळ आश्वासनांची खैरात करणारे निवडणुकीनंतर या वाड्यांकडे फिरकतही नसल्याने या वाड्यांची अवस्था अत्यंत बिकट हाेत चालली आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हणे - धनगरवाडीकडे जाण्यासाठी अवघा ४ किलाेमीटरचा रस्ता हाेणे गरजेचे आहे. मात्र, ताे करण्यासाठीही मुहूर्त मिळालेला नाही.

ज्येष्ठ ग्रामस्थ नाना धोंडू अचिर्णेकर हे १० सप्टेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे हाेते. मात्र, काेणतेही वाहन धनगरवाड्यामध्ये येण्यासाठी रस्ताच नसल्याने अडचण निर्माण झाली. अखेर ग्रामस्थांनी डोलीतून आणून त्यांना रुग्णालयात दाखल केले. रस्ता नसल्याने अनेकवेळा वाडीतील रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास विलंब होत आहे. काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले.

प्रत्येक निवडणुकीत ताम्हणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना रस्ता करून देण्याचे जाहीर वचन देण्यात आले आहे. मात्र, निवडणुकीनंतर या वचनाचा विसर पडत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनगरवाड्यातील ग्रामस्थांचा बळी गेल्यानंतर रस्त्याचे काम हाती घेणार का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

------------------

तब्बल ७१ प्रस्ताव रखडलेले

रत्नागिरी जिल्ह्यात ३०० धनगरवाड्या आहेत. या वाड्या आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या वाड्यांमधील समस्यांबाबत शासनाकडे ७१ प्रस्ताव देण्यात आले आहेत. मात्र, शासनाच्या उदासीनतेमुळे आजही या प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या वाड्या सुविधांपासून वंचित आहेत.

----------------------

जिल्ह्यातील धनगरवाड्यांमध्ये मुलभूत सुविधाही नाहीत. धनगरवाड्यांचा तांडा वस्ती सुधार याेजनेत समावेश करण्यात आला आहे. पण, दाेन वर्षात निधीच मिळालेला नसल्याने याेजनेत समावेश करून उपयाेग काय? गेली १५ वर्ष मी शासन दरबारी पत्रव्यवहार करत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ताम्हणे - धनगरवाडीचा प्रश्न मार्गी न लागल्यास आमदारांच्या घरासमाेरच उपाेषणाला बसणार आहे.

- रामचंद्र बाबू आखाडे, जिल्हाध्यक्ष, महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबाेधन मंच.