शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

पूरग्रस्तांचे वीज कनेक्शन थेट खंंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अडरे : वीज बिल थकीतचे कारण देऊन महावितरणने सुरू केलेली सक्त वसुली आणि वीजजोडणी खंडितच्या माेहिमेला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अडरे : वीज बिल थकीतचे कारण देऊन महावितरणने सुरू केलेली सक्त वसुली आणि वीजजोडणी खंडितच्या माेहिमेला चिपळूण व्यापारी महासंघटनेने थेट आक्षेप घेतला आहे. याबाबत महावितरण कार्यालयात धाव घेत पूरग्रस्त व्यापारी व नागरिकांचा वीजपुरवठा थेट खंडित न करता त्यांना मुदत व सवलत द्यावी. २ ते ३ टप्प्यात रक्कम भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. जर पूरग्रस्तांवर वसुलीसाठी सक्ती झाल्यास किंवा वीज जोडणी थेट खंडित केल्यास जनप्रक्षोभ उसळेल, असा इशाराही दिला आहे.

महावितरणची थकबाकी वाढल्याने ग्राहकांकडून सक्त वसुली करण्याची मोहीम सुरू केली आहे. चिपळूणमध्येही मोहीम सुरू करण्यात आली असून, काहींचे वीज कनेक्शनही ताेडले आहे. महापुराचा तडाखा सहन करून सावरत असलेल्या चिपळूणमधील पूरग्रस्तांना व्यापाऱ्यांना महावितरणने आणखी एक दणका देण्यास सुरुवात केल्याने येथील चिपळूण व्यापारी महासंघटना आक्रमक झाली आहे. येथील व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष किशोर रेडीज, सचिव उदय ओतरी, ज्येष्ठ व्यापारी अरुण भोजने यांनी थेट चिपळूण महावितरण कार्यालयात जाऊन येथील कार्यकारी अभियंत्याची भेट घेतली.

चिपळूणमध्ये आलेला महापूर यामुळे वीजबिले थकीत झाली आहेत. चिपळूणचे नागरिक, व्यापारी हे स्वाभिमानी आहेत. ते उपाशी राहतील परंतु कोणाचा एक रुपया बुडवणार नाहीत. येथील नागरिक वीजचोरी अजिबात करत नाहीत. तो करणार देखील नाही. परंतु, कोरोना महामारी आणि महापूर यामध्ये येथील व्यापारी आणि प्रत्येक नागरिक कोलमडून पडला आहे, असे स्पष्टपणे व्यापाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.