शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कर्मचारी नको, कलाकार बना

By admin | Updated: February 26, 2017 00:25 IST

संदीप खरे : युवा नाट्य व साहित्य संमेलनाचे रत्नागिरीत उद्घाटन

रत्नागिरी : एखाद्या कलेचं थोडंफार लेणं ज्यांच्या हाती पडलं आहे, त्यांनी हे निसर्गाचं देणं नीट जपून ठेवावे, त्याची जमेल तशी जोपासना करा. पैसा व यशापाठी वेड्यासारखं धावत सुटण्याच्या युगात या कला तुम्हाला माणूस म्हणून राहण्यासाठी मदत करतील. अक्षरलेखनापासून विज्ञानाची रहस्य शोधण्यापर्यंत सर्वत्र काही न काही प्रतिभेची गरज आहे. जे काम करू ते रसपूर्ण करणं यापेक्षा कलाकार अजून वेगळं काय करीत असतो ? त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरी कर्मचारी बनू नका, कलाकार बना, असे प्रतिपादन प्रख्यात कवी संदीप खरे यांनी युवा नाट्य व साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रत्नागिरी व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्य व नाट्य संमेलनास शनिवारी जयेश मंगल कार्यालय येथे प्रारंभ झाला. त्यावेळी संदीप खरे यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र वायकर, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नूतन अध्यक्ष जयंत सावरकर, मावळते अध्यक्ष गंगाराम गवाणकर, आमदार उदय सामंत, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीता राजे, पवार, विभागीय संमेलनाचे निमंत्रक पद्माकर कुलकर्णी, सहनिमंत्रक राजन लाखे, विभागीय कार्यवाह प्राचार्य तानसेन जगताप, विनोद कुलकणी उपस्थित होते.प्रास्ताविकात मसापचे रत्नागिरी कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी रत्नागिरी शाखेचा आढावा घेतला. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचनेनुसार गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ नाटकांतील चुटकुले सादर करून प्रेक्षकांना हसविले.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचे महत्त्व न नाकारता संवेदनशीलतेचा जागर होण्यासाठी युवकांसाठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून साहित्य व नाट्याची युती झाल्याचे स्पष्ट केले. मसापतर्फे संमेलनासाठी ५० हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.आमदार उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना संमेलनास गर्दीपेक्षा दर्दी असल्याचे सांगितले. काही ज्येष्ठ रंगकर्मींची हलाखीची स्थिती आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी आपल्या भाषणातून केली. सांगलीपाठोपाठ रत्नागिरी ‘सांस्कृतिक पंढरी’ असल्याचे सांगितले.पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मार्गदर्शन करताना अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी संमेलनासाठी वैयक्तिक ५० हजार रुपयांची देणगी जाहीर केली. नावीन्यपूर्ण योजनेतून सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो, मात्र जागा द्या, अशी सूचना केली. साहित्यिक, पत्रकार, पोलिसांसाठी राखीव कोटा आहे. जिल्हा प्रशासनाकडे राखीव भूखंडाबाबत चर्चा करून संबंधितांना घरे मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असेही आश्वासन दिले. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी रंगमंच कलाकार, कामगार यांची घरांसाठी एकरकमी पैसे भरण्याची ताकद नाही, त्याबाबत साहाय्य करण्याची सूचना करताच पालकमंत्र्यांनी त्याबाबतचे प्रयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)वाचनासह भाषेवर प्रेम करापुस्तकांवर प्रेम करा, भाषेवर प्रेम करा, भाषेच्या चलनाकडे, जडणघडणीकडे जाणीवपूर्वक पाहा. भाषा कशी होती, कशी आहे, कशी बदलते, हे रस घेऊन निरखा. आपल्या भाग्याने मराठीसारख्या समृद्ध भाषेत जन्माला आलो आहे. नवे संदर्भ आत्मसात करीत असताना जुने शब्दही जतन करायला हवेत. जुन्या साहित्यिकांपासून नवीन लेखक, कवी मुद्दाम वाचा, असे आवाहन संदीप खरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.